AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार? कुठं शिजतोय कट? काय कारस्थान, उद्धव आणि राज ठाकरेंनी सांगितला तो प्लॅन…

Uddhav Thackeray Raj Thackeray Joint interview: मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार असा दावा पुन्हा ठाकरे बंधुंनी संयुक्त मुलाखतीत केला आहे. कालही हा मुद्दा समोर आला होता. तर आजही याविषयीचे मोठे भाष्य दोन्ही बंधुंनी केले. त्यांनी हे कारस्थान कुठं शिजतंय आणि कोण हे कारस्थान रचतंय याविषयीचा मोठा दावा केला आहे.

मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार? कुठं शिजतोय कट? काय कारस्थान, उद्धव आणि राज ठाकरेंनी सांगितला तो प्लॅन...
उद्धव ठाकरे, राज ठाकरे
| Updated on: Jan 09, 2026 | 10:26 AM
Share

Uddhav Thackeray Raj Thackeray Joint interview: मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा दावा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी केला. गेल्या काही दिवसातील दाखलेही त्यांनी साठी दिले. मुंबईसह महाराष्ट्रात हिंदी सक्तीचा प्रयोग ही एक चाचपणी होती की मराठी माणूस झोपला आहे की जागी आहे यासाठी ही चाचपणी करण्यात आल्याचे राज ठाकरे म्हणाले. त्याचवेळी मुलाखतीच्या दुसऱ्या भागातही मुंबई वेगळी करण्याचे कारस्थान सुरु असल्याचा दावा दोन्ही बंधुंनी केला. मुख्यमंत्र्यांच्या चंद्र-सूर्य असेपर्यंत मुंबई कोणीही तोडू शकणार नाही या दाव्याचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला.

मुंबई तोडण्याचे कारस्थान दिल्लीत

या मुलाखतीत दोन्ही बंधुंनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान सुरु असल्याचा पुन्हा दावा केला. कालही त्यांनी असाच दावा केला होता. तर यापूर्वी सुद्धा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबई आणि आजूबाजूचा परिसर वेगळा करण्याचे कारस्थान सुरु असल्याचा दावा केला होता. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान दिल्लीत सुरू आहे. त्यामुले मुख्यमंत्री फडणवीस इकडे काय बोलतात त्याला महत्त्व नाही. वर दोघेजण बसलेत त्यांच्या मनात वेगळेच आहे असा दावा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत केला.

मुख्यमंत्र्‍यांच्या वक्तव्याचा घेतला समाचार

सूर्य-चंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले, त्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सडतोड मत मांडलं. राज ठाकरे म्हणाले की मुख्यमंत्र्यांच्या हातात काहीच नाही. त्यांची इच्छा चांगली आहे. पण जे वरून म्हणजे दिल्लीतून सांगितलं जाणार तेच त्यांना ऐकावं लागणार. वरून सांगितलं की ही जमीन अदानीला द्यायची, तर त्यांच्यासमोर सही करण्याशिवाय पर्यायच नसतो. त्यामुळे वरंच्यांच्या मनात काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. इकडच्या लोकांच्या मनात काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. इकडच्या लोकांच्या मनात काय आहे हा विषयच येत नाही. Obey the Order एवढीच फक्त गोष्ट त्यांच्या हातात आहे. त्यामुळे त्यांनी चंद्र-सूर्याचे कितीही दाखले दिले तरी वरती जे बसलेले आहेत, मोदी आणि शहा त्यांच्या मनात काय आहे हे पहिल्यांदा आपल्याला कळणं गरजेचं आहे आणि ते कळतंय असे राज ठाकरे म्हणाले.

तर मुळात मुंबई महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही, पण ज्या पद्धतीने मुंबईची संस्कृती मारली जात आहे हे चिंताजनक असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. कोणीही येतो आणि सांगतो या भागाची भाषा गुजराथी आहे. आमच्यावर हिंदीची सक्ती करणार. म्हणजेच तुम्ही आमची सगळीच अस्मिता व संस्कृती मारणार आणि केवळ नावालाच मुंबई महाराष्ट्रात ठेवणार का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

यावेळी मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात सुरु असलेल्या विकास कामांमागे काय सुप्त हेतू आहे यावरही दोन्ही बंधूंनी भाष्य केले. वाढवण बंदर आणि नवीन मुंबई विमानतळाविषयी राज ठाकरे यांनी भाष्य केलं. तर पालघर, ठाणे परिसरात सुरु असलेल्या विविध विकास योजना या मराठी माणसांसाठी आहेत की इतर कुणासाठी याबाबत ठाकरे बंधुंनी मोठे भाष्य केले. हा भाग गुजरातच्या जवळ असल्याने तिकडे हे उद्योग सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत