AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | एमआयएमच्या आंदोलनामुळे शहरातील उद्योजकांनी व्यक्त केली भीती, मुख्यमंत्र्यांना लिहिलंय पत्र!

औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर असं झाल्यानंतर एमआयएमनं आंदोलन सुरु केलंय. गटामुळं शहराचं वातावरण खराब होत असल्याची भीती उद्योजकांनी व्यक्त केलीय.

Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | एमआयएमच्या आंदोलनामुळे शहरातील उद्योजकांनी व्यक्त केली भीती, मुख्यमंत्र्यांना लिहिलंय पत्र!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Mar 12, 2023 | 12:20 AM
Share

मुंबई : औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर असं केल्यापासून एमआयएमनं आंदोलन सुरु केलंय. या आंदोलनामुळं शहराचं वातावरण खराब होत असल्याचा आरोप उद्योजकांनी केलाय. उद्योजकांनी याबाबत राज्य सरकारला पत्र लिहिलंय.

औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर असं झाल्यानंतर एमआयएमनं आंदोलन सुरु केलंय. याच आंदोलनामुळं आणि त्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या एका गटामुळं शहराचं वातावरण खराब होत असल्याची भीती उद्योजकांनी व्यक्त केलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या उद्योजकांनी पत्र लिहिलंय.

उद्योजकांनी शहराचं वातावरण बिघडत असल्यावरुन सरकारला पत्र लिहिलं असलं तरी जलील मात्र आंदोलनावर ठाम आहेत. त्यांनी उद्योजकांनाच नामांतराबाबतची भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान दिलंय. या उद्योजकांना भाजप नेते भागवत कराड यांची फूस असल्याचा आरोपही जलील यांनी केलाय. नामांतराविरोधात एमआयएमनं आंदोलन सुरु केल्यापासून शहर अस्वस्थ असल्याचा आरोप होतोय.

एमआयएमच्या 3 मार्चला आंदोलनात औरंगजेबाचा फोटो झळकवण्यात आला. 4 मार्चला साखळी उपोषणात बिर्याणीवर ताव मारला गेला. 5 मार्चला घोषणा करत रस्त्यात धुडगूस घालण्यात आला. 6 मार्चला चिकलठाणा भागातल्या एका चौकाला औरंगजेबाचं नाव देण्यात आलं. जे पोलिसांनी नंतर हटवलं. 9 मार्चला विनापरवानगी कँडल मार्च काढण्य़ात आला आणि आता येत्या काही दिवसात आणखी कँडल मार्च काढणार असल्याचं एमआयएमनं सांगितलंय.

एमआय़एमच्या कार्यकर्त्यांनी साखळी उपोषणाची घोषणा करुन त्यात बिर्याणीवर ताव मारला. पण आपण साखळी उपोषणाची घोषणाच केली नसल्याचं म्हणत जलील यांनी यू-टर्न घेतलाय. औरंगाबाद शहराच्या शांततेवरून इम्तियाज जलील आणि उद्योजक यांच्यामध्ये वार प्रतिवार सुरू आहेत. मात्र उद्योजकांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे छत्रपती संभाजीनगरमधल्या शांततेवर चर्चा सुरु झालीय. या चर्चेनंतर तरी किमान शहरातील शांततेचा प्रश्न निकाली निघावा हीच अपेक्षा सर्वसामान्य करु लागलेयत.

Follow Us
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा, शिंदे, चाकणकर अन्..
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आला समोर
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला... बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
मोठी बातमी! प्रवाशांचा श्वास गुदमरला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्रेस
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा...
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत...
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत... बड्या नेत्याने एक एक करत सगळंच सांगितलं
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री; त्याला सगळंच... डोकं चक्रावणारा खुलासा
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन नेत्यांमध्ये रुसवारुसवी... कारण अत्यंत चकित करणार
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची ऑफर?