AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut on Raj Thackeray: राज ठाकरेंची 4 मेची डेडलाईन, राऊत एका वाक्यात म्हणाले, महाराष्ट्र हे लेच्यापेच्यांचं राज्य नाही

Sanjay Raut on Raj Thackeray: संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. अजान भोंगे असतील कायद्याचा विषय. कोणत्या सेक्शनखाली कारवाई करायची.

Sanjay Raut on Raj Thackeray: राज ठाकरेंची 4 मेची डेडलाईन, राऊत एका वाक्यात म्हणाले, महाराष्ट्र हे लेच्यापेच्यांचं राज्य नाही
राज ठाकरेंची 4 मेची डेडलाईन, राऊत एका वाक्यात म्हणाले, महाराष्ट्र हे लेच्यापेच्यांचं राज्य नाहीImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 02, 2022 | 11:00 AM
Share

मुंबई: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी पुन्हा एकदा भोंग्याचा राग आळवला आहे. आधी 3 मे डेडलाईन दिल्यानंतर आता त्यांनी 4 मेची डेडलाईन दिली आहे. मशिदीवरील भोंगे हटवले नाही तर मशिदीसमोरच हनुमान चालिसा (hanuman chalisa) सुरू करा, असं आवाहन त्यांनी देशभरातील हिंदूंना केलं आहे. अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावाच असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी पलटवार केला आहे. महाराष्ट्र हे लेच्यापेच्यांचं राज्य नाहीये. राज्यातील परिस्थिती बदलेल असं मला वाटत नाही. गृहमंत्री आहेत. लोकनियुक्त सरकार आहे. त्यामुळे काय करायचं हे त्यांना माहीत आहे, असा सूचक इशाराच राऊत यांनी दिला आहे. त्यामुळे परवा राज्य सरकार मनसेला कशी आवर घालणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. अजान भोंगे असतील कायद्याचा विषय. कोणत्या सेक्शनखाली कारवाई करायची. पोलीस काय म्हणतंय, कोर्ट काय म्हणतंय त्यानुसार काम होईल. तुम्हाला काहीच काम नसेल तर महाराष्ट्र आणि देशाचं वातावरण खराब करत आहात. स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी हे राजकीय हिताचं नाही. हे राष्ट्राला मारक आहे. राष्ट्रीय एकात्मतेला मारक आहे. आम्ही त्याविरोधात लढाई लढली आहे. संघर्ष केला आहे. त्यानंतर कोर्टाने काही निर्णय दिले आहेत. या देशात कायद्याचं राज्य असेल तर प्रत्येकाने कायद्याचं पालन केलं पाहिजे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

मग शिवसेना कोठे आहे कळेल

यावेळी राऊत यांनी बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनाही झापलं. सीबीयाने तपास केला आहे. सीबीआयने केलेल्या तपासाची पानं तपासावी. केंद्रीय गुप्तचर खात्याचा अहवाल तपासावा. हे अज्ञानी लोकं आहेत, त्यांनी ती पानं वाचली तर शिवसेना कोठे आहे हे त्यांना कळेल. कुठे होती हे कळेल. इतक्या वर्षांनी फुलबाजी उडवायला झालं काय? तो विषय संपला आहे. तरी का काढत आहे? राम मंदिर उभं राहत आहे. वातावरण बदललं आहे. प्रश्न बदलले आहेत. मूळ प्रश्वावरून लक्ष उडवण्यासाठी भाजप त्यांचे पक्ष आणि त्यांचे नवीन साथीदार गुप्त, छुपे हे सर्व या विषयाकडे आकर्षित करतात पण लोक त्यात पडणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.