AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत ठाकरे बंधू का पिछाडीवर? त्यांचा कारभार जवळनं बघणाऱ्या मंत्र्याने सांगितलं खरं कारण

मुंबई महानगरपालिकेत ठाकरे बंधू पिछाडीवर का राहिले, यामागचं कारण एका मोठ्या मंत्र्याने सांगितलं आहे. मुंबई महापालिकेसाठी राज आणि उद्धव ठाकरे यांनी युती केली. मराठी माणूस आणि मुंबई या मुद्द्यांवर दोघं एकत्र आले.

मुंबईत ठाकरे बंधू का पिछाडीवर? त्यांचा कारभार जवळनं बघणाऱ्या मंत्र्याने सांगितलं खरं कारण
Uddhav and Raj ThackerayImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 16, 2026 | 3:52 PM
Share

मुंबई महापालिकेतील 227 जागांपैकी 130 जागांवर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती आघाडीवर आहे. तर ठाकरे बंधू 72 जागांवर आघाडीवर आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र आले. परंतु ठाकरे बंधूंना निकालात मोठा फटका बसल्याचं पहायला मिळतंय. यामागचं कारण एकेकाळी ठाकरे बंधूंचा कारभार जवळून बघणारे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं आहे. मुंबईकरांनी ठाकरे बंधूंना नाकारल्याची बरीच कारणं आहेत, असं ते म्हणाले.

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीचा बोलबाला आहे. काम आणि जनतेशी असलेला सक्रियपणा याला लोक स्वीकारतात. त्या पद्धतीचा कौल लोकांनी मुंबईत दिला. मराठी सर्वच आहेत, पण आमच्याकडून निवडून येणारा महापौर मराठी आणि हिंदूच होणार,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ठाकरे बंधूंच्या पराभवाबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले, “मुंबईकरांनी ठाकरे बंधूंना नाकारल्याची बरीच कारणं आहेत. ती एका वाक्यात सांगता येणार नाहीत. विकास आणि सुविधा जे कोणी देत असतील त्याला लोक स्वीकारतात हे मुंबईने सिद्ध केलं. ठाकरे बंधूंच्या पराभवाचं कारण त्यांचा निष्क्रियपणा आहे. मतदान आलं की सक्रिय होऊन चालत नाही. 24 तास लोकांमध्ये राहावं लागतं. राजकारणात निष्क्रियपणा सोडावा लागतो. जो सक्रिय राहील तोच जीवनात चालत राहील.”

मी ठाकरे बंधूंना एवढाच सल्ला देईन की त्यांनी जमिनीवर राहून काम करावं, असं ते पुढे म्हणाले. दरम्यान जळगाव महापालिकेतील 75 पैकी बारा जागा बिनविरोध झाल्यामुळे 63 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. जळगाव मधील महायुतीच्या विजयानंतर मंत्री गुलाबराव पाटलांनी कार्यकर्त्यांसोबत जल्लोष केला. विजयी उमेदवारांसोबत त्यांनी ठेकासुद्धा धरला. जळगाव महापालिकेवर महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे.

मराठी माणूस आणि मुंबई या मुद्द्यांवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत युती केली. ‘फुटाल तर संपाल’ असं भावनिक आवाहन उद्धव ठाकरेंनी या निवडणुकीत केलं होतं. युतीमध्ये मनसेनं केवळ 53 जागा लढवण्याचा निर्णय घेतला होता.

Follow Us
गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू; मात्र डोंबिवलीजवळ घसरलेली लोकल रुळाव
गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू; मात्र डोंबिवलीजवळ घसरलेली लोकल रुळाव.
महिला आरक्षण विधेयकावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले "हे आधीच..
महिला आरक्षण विधेयकावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले
...तर मुख्यमंत्र्यांनाही माफी मागावी लागेल, महिला आरक्षणाबाबत संजय राऊ
...तर मुख्यमंत्र्यांनाही माफी मागावी लागेल, महिला आरक्षणाबाबत संजय राऊ.
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी.
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का.
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक.
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,.
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि.
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्.