AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकच्या जागेसाठी महायुतीत हाय व्होल्टेज घडामोडी, दोन मोठे नेते मुंबईच्या दिशेला रवाना

महायुतीत आता जागावाटपासाठी पडद्यामागे जोरदार घडामोडी घडत आहेत. नाशिकच्या जागेसाठी मुंबईत जोरदार खलबतं सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे नाशिकची जागा फायनल करण्यासाठी आता नाशिकहून दोन बडे नेते मुंबईच्या दिशेला रवाना झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

नाशिकच्या जागेसाठी महायुतीत हाय व्होल्टेज घडामोडी, दोन मोठे नेते मुंबईच्या दिशेला रवाना
दादा भुसे आणि छगन भुजबळ यांचा फाईल फोटो
| Updated on: Apr 02, 2024 | 4:10 PM
Share

लोकसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्यातील मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. पण अजूनही महयुतीमधील जागांचा तिढा अद्याप सुटताना दिसत नाही. विशेष म्हणजे नाशिकच्या जागेसाठी पडद्यामागे जोरदार हालचाली घडत आहेत. या जागेवर सध्याच्या घडीला शिवसेनेचा खासदार आहे. पण या जागेसाठी आधी भाजप जास्त आक्रमक होती. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जागेसाठी जास्त आक्रमक आहे. असं असलं तरी शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे नाशिकची जागा सोडण्यासाठी तयार नाहीत. हेमंत गोडसे हे गेल्या 10 वर्षांपासून नाशिकच्या जागेवर खासदार आहेत. त्यामुळे या जागेवर आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी हेमंत गोडसे हे आग्रही आहेत.

हेमंत गोडसे यांनी आपल्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गेल्या 15 दिवसांत अनेकवेळा भेट घेतली आहे. पण तरीही हेमंत गोडसे यांची उमेदवारी निश्चित होताना दिसत नाही. नाशिकच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी आज मुंबईत हाय व्होल्टेज घडामोडी घडण्याची दाट शक्यता असल्याची माहिती मिळत आहे. कारण नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आपला यवतमाळचा दौरा अर्धवट सोडून मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. तर राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ हे देखील मुंबईच्या दिशेला रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे.

नेमकं काय घडतंय?

नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे तातडीने मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. दादा भुसे यवतमाळचा दौरा रद्द करुन मुंबईच्या दिशेला निघाले आहेत. विशेष म्हणजे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, शिवसेना पदाधिकारी भाऊ चौधरी यांच्यासह इतर महत्त्वाचे पदाधिकारी हे मुंबईत ठाण मांडून आहेत. नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळावी यासाठी हेमंत गोडसे प्रयत्नशील आहेत. विशेष म्हणजे काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे सुद्धा मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. नाशिकच्या जागेसाठी मुंबईत महत्त्वाच्या घडामोडी आणि बैठका घडत आहेत.

नाशिकच्या जागेसाठी मुंबईत जोरदार खलबतं

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी मुंबईत जोरदार खलबतं सुरु आहेत. हेमंड गोडसे काल संध्याकाळपासून मुंबईत ठाण मांडून आहेत. ते आज मुख्यमंत्री एकनाथ शंदे यांची भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे छगन भुजबळ हे देखील नाशिकहून मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. नाशिकच्या जागेचा तिढा कायम आहे. त्या अनुषंगाने ते आपल्या वरिष्ठांशी मुंबईत बोलतील आणि नाशिकची जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करतील. दादा भुसे यांचा आज नियोजित यवतमाळचा दौरा होता. पण ते आपला दौरा अर्धवट सोडून मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. नाशिकच्या लोकसभेच्या जागेवरुन महायुीतमधील वाद कमालीचे वाढले आहेत. हेमंत गोडसे यांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. तर छगन भुजबळ हे देखील आपली ताकद लावताना दिसत आहेत. नाशिकच्या जागेसाठी मुंबईत खलबतं होत आहेत. निर्णय नेमका काय होतो ते पाहणं महत्त्वाचं ठरेल

श्रीकांत शिंदे यांनी गोडसेंना जाहीर केलेली उमेदवारी

नाशिकमध्ये दोन आठवड्यांपूर्वी ठाकरे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. श्रीकांत शिंदे यांनी या कार्यक्रमात हेमंत गोडसे यांना उमेदवारी घोषित केली होती. पण श्रीकांत शिंदे यांच्या या कृतीवर भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर नाशिकमधील भाजपच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडल्याची देखील माहिती समोर आली होती. त्यानंतर अचानक नाशिकच्या जागेसाठी राष्ट्रवादी आग्रही असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे नाशिकच्या जागेबाबतचा तिढा आणखी जास्त घट्ट झालेला बघायला मिळतोय.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.