AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी ढसाढसा रडले, नंतर बेपत्ता परतल्यावर श्रीनिवास वनगा यांचे सूरच बदलले

shrinivas vanga: आपला बळी कोणी घेतला, त्यांची नावे वनगा यांनी सांगितली. ते म्हणाले, जिल्हा प्रमुख कुंदन संख्ये, राजेंद्र गावित यांनी माझा बळी घेतला आहे. साहेब त्यांच्यावर कारवाई करतील अशी खात्री आहे. मी प्रामाणिक राहून काम करेल.

आधी ढसाढसा रडले, नंतर बेपत्ता परतल्यावर श्रीनिवास वनगा यांचे सूरच बदलले
श्रीनिवास वानगा
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Nov 02, 2024 | 9:41 AM
Share

शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा राज्यातील राजकारणात चर्चेचा विषय ठरले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांमध्ये ते होते. त्यातील 39 आमदारांनी पुन्हा तिकीट देण्यात आले. परंतु श्रीनिवास वनगा यांना तिकीट दिले नाही. त्यामुळे नाराज झालेले श्रीनिवास वनगा 28 ऑक्टोबरपासून बेपत्ता होते. ते आता चार दिवसानंतर घरी परतले. ते कुठे गेले होते? का गेले होते? त्याची कारणे त्यांनी सांगितली.

श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यानंतर ते अज्ञातस्थळी गेले होते. त्यांना शिंदे गटाने पालघरमधून उमेदवारी नाकारली होती. चार दिवस बेपत्ता राहिल्यानंतर परतले. बॉडीगार्ड नव्हते. कुठे होते माहीत नव्हते. पण बुधवारी त्यांनी घरच्यांशी संपर्क केला होता. नातेवाईकांकडे असल्याचे त्यांनी सांगितलं होते.

कुठे गेले होते श्रीनिवास वनगा

मी दोन दिवस बाहेर होतो. मी नातेवाईकांकडे होतो. घराच्या आसपासच होतो. मला अपेक्षा होती पालघर किंवा डहाणूत उमेदवारी मिळेल. मी नाराज होतो. भावनेतून बोललो. मी ठाकरे गटाच्या संपर्कात नव्हतो. रागाच्या भरात मी नातेवाईकांकडे गेलो होतो, असे श्रीनिवास वनगा यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सांगितले.

श्रीनिवास वनगा आता उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे का? त्यावर ते म्हणाले, मी सध्या कोणाला भेटणार नाही. माझी भूमिका काही नाही. फक्त शंभुराजेंशी मी बोललो. माझे तिकीट कापण्यासाठी काही लोकांनी षडयंत्र रचले. मी प्रामाणिक होतो. माझा बळी घेणाऱ्यांवर शिंदे साहेबांनी कारवाई करावी, हीच माझी अपेक्षा आहे. शिंदे साहेब जे सांगतील ते मी करेल.

विधान परिषदेची आशा नाही

आपला बळी कोणी घेतला, त्यांची नावे वनगा यांनी सांगितली. ते म्हणाले, जिल्हा प्रमुख कुंदन संख्ये, राजेंद्र गावित यांनी माझा बळी घेतला आहे. साहेब त्यांच्यावर कारवाई करतील अशी खात्री आहे. मी प्रामाणिक राहून काम करेल. कालपासून मुलाची तब्येत बरी नाही. प्रामाणिकतेचे राजकारणात काम नाही. मला माझ्या कुटुंबासाठी जगायचे आहे. राजकीय भूमिका काय घेणार? हे पुढे बघेन, असे ते म्हणाले. मला विधान परिषदेची आशा नाही, असे त्यांनी म्हटले.

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.