AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…म्हणून आदित्य ठाकरे यांच्या पोटात दुखत आहे, दीपक केसरकर यांनी सुनावले

मुंबईतील जीवन बदलत आहे, तर आमचं काय होणार. हा विचार तुम्हाला पिळतोय. म्हणून तुमची ही आदळ आपट चालली आहे.

...म्हणून आदित्य ठाकरे यांच्या पोटात दुखत आहे, दीपक केसरकर यांनी सुनावले
दीपक केसरकरImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 14, 2023 | 5:16 PM
Share

मुंबई : मुंबईतील (Mumbai) रस्त्यांच्या कंत्राटावर काल आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली. विशिष्ट कंत्राटदारांना काम दिल्याचाही आरोप त्यांनी केला. शिवाय लोकप्रतिनिधी नसताना टेंडर कसे निघाले, असे विविध प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारले. त्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar ) म्हणाले, कोस्टल रोडवर मार्केट रेटच्या बरोबर रेट आणले. १२ टक्के जास्त झालं. त्यावेळी तुम्हाला हे कळलं नाही. त्याठिकाणी दर्जेदार काम व्हावं म्हणून निर्णय घेतला आहे. सगळ्यात चांगल्या एजंसीला काम दिलं. देशात सर्वोत्कृष्ट काम त्यांनी केलेली आहेत.अशाच लोकांची स्पर्धा होती. बराच वेळ ही स्पर्धा चालली. तेथे कोणीही सहभागी होऊ शकत होतं.

…तर आमचं काय होणार

ही कामं होऊन मुंबई खड्डेमुक्त झाली तर आमचं काय होणार. मुंबईत चांगले दवाखाने होत आहेत. ते झाले तर आमचं काय होणार. मुंबईत चांगले सौदर्यीकरण होत आहे. मुंबईतील जीवन बदलत आहे, तर आमचं काय होणार. हा विचार तुम्हाला पिळतोय. म्हणून तुमची ही आदळ आपट चालली आहे. असा टोला आदित्य ठाकरे यांना लगावला.

ठाकरे गटाने ग्रामपंचायतीपासून धसका घेतला आहे. ग्रामपंचायतीमध्ये ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. पहिल्या क्रमांकावर भाजप आली. दुसऱ्या क्रमांकावर बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि नंतर उद्धव ठाकरे (उबाठा) यांनी शिवसेना होती. उबाठा सेना होती.

अनेकांशी सोयरिक करण्याचा प्रयत्न

वेगवेगळ्या ठिकाणी सोयरिक शोधले जात आहेत. अनेक लोकांशी सोयरिक करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. ते चिंतेत आले असतील. त्यामुळं यांना घाई झाली असेल. निवडणुका लवकर घ्या, असं त्यांना वाटत असेल, असंही दीपक केसरकर यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात. तेव्हा मुंबईची जनता त्यांच्या स्वागतासाठी सज्ज असते. मोठं-मोठे प्रकल्पांचे मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. हा मुंबईकरांचा कार्यक्रम आहे. मोठ्या प्रमाणात मुंबईकर येतील. लोकांना दिलासा देणारा हा कार्यक्रम आहे. अनेक मोठ्या प्रकल्पांची उद्धाटनं, भूमिपूजनं होणार आहेत. अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली.

काहीही केलं तरी आम्ही ते ठरविलं होतं. पण, आम्ही ते करू शकलो नाही. ४-५ महिन्यात कोणी काही करत असेल, तर त्यामागे मेहनत असते. ती मेहनत कोणीतरी करते. याबद्दल कोणीही पोटदुखी करून घेऊ नये, असंही दीपक केसरकर यांनी म्हंटलं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.