AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | एमआयएमच्या आंदोलनामुळे शहरातील उद्योजकांनी व्यक्त केली भीती, मुख्यमंत्र्यांना लिहिलंय पत्र!

औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर असं झाल्यानंतर एमआयएमनं आंदोलन सुरु केलंय. गटामुळं शहराचं वातावरण खराब होत असल्याची भीती उद्योजकांनी व्यक्त केलीय.

Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | एमआयएमच्या आंदोलनामुळे शहरातील उद्योजकांनी व्यक्त केली भीती, मुख्यमंत्र्यांना लिहिलंय पत्र!
| Updated on: Mar 12, 2023 | 12:20 AM
Share

मुंबई : औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर असं केल्यापासून एमआयएमनं आंदोलन सुरु केलंय. या आंदोलनामुळं शहराचं वातावरण खराब होत असल्याचा आरोप उद्योजकांनी केलाय. उद्योजकांनी याबाबत राज्य सरकारला पत्र लिहिलंय.

औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर असं झाल्यानंतर एमआयएमनं आंदोलन सुरु केलंय. याच आंदोलनामुळं आणि त्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या एका गटामुळं शहराचं वातावरण खराब होत असल्याची भीती उद्योजकांनी व्यक्त केलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या उद्योजकांनी पत्र लिहिलंय.

उद्योजकांनी शहराचं वातावरण बिघडत असल्यावरुन सरकारला पत्र लिहिलं असलं तरी जलील मात्र आंदोलनावर ठाम आहेत. त्यांनी उद्योजकांनाच नामांतराबाबतची भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान दिलंय. या उद्योजकांना भाजप नेते भागवत कराड यांची फूस असल्याचा आरोपही जलील यांनी केलाय. नामांतराविरोधात एमआयएमनं आंदोलन सुरु केल्यापासून शहर अस्वस्थ असल्याचा आरोप होतोय.

एमआयएमच्या 3 मार्चला आंदोलनात औरंगजेबाचा फोटो झळकवण्यात आला. 4 मार्चला साखळी उपोषणात बिर्याणीवर ताव मारला गेला. 5 मार्चला घोषणा करत रस्त्यात धुडगूस घालण्यात आला. 6 मार्चला चिकलठाणा भागातल्या एका चौकाला औरंगजेबाचं नाव देण्यात आलं. जे पोलिसांनी नंतर हटवलं. 9 मार्चला विनापरवानगी कँडल मार्च काढण्य़ात आला आणि आता येत्या काही दिवसात आणखी कँडल मार्च काढणार असल्याचं एमआयएमनं सांगितलंय.

एमआय़एमच्या कार्यकर्त्यांनी साखळी उपोषणाची घोषणा करुन त्यात बिर्याणीवर ताव मारला. पण आपण साखळी उपोषणाची घोषणाच केली नसल्याचं म्हणत जलील यांनी यू-टर्न घेतलाय. औरंगाबाद शहराच्या शांततेवरून इम्तियाज जलील आणि उद्योजक यांच्यामध्ये वार प्रतिवार सुरू आहेत. मात्र उद्योजकांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे छत्रपती संभाजीनगरमधल्या शांततेवर चर्चा सुरु झालीय. या चर्चेनंतर तरी किमान शहरातील शांततेचा प्रश्न निकाली निघावा हीच अपेक्षा सर्वसामान्य करु लागलेयत.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.