AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार? कुठं शिजतोय कट? काय कारस्थान, उद्धव आणि राज ठाकरेंनी सांगितला तो प्लॅन…

Uddhav Thackeray Raj Thackeray Joint interview: मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार असा दावा पुन्हा ठाकरे बंधुंनी संयुक्त मुलाखतीत केला आहे. कालही हा मुद्दा समोर आला होता. तर आजही याविषयीचे मोठे भाष्य दोन्ही बंधुंनी केले. त्यांनी हे कारस्थान कुठं शिजतंय आणि कोण हे कारस्थान रचतंय याविषयीचा मोठा दावा केला आहे.

मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार? कुठं शिजतोय कट? काय कारस्थान, उद्धव आणि राज ठाकरेंनी सांगितला तो प्लॅन...
उद्धव ठाकरे, राज ठाकरे
| Updated on: Jan 09, 2026 | 10:26 AM
Share

Uddhav Thackeray Raj Thackeray Joint interview: मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा दावा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी केला. गेल्या काही दिवसातील दाखलेही त्यांनी साठी दिले. मुंबईसह महाराष्ट्रात हिंदी सक्तीचा प्रयोग ही एक चाचपणी होती की मराठी माणूस झोपला आहे की जागी आहे यासाठी ही चाचपणी करण्यात आल्याचे राज ठाकरे म्हणाले. त्याचवेळी मुलाखतीच्या दुसऱ्या भागातही मुंबई वेगळी करण्याचे कारस्थान सुरु असल्याचा दावा दोन्ही बंधुंनी केला. मुख्यमंत्र्यांच्या चंद्र-सूर्य असेपर्यंत मुंबई कोणीही तोडू शकणार नाही या दाव्याचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला.

मुंबई तोडण्याचे कारस्थान दिल्लीत

या मुलाखतीत दोन्ही बंधुंनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान सुरु असल्याचा पुन्हा दावा केला. कालही त्यांनी असाच दावा केला होता. तर यापूर्वी सुद्धा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबई आणि आजूबाजूचा परिसर वेगळा करण्याचे कारस्थान सुरु असल्याचा दावा केला होता. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान दिल्लीत सुरू आहे. त्यामुले मुख्यमंत्री फडणवीस इकडे काय बोलतात त्याला महत्त्व नाही. वर दोघेजण बसलेत त्यांच्या मनात वेगळेच आहे असा दावा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत केला.

मुख्यमंत्र्‍यांच्या वक्तव्याचा घेतला समाचार

सूर्य-चंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले, त्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सडतोड मत मांडलं. राज ठाकरे म्हणाले की मुख्यमंत्र्यांच्या हातात काहीच नाही. त्यांची इच्छा चांगली आहे. पण जे वरून म्हणजे दिल्लीतून सांगितलं जाणार तेच त्यांना ऐकावं लागणार. वरून सांगितलं की ही जमीन अदानीला द्यायची, तर त्यांच्यासमोर सही करण्याशिवाय पर्यायच नसतो. त्यामुळे वरंच्यांच्या मनात काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. इकडच्या लोकांच्या मनात काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. इकडच्या लोकांच्या मनात काय आहे हा विषयच येत नाही. Obey the Order एवढीच फक्त गोष्ट त्यांच्या हातात आहे. त्यामुळे त्यांनी चंद्र-सूर्याचे कितीही दाखले दिले तरी वरती जे बसलेले आहेत, मोदी आणि शहा त्यांच्या मनात काय आहे हे पहिल्यांदा आपल्याला कळणं गरजेचं आहे आणि ते कळतंय असे राज ठाकरे म्हणाले.

तर मुळात मुंबई महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही, पण ज्या पद्धतीने मुंबईची संस्कृती मारली जात आहे हे चिंताजनक असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. कोणीही येतो आणि सांगतो या भागाची भाषा गुजराथी आहे. आमच्यावर हिंदीची सक्ती करणार. म्हणजेच तुम्ही आमची सगळीच अस्मिता व संस्कृती मारणार आणि केवळ नावालाच मुंबई महाराष्ट्रात ठेवणार का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

यावेळी मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात सुरु असलेल्या विकास कामांमागे काय सुप्त हेतू आहे यावरही दोन्ही बंधूंनी भाष्य केले. वाढवण बंदर आणि नवीन मुंबई विमानतळाविषयी राज ठाकरे यांनी भाष्य केलं. तर पालघर, ठाणे परिसरात सुरु असलेल्या विविध विकास योजना या मराठी माणसांसाठी आहेत की इतर कुणासाठी याबाबत ठाकरे बंधुंनी मोठे भाष्य केले. हा भाग गुजरातच्या जवळ असल्याने तिकडे हे उद्योग सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.

Follow Us
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल.
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला.
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?.
महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच उत्तर दिलं – मोदी
महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच उत्तर दिलं – मोदी.
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?.
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान.
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार.
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल.
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं.
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान.