AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूर-मुंबई रेल्वे सेवा ठप्प, मोठी बातमी समोर, घटनास्थळी काय घडतंय?

नागपूर-मुंबई रेल्वे सेवा ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अनेक गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. या गाड्यांमध्ये असणारे प्रवाशी मात्र यामुळे प्रचंड वैतागले आहेत.

नागपूर-मुंबई रेल्वे सेवा ठप्प, मोठी बातमी समोर, घटनास्थळी काय घडतंय?
| Updated on: Jul 10, 2023 | 11:20 PM
Share

अकोला : उत्तर भारतात पाऊस अक्षरश: धुमाकूळ माजवतोय. हिमाचल प्रदेशमधील महापुराचे दृश्य अंगावर काटे आणणारे आहेत. अनेक घरं या महापुराने उद्ध्वस्त केले आहेत. शेकडो चारचाकी गाड्या पुरात वाहून गेल्या आहेत. महापुराचे अतिशय थरारक असे दृश्य समोर येत आहेत. विशेष म्हणजे विदर्भातही आज एक अनपेक्षित घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकखाली असणारी वाळूच वाहून गेली आहे. त्यामुळे अनेक रेल्वे गाड्या रखडल्या आहेत. संबंधित मार्गाने जाणारी रेल्वे सेवाच या घटनेमुळे ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेक प्रवासी त्रस्त झाले आहेत. प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. याशिवाय या घटनेमुळे प्रशासनापुढीलही आव्हान वाढलं आहे.

नागपूर-मुंबई रेल्वे सेवा ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरमध्ये पावसामुळे रेल्वे ट्रॅकखालील वाळू वाहून गेली आहे. त्यामुळे नागपूर आणि मुंबईला जाणाऱ्या रेल्वे गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. अकोल्यातील या घटनेमुळे 12 रेल्वे गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर सर्व परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी काम सुरु आहे, अशी माहिती मिळत आहे.

‘या’ 12 गाड्या थांबवण्यात आल्या आहेत

  • भुसावळ वर्धा मेमू गाडी
  • अहमदाबाद हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस
  •  पुरी सूरत साप्तिहिक सुपरफास्ट एक्सप्रेस
  •  गोंदिया मुंबई विदर्भ सुपरफास्ट एक्सप्रेस
  • नागपूर पुणे त्रिसाप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस
  •  लोकमान्य टिळक टर्मिनस ज्ञानेश्वरी एक्सप्रेस
  • बिलासपूर हापा साप्ताहिक एक्सप्रेस
  • मडगाव नागपूर विशेष एक्सप्रेस
  • हिसार सिकंदराबाद सुपरफास्ट एक्सप्रेस
  • सूरत मालदा टाउन वीकली एक्सप्रेस
  • पुणे सांत्रागंछी हमसफर एक्सप्रेस
  • अमरावती मुंबई अंबा सुपरफास्ट एक्सप्रेस

संध्याकाळी सात वाजता पाऊस आला आणि…

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर आणि मानकूर रेल्वे स्टेशनच्या दरम्यान रेल्वे रुळाखालची वाळू वाहून गेली. खरंतर संबंधित परिसरात सोमवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास कोसळला. त्यानंतर संबंधित घटना घडली. या पावसाचा थेट परिणाम रेल्वे वाहतुकीवर पडला आहे. नागपूर रेल्वे स्थानकावरही गेल्या चार तासांपासूनची गाडी थांबली आहे. त्यामुळे प्रवाशी त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर काम सुरु आहे. प्रवाशांना होणारा मनस्ताप लक्षात ठेवून प्रशासन काम करत आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.