AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | एमआयएमच्या आंदोलनामुळे शहरातील उद्योजकांनी व्यक्त केली भीती, मुख्यमंत्र्यांना लिहिलंय पत्र!

औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर असं झाल्यानंतर एमआयएमनं आंदोलन सुरु केलंय. गटामुळं शहराचं वातावरण खराब होत असल्याची भीती उद्योजकांनी व्यक्त केलीय.

Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | एमआयएमच्या आंदोलनामुळे शहरातील उद्योजकांनी व्यक्त केली भीती, मुख्यमंत्र्यांना लिहिलंय पत्र!
| Updated on: Mar 12, 2023 | 12:20 AM
Share

मुंबई : औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर असं केल्यापासून एमआयएमनं आंदोलन सुरु केलंय. या आंदोलनामुळं शहराचं वातावरण खराब होत असल्याचा आरोप उद्योजकांनी केलाय. उद्योजकांनी याबाबत राज्य सरकारला पत्र लिहिलंय.

औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर असं झाल्यानंतर एमआयएमनं आंदोलन सुरु केलंय. याच आंदोलनामुळं आणि त्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या एका गटामुळं शहराचं वातावरण खराब होत असल्याची भीती उद्योजकांनी व्यक्त केलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या उद्योजकांनी पत्र लिहिलंय.

उद्योजकांनी शहराचं वातावरण बिघडत असल्यावरुन सरकारला पत्र लिहिलं असलं तरी जलील मात्र आंदोलनावर ठाम आहेत. त्यांनी उद्योजकांनाच नामांतराबाबतची भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान दिलंय. या उद्योजकांना भाजप नेते भागवत कराड यांची फूस असल्याचा आरोपही जलील यांनी केलाय. नामांतराविरोधात एमआयएमनं आंदोलन सुरु केल्यापासून शहर अस्वस्थ असल्याचा आरोप होतोय.

एमआयएमच्या 3 मार्चला आंदोलनात औरंगजेबाचा फोटो झळकवण्यात आला. 4 मार्चला साखळी उपोषणात बिर्याणीवर ताव मारला गेला. 5 मार्चला घोषणा करत रस्त्यात धुडगूस घालण्यात आला. 6 मार्चला चिकलठाणा भागातल्या एका चौकाला औरंगजेबाचं नाव देण्यात आलं. जे पोलिसांनी नंतर हटवलं. 9 मार्चला विनापरवानगी कँडल मार्च काढण्य़ात आला आणि आता येत्या काही दिवसात आणखी कँडल मार्च काढणार असल्याचं एमआयएमनं सांगितलंय.

एमआय़एमच्या कार्यकर्त्यांनी साखळी उपोषणाची घोषणा करुन त्यात बिर्याणीवर ताव मारला. पण आपण साखळी उपोषणाची घोषणाच केली नसल्याचं म्हणत जलील यांनी यू-टर्न घेतलाय. औरंगाबाद शहराच्या शांततेवरून इम्तियाज जलील आणि उद्योजक यांच्यामध्ये वार प्रतिवार सुरू आहेत. मात्र उद्योजकांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे छत्रपती संभाजीनगरमधल्या शांततेवर चर्चा सुरु झालीय. या चर्चेनंतर तरी किमान शहरातील शांततेचा प्रश्न निकाली निघावा हीच अपेक्षा सर्वसामान्य करु लागलेयत.

Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....