AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूरकरांची चिंता मिटली, पाणीपुरवठा करणारी दोन्ही धरणे ओव्हरफ्लो

नागपूर शहराची वर्षभराची पाण्याची चिंता आता मिटली आहे. कारण नागपूर शहराला पाणीपुरवठा करणारे तोतलाडोह (Totladoh) आणि नवेगाव खैरी (Navegaon Khairi) ही दोन्ही धरणे भरली आहेत. दोन्ही धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे आता नागपूरकरांना वर्षभरासाठी पाण्याची टंचाई भासणार नाही.

नागपूरकरांची चिंता मिटली, पाणीपुरवठा करणारी दोन्ही धरणे ओव्हरफ्लो
water
| Edited By: | Updated on: Sep 26, 2021 | 9:58 PM
Share

नागपूर : नागपूर शहराची वर्षभराची पाण्याची चिंता आता मिटली आहे. कारण नागपूर शहराला पाणीपुरवठा करणारे तोतलाडोह (Totladoh) आणि नवेगाव खैरी (Navegaon Khairi) ही दोन्ही धरणे भरली आहेत. दोन्ही धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे आता नागपूरकरांना वर्षभरासाठी पाण्याची टंचाई भासणार नाही. तसेच शहराला सुरळीत पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. (nagpur Totladoh and Navegaon Khairi dam achieve full capacity citizens will not face water scarcity)

पाणीपुरवठा करणारी दोन्ही धरणे भरली

उन्हाळ्यात नागपूरकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. पाण्याची कमतरता भासत असल्यामुळे कधीकधी पाणीपुरवठादेखील खंडित करावा लागतो. मात्र सध्या तोतलाडो आणि नवेगाव खैरी ही दोन्ही धरणे भरली आहेत. मध्यप्रदेश राज्यातून येणाऱ्या पेंच नदीवरील तोतलाडोह धरणातून नागपूर शहराला 70 टक्के पाणीपुरवठा केला जातो. तर उर्वरित 30 टक्के पाणीपुरवठा नवेगाव खैरी धरणातून होतो. सध्या मध्यप्रदेश आणि नागपूरमध्ये चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे.

चांगला पाऊस झाल्यामुळे तूट भरून निघाली

ऑगस्ट महिन्याच्या शेवटी नागपूरमध्ये पावसाची तूट चार टक्के होती. मात्र सप्टेंबरच्या मध्यात नागपूरमध्ये चांगला पाऊस झाला. चांगला पाऊस झाल्यामुळे तूट भरून निघाली आहे. शिवाय चांगला पाणीसाठादेखील झाला आहे. त्यामुळे पाण्याची चिंता मिटली आहे. नागपूरला पुढील वर्षभर पाणीपुरवठा सुरळीतपणे करता येणार आहे.

पाणी योग्य पद्धतीने वापरण्याचे आवाहन

दरम्यान, नागपूरला पाणी पुरवणारी दोन्ही धरणे भरली असली तरी भविष्यात पाण्याची टंचाई भासू नये म्हणून पिण्याचे पाणी योग्य पद्धतीने वापरण्याचे आवाहन ऑरेंज सिटी वॉटर वर्क्सचे जनसंपर्क अधिकारी सचिन द्रवेकर यांनी केलं आहे. तसेच सध्या मुबलक प्रमाणात पाणीसाठा आसल्यामुळे गरजेपेक्षा जास्त पाणी वापरणे टाळायला हवे, असेदेखील आवाहन करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

संजय राऊत यांचा बारामतीवर डोळा, म्हणतात ताकद वाढवली पाहिजे, पवारांचा गड भेदण्याची शिवसेनेची तयारी ?

VIDEO : संजय राऊतांची भरसभेत घोडे लावण्याची भाषा, एक्सपर्ट असल्याचंही वक्तव्य, नेमकं काय घडलं?

Weather Alert | आज मध्यरात्री गुलाब वादळ गोपाळपूर, कलिंगपट्टणममध्ये धडकण्याची शक्यता; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

(nagpur Totladoh and Navegaon Khairi dam achieve full capacity citizens will not face water scarcity)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.