AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी 3 दिवसीय नागपूर दौऱ्यावर, अनेक भेटीगाठींचं नियोजन

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी 3 दिवसीय नागपूर दौऱ्यावर आहेत. ते आज (11 जून) नागपुरात दाखल झाले.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी 3 दिवसीय नागपूर दौऱ्यावर, अनेक भेटीगाठींचं नियोजन
| Edited By: | Updated on: Jun 12, 2021 | 4:15 AM
Share

नागपूर : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी 3 दिवसीय नागपूर दौऱ्यावर आहेत. ते आज (11 जून) नागपुरात दाखल झाले. नागपूर विमानतळावर नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांच्यास जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस आयुक्त अमीतेश कुमार यांनी त्यांचं स्वागत केलं. भगत सिंह कोश्यारी 11 ते 14 जून दरम्यान 3 दिवस नागपूरमध्ये असतील. या काळात ते अनेक भेटीगाठी करणार असून कार्यक्रमांनाही उपस्थित राहणार आहेत (Governor Bhagat Singh Koshyari on 3 days Nagpur tour).

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी 3 दिवसीय दौऱ्यानंतर 14 जूनला पुन्हा मुंबईत परतणार आहेत. या काळात ते विविध शिष्टमंडळाच्या भेटीगाठी घेणार आहेत. तसेच विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होणार आहेत. या दौऱ्याबाबत राज्यपाल कार्यालयानेही ट्विट करत माहिती दिली.

यात म्हटलं, “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे तीन दिवसांच्या भेटीसाठी नागपूर येथे आगमन झाले. विमानतळावर नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस आयुक्त अमीतेश कुमार यांनी राज्यपालांचे स्वागत केले.”

8 महिन्यानंतरही विधान परिषद सदस्यांची नियुक्ती नाही, मुख्यमंत्र्यांची मोदींकडे राज्यपालांची तक्रार

दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून वादाचा विषय ठरत असलेल्या राज्यपालनियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासमोर मांडण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाराष्ट्र सदनात झालेल्या बैठकीत यासंदर्भात माहिती दिली.

बैठकीत आम्ही पंतप्रधान मोदी यांच्यासमोर राज्यपालनियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा मांडला. महाविकासआघाडी सरकार रीतसर सत्तेत आले आहे, आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे. आम्ही प्रथेप्रमाणे मंत्रिमंडळात ठराव करून सदस्यांची नावे मंजूर केली आहेत. त्यानंतर राज्यपालांना आमदारांची यादीही पाठवण्यात आली. मात्र, 8 महिने उलटूनही त्यावर निर्णय झालेला नाही. तेव्हा पंतप्रधानांनी यामध्ये लक्ष घालावे, अशी विनंती आम्ही केल्याचे अजित पवार यांनी म्हटले.

राज्यपालनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीवरुन उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे. आम्ही या सदस्यांच्या नियुक्तीसाठी आवश्यक असलेल्या नियमावलीतील सर्व गोष्टींची पूर्तता केली आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महाविकासआघाडी सरकारने दिलेल्या 12 आमदारांच्या यादीला हिरवा कंदील दाखवणार का, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

हेही वाचा :

आठ महिन्यानंतरही विधान परिषद सदस्यांची नियुक्ती नाही, मुख्यमंत्र्यांची मोदींकडे राज्यपालांची तक्रार

राजभवनातून 12 आमदारांची यादी गहाळ, गुन्हा दाखल करा; शिवसेना नेत्याची मागणी

राज्यपालांनी 12 आमदारांच्या फाईलवर सही केली तर पेढे वाटू, संजय राऊतांचा टोला

व्हिडीओ पाहा :

Governor Bhagat Singh Koshyari on 3 days Nagpur tour

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.