AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गंडेदोरे, ताईतवाल्या सरकार विरोधात रान उठवावं लागेल; ‘सामना’तून जोरदार हल्ला

कर्नाटकाच्या मुद्द्यावरून दैनिक सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार हल्ला करण्यात आला आहे. कर्नाटकने अरे केल्यास कारे ने उत्तर देऊ असं भाजपने म्हटलं आहे.

गंडेदोरे, ताईतवाल्या सरकार विरोधात रान उठवावं लागेल; 'सामना'तून जोरदार हल्ला
गंडेदोरे, ताईतवाल्या सरकार विरोधात रान उठवावं लागेल; सामनातून जोरदार हल्ला Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 05, 2022 | 10:45 AM
Share

मुंबई: शिवरायांचा अपमान आणि जनता गेली उडत असं कोणाला वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. हा भ्रमाचा भोपळा लवकरच फुटेल, असा इशारा देतानाच नरसिंह होऊन खोके सरकारचा अंत करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी विरोधी पक्षाने एकत्र यायला हवं. अरे ला कारे म्हणजे नक्की काय हे दाखवण्यासाठी हिंमतबाज मर्दांचे मनगट लागते. ते लवकरच दिसेल, असा इशाराच ठाकरे गटाने राज्य सरकारला दिला आहे. दैनिक सामनातील अग्रलेखातून हा इशारा देण्यात आला आहे.

कर्नाटकाच्या मुद्द्यावरून दैनिक सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार हल्ला करण्यात आला आहे. कर्नाटकने अरे केल्यास कारे ने उत्तर देऊ असं भाजपने म्हटलं आहे. हे भाजपचं ढोंग आहे. भाजपमध्ये तेवढी हिंत असती तर भाजपवाल्यांनी बेळगावात घुसून बोम्मईचे थोबाड रंगवले असते, असा हल्लाबोल सामनातून करण्यात आला आहे.

जे लोक शिवाजी महाराजांचा अवमान निमूटपणे सहन करतात ते कारे ची भाषा करतात हाच एक विनोद आहे. शिंदे-फडणवीस सरकार हे चाळीस खोकेबाज आमदार आणि बिल्डर मित्रांसाठी सुरू आहे, असा आरोपही करण्यात आला आहे.

एखादे सरकार रामभरोसे चालत असते. मात्र, राज्यातील मिंधे सरकार हे नवस-आवस, तंत्र-मंत्र यावर चालले आहे. त्यामुळे राज्यातील विरोधी पक्षाला या गंडे दोरे ताईतवाल्या सरकारविरोधात रान उठवावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

शिंदे फडणवीस सरकारने कानडी मुख्यमंत्र्यांच्या मनमानीपुढे बुळचट धोरण स्वीकारले आहे. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी रोज सकाळी उठून महाराष्ट्राला बेईज्जत करण्याचा जाहीर कार्यक्रम सुरू केला आहे. विरोधी पक्षांना एकत्र वज्रमुठीचा ठोसा मारावा लागेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

राज्यात एकापेक्षा एक तज्ज्ञ आणि आर्थिक क्षेत्रातील जाणार, उद्योग क्षेत्रातील महारथी असताना मुख्यमंत्र्यांनी नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन केलेल्या संस्थेवर अजय आशर यांची नियुक्ती केली. अजय आशर यांच्यासाठीच ही संस्था काढल्याचं दिसत आहे. अजय आशर हे या खोके सरकारचे टेकू आहेत. म्हणूनच त्यांची नियुक्ती केल्याची टीकाही करण्यात आली आहे.

Follow Us
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं.
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय...
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय....
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं.
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....