AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी ढसाढसा रडले, नंतर बेपत्ता परतल्यावर श्रीनिवास वनगा यांचे सूरच बदलले

shrinivas vanga: आपला बळी कोणी घेतला, त्यांची नावे वनगा यांनी सांगितली. ते म्हणाले, जिल्हा प्रमुख कुंदन संख्ये, राजेंद्र गावित यांनी माझा बळी घेतला आहे. साहेब त्यांच्यावर कारवाई करतील अशी खात्री आहे. मी प्रामाणिक राहून काम करेल.

आधी ढसाढसा रडले, नंतर बेपत्ता परतल्यावर श्रीनिवास वनगा यांचे सूरच बदलले
श्रीनिवास वानगा
| Updated on: Nov 02, 2024 | 9:41 AM
Share

शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा राज्यातील राजकारणात चर्चेचा विषय ठरले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांमध्ये ते होते. त्यातील 39 आमदारांनी पुन्हा तिकीट देण्यात आले. परंतु श्रीनिवास वनगा यांना तिकीट दिले नाही. त्यामुळे नाराज झालेले श्रीनिवास वनगा 28 ऑक्टोबरपासून बेपत्ता होते. ते आता चार दिवसानंतर घरी परतले. ते कुठे गेले होते? का गेले होते? त्याची कारणे त्यांनी सांगितली.

श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यानंतर ते अज्ञातस्थळी गेले होते. त्यांना शिंदे गटाने पालघरमधून उमेदवारी नाकारली होती. चार दिवस बेपत्ता राहिल्यानंतर परतले. बॉडीगार्ड नव्हते. कुठे होते माहीत नव्हते. पण बुधवारी त्यांनी घरच्यांशी संपर्क केला होता. नातेवाईकांकडे असल्याचे त्यांनी सांगितलं होते.

कुठे गेले होते श्रीनिवास वनगा

मी दोन दिवस बाहेर होतो. मी नातेवाईकांकडे होतो. घराच्या आसपासच होतो. मला अपेक्षा होती पालघर किंवा डहाणूत उमेदवारी मिळेल. मी नाराज होतो. भावनेतून बोललो. मी ठाकरे गटाच्या संपर्कात नव्हतो. रागाच्या भरात मी नातेवाईकांकडे गेलो होतो, असे श्रीनिवास वनगा यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सांगितले.

श्रीनिवास वनगा आता उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे का? त्यावर ते म्हणाले, मी सध्या कोणाला भेटणार नाही. माझी भूमिका काही नाही. फक्त शंभुराजेंशी मी बोललो. माझे तिकीट कापण्यासाठी काही लोकांनी षडयंत्र रचले. मी प्रामाणिक होतो. माझा बळी घेणाऱ्यांवर शिंदे साहेबांनी कारवाई करावी, हीच माझी अपेक्षा आहे. शिंदे साहेब जे सांगतील ते मी करेल.

विधान परिषदेची आशा नाही

आपला बळी कोणी घेतला, त्यांची नावे वनगा यांनी सांगितली. ते म्हणाले, जिल्हा प्रमुख कुंदन संख्ये, राजेंद्र गावित यांनी माझा बळी घेतला आहे. साहेब त्यांच्यावर कारवाई करतील अशी खात्री आहे. मी प्रामाणिक राहून काम करेल. कालपासून मुलाची तब्येत बरी नाही. प्रामाणिकतेचे राजकारणात काम नाही. मला माझ्या कुटुंबासाठी जगायचे आहे. राजकीय भूमिका काय घेणार? हे पुढे बघेन, असे ते म्हणाले. मला विधान परिषदेची आशा नाही, असे त्यांनी म्हटले.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.