AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची करा बदली ; राजकारणाच्या आखाड्यात काय आहे हा वाद तरी?

DGP Rashmi Shukla Nana Patole : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी या महिन्यात मतदान होईल. आता राजकीय आखाडा तापला आहे. एक डाव, प्रति डाव टाकण्यात येत आहेत. अनेक पहिलवान अंगाला तेल लावून कसरती दाखवत आहेत. काँग्रेसने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे.

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची करा बदली ; राजकारणाच्या आखाड्यात काय आहे हा वाद तरी?
रश्मी शुक्ला यांना हटवा
| Updated on: Nov 01, 2024 | 11:08 AM
Share

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashatra Vidhansabha Election 2024) रणधुमाळी आता रंगात आली आहे. अर्ज माघारी घेण्याचा सोपास्कार पार पडला की चित्र स्पष्ट होईल. मग राज्यात सभांचा धडाका सुरू होईल. गुलाल भाळी लावून अनेक राजकीय पहिलवान मैदानात उतरतील. पण त्यापूर्वीच राजकीय आखाडा तापता ठेवण्याचे कसब पणाला लावण्यात येत आहे. राज्यात आचार संहिता लागू झाल्यानंतर गुरुवारी 28 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यातील 15 अदिकार हे मुबंईतील आहेत. पोलीस महासंचालकांनी राज्यभरातील 300 हून अधिक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. पण राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याच बदलीसाठी काँग्रेस अडून बसली आहे. राज्यात त्यांच्या बदलीचा मुद्दा का तापला आहे.

डीजीपी हटाव; निवडणूक बचाव

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पण काँग्रेस डीजीपी, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या बदलीसाठी अडून बसली आहे. 20 नोव्हेंबरपूर्वी त्यांची बदली करण्याची मागणी काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्या एक वादग्रस्त अधिकारी असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला यांच्या बदलीसाठी आयोगाला पत्र पाठवले आहे. त्या जोपर्यंत या पदावर आहेत, तोपर्यंत राज्यात निष्पक्ष निवडणूक होणे अवघड असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगावर काँग्रेसचा निशाणा

नाना पटोले यांनी यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगावर निशाणा साधला. रश्मी शुक्ला यांच्या मागणीकडे आयोगाने कानाडोळा केला. पण पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये भाजपने ज्या अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी केली. तिथे आयोगाने लगेच मान तुकवल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने 24 सप्टेंबर आणि 4 ऑक्टोबर रोजी शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली होती. पण अद्याप ही त्यावर प्रक्रिया झाली नसल्याचे पटोले यांचे म्हणणे आहे.

वादग्रस्त अधिकाऱ्याला हटवणे आवश्यक

रश्मी शुक्ला यांनी कायम विरोधी पक्ष आणि त्यांच्या नेत्याने लक्ष्य केले आहे. त्यांना जाच दिल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे. विरोधकांच्या फोन टॅपिंग प्रकरणात त्यांचा सक्रिय सहभाग असल्याचे ते म्हणाले. अशा वादग्रस्त अधिकाऱ्याला मोठ्या पदावरून हटवणे आवश्यक असल्याची वकिली त्यांनी केली. त्या सत्ताधाऱ्यांना मदत करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. यावर अजून निवडणूक आयोगाने मत व्यक्त केलेले नाही.

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.