AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ते पुन्हा एकत्र येणार…! अखेर आशिष देशमुख यांना मार्ग मिळाला, पक्षप्रवेशाचा कार्यक्रम ठरला

आशिष देशमुख यांना अखेर राजकीय मार्ग सापडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आशिष देशमुख यांच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. काँग्रेसमधून निलंबित करण्यात आल्यानंतर ते राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा होत्या. पण काही कारणास्तव तसं घडू शकलं नाही.

ते पुन्हा एकत्र येणार...! अखेर आशिष देशमुख यांना मार्ग मिळाला, पक्षप्रवेशाचा कार्यक्रम ठरला
| Updated on: Jun 14, 2023 | 9:48 PM
Share

नागपूर : विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकांआधी भाजपच्या केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधत आमदारकीचा राजीनामा देणारे नेते आशिष देशमुख यांच्याबद्दल महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आशिष देशमुख हे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काटोल मतदारसंघातून निवडून आले होते. पण आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकार हे शेतकरी विरोधी आहे, अशी टीका करत आमदारकी आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढले होते. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण आता पुन्हा पाच वर्षांनी ते भाजपात घरवापसी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आशिष देशमुख हे येत्या 18 जूनला भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी झाली होती. त्यानंतर ते आता भाजपात प्रवेश करणार आहेत. आशिष देशमुख हे भाजपच्या तिकीटावर काटोल किंवा सावनेर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

आशिष देशमुख यांचं काँग्रेसमधून निलंबन

आशिष देशमुख यांचं पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी काँग्रेसमधून निलंबन झालं आहे. काँग्रेसमधून निलंबन झाल्यानंतर आशिष देशमुख यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. त्यानंतर ते आता पुन्हा भाजपात प्रवेश करणार आहेत. देशमुख हे आधी भाजपातच होते. त्यांनी 2014 ची विधानसभा निवडणूक ही भाजपच्या तिकीटावर लढवली होती. पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी आपल्या आमदारकीचा आणि भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

गेल्या पाच वर्षांपासून ते काँग्रेसमध्ये आहेत. पण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर आता ते भाजपात प्रवेश करणार आहेत.

राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्यादेखील होत्या चर्चा

विशेष म्हणजे आशिष देशमुख भाजपात प्रवेश करण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. त्यांनी पक्षाच्या दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याची देखील माहिती समोर आली होती. पण त्यांना राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केल्याने त्यांचा पक्षप्रवेश होऊ शकला नाही.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.