AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अद्वय हिरेंवर दादा भुसेंच्या गुंडांकडून हल्ला, ठार मारण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut on Vidhansabha Election 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. महाविकास आघाडीबाबतही त्यांनी महत्वाचं विधान केलं आहे. वाचा सविस्तर बातमी...

अद्वय हिरेंवर दादा भुसेंच्या गुंडांकडून हल्ला, ठार मारण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा गंभीर आरोप
संजय राऊत, खासदारImage Credit source: ANI
| Updated on: Oct 29, 2024 | 10:42 AM
Share

राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. अशातच नाशिकच्या मालेगावमधून धक्कादायक बातमी समोर आली. मालेगाव शहरात शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते, मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अद्वय हिरे यांच्यावर हल्ला झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अद्वय हिरे मालेगावातील एका कार्यकर्त्याच्या घरी गेले होते. यावेळी बाहेरून काही गुंडांनी त्यांच्यावर दगडफेक केली. त्यांना धमकावलं, अशी तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. अद्वय हिरेंवर दादा भुसेंच्या गुंडांकडून हल्ला करण्यात आला आहे. ठार मारण्याचा प्रयत्न झाला, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे.

संजय राऊतांचे गंभीर आरोप

पराभवाच्या भीतीने शिंदे गटाचे लोक अस्वस्थ झालेत. अनेक ठिकाणी आमच्या उमेदवारांना धमक्या दिल्या जात आहेत. पोलिसांकडून दबाव आणला जात आहे. खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. खोटे गुन्हे दाखल केले जात आहे. यात नाशिकचे पोलीस आयुक्त सुद्धा सामील आहेत. काल संध्याकाळी मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचे आमचे उमेदवार डॉ. अद्वय हिरे यांच्यावर दादा भुसे यांच्या गुंडांनी हल्ला केला. हिरे प्रचार करत असताना त्यांच्या गाड्यांवर हल्ला केला. त्यांच्याजवळ तलवारी, गावठी पिस्तुल होते. अद्वय हिरे यांना ठार मारण्याच्या दृष्टीनेच हा हल्ला झाला, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

कालच्या हल्ल्यात आमचे पाच शिवसैनिक जखमी झाले आहेत. पोलिसांनी या संदर्भात अजूनही ठोस कारवाई केलेली नाही. हे प्रकरण फक्त मालेगाव बाह्य मतदारसंघापुरतं मर्यादित नाही. असं जर पोलीस यंत्रणेचा वापर करून हल्ले होत असतील. तर यांना महाराष्ट्रात शांततेत निवडणूक होऊ द्यायची नाही हे स्पष्ट होत आहे, असं राऊत म्हणाले.

महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांची निवडणुकीच्या आधी बदली करावी. अशी आमची मागणी याचसाठी होती. कारण पोलीस यंत्रणा ही एका पक्षाच्या कामाला जुंपलेली आहे. त्यामुळे निवडणूक स्वच्छ वातावरणात होणार नाहीत, हा आमचा अंदाज खरा ठरताना दिसतोय, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

Follow Us
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर....
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर.....
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या...
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या....
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....