AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘शाहीनबागेत झालं तेच आताही झालं, देशात जाणीवपूर्वक आणीबाणी निर्माण करायचा प्रयत्न होतोय का?’

केंद्र सरकारने योग्यवेळी शेतकऱ्यांच्या भावना समजावून घेतल्या असत्या तर आजचा काळा दिवस उगवलाच नसता. | Sanjay Raut

'शाहीनबागेत झालं तेच आताही झालं, देशात जाणीवपूर्वक आणीबाणी निर्माण करायचा प्रयत्न होतोय का?'
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Jan 26, 2021 | 5:00 PM
Share

मुंबई: दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) लागलेले हिंसक वळण पाहता देशात जाणीवपूर्वक आणीबाणीची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे का, असा संशय उत्पन्न होत असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. गेल्यावर्षी शाहीनबागेच्या निमित्ताने अशीच परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. देशात वारंवार अशी परिस्थिती निर्माण करणं, हे लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. (repeated attempt to bring emergency in country says sanjay raut)

ते मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या शेतकरी आंदोलनाच्या हाताळणीवर ताशेरे ओढले. केंद्र सरकारने योग्यवेळी शेतकऱ्यांच्या भावना समजावून घेतल्या असत्या तर आजचा काळा दिवस उगवलाच नसता. शेतकऱ्यांना शांततापूर्ण मार्गाने ट्रॅक्टर रॅली काढण्याचे आश्वासन पाळले नाही. मात्र, त्यामुळे हिंसाचाराची जबाबदारी फक्त शेतकऱ्यांवर ढकलता येणार नाही. या परिस्थितीसाठी दोन्ही पक्ष जबाबदार आहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले.

‘आता भाजपवाले शरद पवार, उद्धव ठाकरे आणि जो बायडन यांचा राजीनामा मागणार का?’

आजच्या घटनेनंतर दिल्लीत एखादा दुसरा पक्ष सत्तेत असता तर भाजपकडून प्रमुखांचा राजीनामा मागितला गेला असता. मग आता भाजपचे नेते आजच्या घटनेनंतर कोणाचा राजीनामा मागणार? ते ममता बॅनर्जी, शरद पवार, उद्धव ठाकरे की जो बायडन यांचा राजीनामा मागणार, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला.

‘हे सर्व सरकारच्या अहंकारामुळे घडलं’

शेतकऱ्यांचा संयम तुटत असताना सरकारची काहीच जबाबदारी नव्हती का? कायदा नेमका कुणासाठी? शेतकऱ्यांचं ऐकलं जात नसेल तर तो कायदा कुणासाठी झालाय, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. दिल्लीच्या रस्त्यावर आज जी अराजकता निर्माण झाली आहे त्यासाठी केंद्र सरकारचा अहंकार जबाबदार आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारनेच ही परिस्थिती नियंत्रणात आणावी, असे संजय राऊत यांनी म्हटले.

‘राजीनामा तो बनता है साहेब; संजय राऊत यांची मागणी’

दिल्लीत शेतकरी आंदोलन पेटल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. शेतकरी आंदोलनामागे कोणती अदृश्य शक्ती राजकारण करत आहे?, असा सवाल करतानाच दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे राजीनामा तो बनता है साहेब, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. राऊत यांचा रोख थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच दिशेने असल्याने शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक झाल्याची चर्चा आहे.

संबंधित बातम्या:

शेतकऱ्यांवर लाठीचार्ज; मोदींची ही वागणूक शेतकरी कायम लक्षात ठेवतील: जयंत पाटील

Delhi Farmer Protest : दगडफेक, लाठीचार्ज ते घमासान, शेतकरी आंदोलनातील 10 मोठ्या घडामोडी

Delhi Farmers Tractor Rally VIDEO : भयानक विद्रोह! आंदोलकांकडून पोलिसांवर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न

मग शेतकऱ्यांना गोळ्या घालायच्या का?; शेतकरी नेते टिकैत यांचा संतप्त सवाल

(repeated attempt to bring emergency in country says sanjay raut)

Follow Us
जालियनवाला बागची आठवण करून देत राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
Sanjay Raut | 20 जुलै हा ब्लॅक डे! जालियनवाला बागची आठवण करून देत संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
डायर नाही, कायर पाहिला! लाठीचार्जवर देशपांडेंचा सरकारवर घणाघाती हल्ला
Sandeep Deshpande | जनरल डायर नाही, कायर पाहिला! विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवर संदीप देशपांडेंचा सरकारवर घणाघाती हल्ला
युवा पिढी हीच लोकशाहीची ताकद; CJP आंदोलनाला रितेश-जेनेलियाचा पाठिंबा!
Ritesh-Genelia Deshmukh | युवा पिढी हीच लोकशाहीची ताकद; CJP आंदोलनाला रितेश-जेनेलियाचा पाठिंबा! सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
आंदोलनाने सरकार बदलत नाही! ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे प्रत्युत्तर
Gulabrao Patil on Uddhav Thackeray | आंदोलनाने सरकार बदलत नाही! उद्धव ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे थेट प्रत्युत्तर
डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास
Dahanu | डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास, घटना CCTV मध्ये कैद
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3...
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3 तास बैठक
फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; आंदोलनावर अंधारेंची प्रतिक्रिया
Sushma Andhare | फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; दिल्ली आंदोलनावर सुषमा अंधारेंची सडेतोड प्रतिक्रिया
सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
CJP Protest | सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह...
Kalyan Dombivali | कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह गोणीत लपवला, प्रेयसी फरार
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट...
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट घेणार
CJP Protest : रात्रभर पाऊस, तरीही सीजेपीचं आंदोलन रात्री पासून पुन्हा सुरू, VIDEO.

CJP Protest : रात्रभर पाऊस, तरीही सीजेपीचं आंदोलन रात्री पासून पुन्हा सुरू, VIDEO

इराणचा अमेरिकेच्या लष्कर तळावर हल्ला, तेल भडकल, भारतावर संकट.

इराणचा अमेरिकेच्या लष्कर तळावर हल्ला, तेल भडकल, भारतावर संकट

CJP Protest: सरकारचा काय होता प्लॅन? आंदोलनाला गालबोट लागल्यानंतर अभिजित दिपके यांचा मोठा आरोप काय?.

CJP Protest: सरकारचा काय होता प्लॅन? आंदोलनाला गालबोट लागल्यानंतर अभिजित दिपके यांचा मोठा आरोप काय?

क्रूर बळाचा-लाठ्यांचा वापर, ही दृश्ये खूप काळापर्यंत..; अभिनेत्रीचा तीव्र संताप, आंदोलनावर मांडली भूमिका.

क्रूर बळाचा-लाठ्यांचा वापर, ही दृश्ये खूप काळापर्यंत..; अभिनेत्रीचा तीव्र संताप, आंदोलनावर मांडली भूमिका

पोलिसांनी पहिला हल्ला केला; एका विद्यार्थिनीची प्रकृती अत्यंत चिंताजनक; अभिजीत दीपकेंच्या गंभीर आरोपाने खळबळ.

पोलिसांनी पहिला हल्ला केला; एका विद्यार्थिनीची प्रकृती अत्यंत चिंताजनक; अभिजीत दीपकेंच्या गंभीर आरोपाने खळबळ

जंतर मंतर वर ते बोलू शकत नव्हते, तरी त्यांचा व्हिडिओ देशभर व्हायरल झाला.

जंतर मंतर वर ते बोलू शकत नव्हते, तरी त्यांचा व्हिडिओ देशभर व्हायरल झाला