AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक ! पूर्व विदर्भात सहा महिन्यांत तब्बल 290 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बळीराजाचे प्रश्न कधी सुटणार?

वर्षभरापासून पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत तब्बल 290 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. (vidarbha farmers suicide increase drought barrenness)

धक्कादायक ! पूर्व विदर्भात सहा महिन्यांत तब्बल 290 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बळीराजाचे प्रश्न कधी सुटणार?
सांकेतिक फोटो
| Updated on: Feb 27, 2021 | 10:40 AM
Share

नागपूर : दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या विदर्भात शेतकरी आत्महत्येविषयीची (farmers suicide) धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील वर्षभरापासून पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत तब्बल 290 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलीये. तसेच या भागात मागील दहा वर्षांत तब्बल 4612 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही आकडेवारी समोर आल्यानंतर शेतकऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.  (east farmers suicide increase due to drought and barrenness)

जानेवारी महिन्यात 290 शेतकऱ्यांची आत्महत्या

राज्यातील शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटाने कायम ग्रासलेला असतो. यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांची स्थिती तर जास्तच गंभीर आहे. पर्जन्यमान कमी असल्यामुळे या भागात पाण्याची प्रचंड टंचाई कायम असते. विदर्भात तर ही परिस्थिती अत्यंत भीषण आहे. पाऊसपाणी नसल्यामुळे येथील शेतकरी कायम त्रस्त असतात. तसेच, काबाडकष्ट करुन म्हणावा तसा पैसा न मिळाल्यामुळे येथील शेतकऱ्यांवर कर्जाचे डोंगर दिवसेंदिवस वाढतायत. परिणामी विदर्भात आर्थिक विवंचनेतून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. एकट्या पूर्व विदर्भात मागील सहा जिल्ह्यांमध्ये एकूण 290 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तसेच एकट्या जानेवारी महिन्यात तब्बल 22 शेतकऱ्यांनी गळफास घेतलाय. नापिकी, कर्जबाजारीपणा, आर्थिक विवंचना अशी विविध कारणं शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे आहेत.

कापूस, सोयाबीन, तूर संकटात

यंदा विदर्भात पर्जन्यमान कमी झाले. येथे प्रामुख्यांने कापूस, सोयाबीन, तूर आदी पिके घेतली जातात. मात्र, म्हणावा तसा पाऊस न झाल्यामुळे ही पिकं संकटात सापडली आहेत. त्यामुळे मागील सहा महिन्यांत तब्बल 290 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. मागच्या दवा वर्षांमधील हा आकडा पाहिल्यास तो हजारांमध्ये आहे. एकट्या पूर्व विदर्भात 10 वर्षांत तब्बल 4612 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

दरम्यान, राज्यात विदर्भच नव्हे तर इतरही भागातील शेतकरी सध्या त्रस्त आहेत. वाढीव वीजबिलामुळे राज्यातील अनेक शेतकरी  अडचणीत आहेत. तसेच नापिकी, अतिवृष्टी या सर्व गोष्टींमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्षाने शेतकऱ्यांच्या अडचणींवर सरकारला वेळोवेळी घेरण्याचा प्रयत्न केलाये. मात्र, अजूनही शेतकऱ्यांना म्हणावी तशी मदत होताना दिसत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न कधी सुटणार?, हा प्रश्न विचारण्यात येतोय.

इतर बातम्या:

मला नक्षलवादी व्हायचंय, हवालदिल शेतकऱ्याचं हिंगोली तहसीलदाराकडे निवेदन

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...