AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : तर इंडिया आघाडी पुन्हा निर्माण होणार नाही; संजय राऊत यांचा काँग्रेसला गंभीर इशारा

Sanjay Raut on Congress : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पराभवाचा पंचनामा करताच आता महाविकास आघाडीत वादाची पुन्हा ठिणगी पडली. विधानसभा निवडणुकीपूर्वी जसा वाद उफळला, तसाच वाद पुन्हा पेटला.

Sanjay Raut : तर इंडिया आघाडी पुन्हा निर्माण होणार नाही; संजय राऊत यांचा काँग्रेसला गंभीर इशारा
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jan 10, 2025 | 12:29 PM
Share

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पराभवाचा पंचनामा करताच महाविकास आघाडीत वादाची पुन्हा एकदा ठिणगी पडली. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाने पराभवाचे खापर एकमेकांवर फोडत एकमेकांचे चांगलेच उट्टे काढले. कालपासून आघाडीतील बिघाडी ही सत्ताधाऱ्यांना आनंदाचा उकळ्या फुटण्याचा कार्यक्रम झाला आहे. आज उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर चांगलेच तोंडसूख घेतले. इतकेच नाही तर त्यांनी INDIA आघाडीवरून मोठा इशारा पण दिला.

कशावरून उफळला वाद?

विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेला जागा वाटपात जो घोळ घालण्यात आला, त्यावर नेमकं बोट ठेवलं. जागा वाटप दोन दिवसांत झाले असते तर निदान उर्वरीत दिवस प्रचारासाठी मिळाले असते. जागा वाटप ताणल्या गेल्यानेच विधानसभेसाठी कोणतेही नियोजन करता आले नसल्याचा ठपका त्यांनी ठेवला. त्यांनी या विलंबासाठी नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यावर खापर फोडले. त्यांनी नियोजनाचा अभाव, बैठकीला उशीर आणि इतर कारणांचा पाढाच वाचला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर आता संजय राऊत यांनी त्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.

काँग्रेसला सुनावले खडे बोल

लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया अलायन्स जिवंत ठेवण्याची काँग्रेसची जबाबदारी होती. काँग्रेसने बैठक घ्यायला हवी होती. त्यांनी पुढचं मार्गदर्शन करायला हवं होतं. पण एकही बैठक घेतली नाही. इंडिया अलायन्सचं अस्तित्व राहिलं नाही, असं लोकांना वाटत असेल तर ही काँग्रेसची जबाबदारी आहे. इंडिया अलायन्समध्ये संवाद राहिलेला नाही, असे एकामागून एक घणाघात त्यांनी काँग्रेसवर घातले.

काँग्रेसला दिला मोठा इशारा

यावेळी संजय राऊत यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला. काँग्रेसने इंडिया अलायन्सची जबाबदारी घेणार नाही, असे जाहीर करावे, असे आवाहन त्यांनी केले. आम्ही आमचे मार्ग निवडून घेऊ. इंडिया आघाडी लोकसभेसाठी होती. आता तिचं अस्तित्व नाही, असं काँग्रेसला वाटत असेल तर त्यांनी तसं अधिकृतपणे जाहीर करावं. तुम्हाला सांगतो, जर इंडिया अलायन्स एकदा फुटला तर पुन्हा इंडिया अलायन्स बनणार नाही, असा थेट इशारा त्यांनी दिला. ही भूमिका एखाद्या पार्टीची असेल तर ती मोठी पार्टी आहे. तुम्ही असं विधान करण्यापूर्वी विचार करा, असे त्यांनी काँग्रेस नेत्यांचे कान टोचले.

Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण