AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीडचा कटप्पा कोण? शिवगामी कोण? बल्लालदेव कोण, हे पाहावं लागेल, अंजली दमानिया यांचा मोठा सूचक इशारा

Anjali Damania big Statement : बीड जिल्ह्यातील राजकारणात बाहुबली, कटप्पा, शिवगामी, बल्लालदेव कोण हे पाहावं लागेल असं सूचक वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले. त्यामुळे राजकारणात आता नवीन वादळं तर येणार नाही ना? अशी चर्चा रंगली आहे.

बीडचा कटप्पा कोण? शिवगामी कोण? बल्लालदेव कोण, हे पाहावं लागेल, अंजली दमानिया यांचा मोठा सूचक इशारा
अंजली दमानिया
| Edited By: | Updated on: Feb 06, 2025 | 12:31 PM
Share

बीड जिल्ह्यातील राजकारणात बाहुबली, कटप्पा, शिवगामी, बल्लालदेव कोण हे पाहावं लागेल असं सूचक वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले. बीडमधील आष्टीतील एका कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे यांनी आपण शिवगामीच्या भूमिकेत असल्याचे तर देवेंद्र फडणवीस हे बाहुबली असल्याचे वक्तव्य केले होते. गेल्या दोन दिवसांपासून खून, घोटाळ्याने बीड जिल्हा राज्याच्याच नाही तर देशाच्या नकाशावर आला आहे. त्यातच आता दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात आरोपांची मालिका सुरू झाल्यानंतर राजकारणात आता नवीन वादळं तर येणार नाही ना? अशी चर्चा रंगली आहे.

धनंजय मुंडेंवर पु्न्हा डागली तोफ

धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना पावणे तीनशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. हे आरोप मुंडे यांनी फेटाळले. त्या बदनामिया असल्याचा आरोप केला. त्यानंतर आज अंजली दमानिया यांनी त्यांच्या आरोपांना, दाव्यांना पुष्टी देण्यासाठी थेट त्या उत्पादनाची ऑनलाईन खरेदीची करून दाखवली आणि मुंडे कसे खोटे बोलत आहेत, ते मांडण्याचा प्रयत्न केला.

ब्रँड स्प्रे, आणि इफकोचा नॅनो युरियाचे काही प्रोडक्ट विकच घेतले , १८४ रुपये लिटर पडले, सरकारने ह्या बाटल्या २२० रुपयाने विकत घेतल्या, असे त्यांनी या खरेदीतून दाखवले. शेतकर्‍यांचे पैसे खाल्ले, वाल्मिक कराडला मोठं केलं, संतोष देशमुख यांचा जीव गेला, असे अर्थकारण, सत्ताकारण आणि राजकारणाचे पदर त्यांनी उलगडले.

ही तर दहशत माजवण्याचा प्रकार

वाल्मिक कराडच्या बातम्या पाहिल्या म्हणून अशोक मोहिते नावाच्या तरूणाला मारहाण झाली हे संतापजनक आहे, हेच वाढदिवसाचे स्टेटस ठेवत आहेत, हे साफ चुकीचं आहे. ही दहशत माजवण्याचा प्रकार आहे, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला.

अशोक मोहितेला मारहाण करणारे तरुण आरोपी कृष्णा आंधळेचे मित्र आहेत. वैजनाथ बांगर, अभिषेक सानपच्या स्टेटसवर आंधळेचा फोटो ठेवला. दोन्ही तरुणांनी कृष्णा आंधळेच्या वाढदिवसानिमित्त स्टेटस ठेवलेलं आहेत हा प्रकार संतापजनक आहे. आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप दमानिया यांनी केला.

धनंजय मुंडेवर कारवाई का नाही?

धनंजय मुंडेंनी कोणतीच कारवाई नाही का तर ते राज्यातील दोन मोठ्या नेत्यांचे जवळचे मित्र आहेत, असा खळबळजनक दावा त्यांनी केला. मनोज जरांगे हे पण याबाबत बोलत आहेत ही मोठी गोष्ट आहे. विष्णू चाटेनी बड्या नेत्याला फोन केल्याचा, संशय आहे हे आधीच सांगितलं आहे. विष्णू चाटेने धनंजय मुंडेंना फोन केला का? हा महत्वाचा विषय आहे, असे दमानिया म्हणाल्या.

दमानियांचे मोठे संकेत

बीडचा कटप्पा कोण ? हे पाहावं लागेल, शिवगामी कोण? बल्लालदेव कोण असे सगळे प्रकार संतापजनक आहे.बीडमध्ये जे राजकारण सुरू आहे ते चुकीचं आहे. राजकारणी एकमेकांना मदत करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. बीड जिल्ह्यातील राजकारणात बाहुबली, कटप्पा, शिवगामी, बल्लालदेव कोण हे पाहावं लागेल असं सूचक वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले. त्यामुळे राजकारणात आता नवीन वादळं तर येणार नाही ना? अशी चर्चा रंगली आहे.

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.