AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विद्यार्थ्यांना पुस्तकं मिळेनात, दुसरीकडं बालभारतीकडून कोट्यवधीची हजारो टन पुस्तकं रद्दीत, RTI तून धक्कादायक माहिती समोर

2012 पासून बालभरतीनं वापरात नसलेली आणि जुन्या अभ्यासक्रमाची साडेपाच हजाराहून अधिक टन असलेली पुस्तके रद्दीत विकल्याचं धक्कादायक वास्तव पुढं आलंय.

विद्यार्थ्यांना पुस्तकं मिळेनात, दुसरीकडं बालभारतीकडून कोट्यवधीची हजारो टन पुस्तकं रद्दीत,  RTI तून धक्कादायक माहिती समोर
बालभारती
| Edited By: | Updated on: Oct 16, 2021 | 4:16 PM
Share

नागपूर: एकीकडे दुर्गम आणि ग्रामीण भागातील भागातील अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तकं पोहोचत नसल्याचे चित्र आहे. मात्र, दुसरीकडे बालभारती मात्र हजारो टन पुस्तकं रद्दीत विकत आहे. 2012 पासून बालभरतीनं वापरात नसलेली आणि जुन्या अभ्यासक्रमाची साडेपाच हजाराहून अधिक टन असलेली पुस्तके रद्दीत विकल्याचं धक्कादायक वास्तव पुढं आलंय. नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी बालभारतीला या यासंदर्भातील माहिती माहितीच्या अधिकारात मागितली होती. त्यात हे वास्तव पुढं आलं.

पुस्तक नसल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान, हजारो टन पुस्तक रद्दीत

अनेक विद्यार्थ्यांना पुस्तकं मिळत नसल्याची ओरड दर वर्षी असते. पुस्तकं न मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं. मात्र, विद्यार्थ्यांपर्यंत न पोहचलेली हजारो मेट्रिक टन पुस्तकं रद्दीत विकली हात असल्याची माहिती या माहिती अधिकारातून पुढं आलीय.

चार वेळा पुस्तक रद्दीत

नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी 2012 पासून महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक निर्मिती आणि अभ्यास संशोधन मंडळाने किती पुस्तकं रद्दीत काढली आणि त्यापासून किती महसूल मिळाला, असे प्रश्न विचारले होते. मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल 2012 ते मार्च 2019 या दरम्यान चार वेळा पुस्तकं रद्दीत काढण्यात आली. रद्दीत काढलेल्या पुस्तकाचे वजन 5 हजार 633 मेट्रिक टन एवढे होते. त्यापासून 6 कोटी 40 लाख एवढा महसूल मिळाला. यातून बालभारतीचे काम किती नियोजन शून्य आहे याची प्रचिती येते, असं माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर म्हणाले.

विद्यार्थ्यांच्या पुस्तकात भ्रष्टाचार, मेस्टाचा आरोप

‘मेस्टा’ संघटनेने विद्यार्थ्यांच्या पुस्तकात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केलाय. जाणीवपूर्वक पुस्तकं विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवली जात नाही, रद्दी मधून पैसे खाता यावे, यात अधिकारी आणि मंत्री सहभाही असल्याचा आरोप करत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ‘मेस्टा’ चे संस्थापक अध्यक्ष संजय तायडे पाटील यांनी केलीय.

पुस्तक नेमकी कुणासाठी?

दरवर्षी महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक निर्मिती आणि अभ्यास संशोधन मंडळ पुस्तकांची छपाई करते. मात्र, अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तकं पोहचत नाही. त्यामुळं ही पुस्तकं विद्यार्थ्यांसाठी छापली जातात की रद्दीत विकून भ्रष्टाचार करण्याची अशी शंका निर्माण झालीय.

इतर बातम्या:

‘बालभारती’कडून 426 टन पुस्तके रद्दीत, लाखो पुस्तकांचा कोट्यवधींचा छपाई खर्च पाण्यात

नंदुरबारमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा, आधी इंटरनेटचा गोंधळ, त्यात आता पुस्तक नाही

Nagpur RTI activist Abhay Kolarkar said Balbharati earn six crore rupees after sale of old books

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.