AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! आघाडीत किती जागांवरून वाद?; प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

कार्यकर्ते उत्साही असतात. आमच्या पक्षात भांडणं लागू नये आणि आमची डोकेदुखी वाढू नये, त्यामुळे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांची भांडणं होतात. ती मिटवण्यासाठी आम्हाला मध्ये पडावे लागते, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मोठी बातमी ! आघाडीत किती जागांवरून वाद?; प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
prakash ambedkarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 03, 2024 | 4:40 PM
Share

अकोला | 3 मार्च 2024 : महाविकास आघाडीसोबत आपली युती झालेली नाही. त्यामुळे माझ्या आदेशाशिवाय महाविकास आघाडीच्या बैठकांना जाऊ नका, असं खळबळजनक आवाहन वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडालेली असतानाच आंबेडकर यांनी आणखी एक खळबळजनक विधान केलं आहे. महाविकास आघाडीत जागा वाटपावरून वाद असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे आघाडीत काहीच अलबेल नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आज पुन्हा एकदा बॉम्बगोळा टाकला आहे. 48 पैकी 15 जागांवरील उमेदवार ओबीसीतील असावेत. किमान तीन उमेदवार अल्पसंख्याक समाजाचे असावेत, असं आमचं म्हणणं आहे. त्यावर अजून फैसला झालेला नाही. तसेच काही घटक पक्षांनी भाजपसोबत जाणार नाही हे आताच स्पष्ट केलं पाहिजे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

शेवटपर्यंत सोबत राहू

मीडियाने दिलेल्या माहितीवरून काँग्रेस आणि शिवसेनेत 15 जागांवरून वाद आहे. तर एनसीपीमध्ये 9 जागांवरून वाद आहे. सहा तारखेपर्यंत हा वाद मिटणार असेल तर स्वागत आहे, असं सांगतानाच आम्ही शेवटपर्यंत महाविकास आघाडीसोबत राहण्याचा प्रयत्न करू, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

आघाडीचा मसुदा करा

आघाडीचा मसुदा असला पाहिजे. आपलं मत सेक्युलर आघाडीला आहे. आणि हे मत सेक्युलरच राहील हे मतदाराला वाटलं पाहिजे. आता यावर महाविकास आघाडीवर काय भूमिका घेते याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत, असं त्यांनी सांगितलं.

आम्ही सहा जागा जिंकू

महाविकास आघाडी 40 जागा जिंकू शकते असं मी मागे म्हणालो होतो. आम्ही किती जागा जिंकू शकतो असं मीडियाने विचारलं, तेव्हा आम्ही किमान सहा जागा जिंकू असं म्हटलं होतं. ही निवडणूक भाजप विरुद्ध वंचित अशीच लढाई होताना दिसत आहे. आम्ही वेगळे लढलो तर कुणाच्या किती जागा पडतील यापेक्षा आम्हाला किती मिळतील हे महत्त्वाचं आहे, असं ते म्हणाले.

सेटलमेंट करा

आधीच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युती होती. तेव्हा भाजप 23 जागा लढत होती. गेली 20 वर्ष भाजप इतर जागांवर लढली नाही. काँग्रेस आणि एनसीपीही 2004पासून एकत्र लढत आहेत. त्यांच्या सीट शेअरिंगचा फॉर्म्युला तोच आहे. ज्या मतदारसंघात काँग्रेस लढली नाही, तिथे काँग्रेसला वाव नाही. तर ज्या ठिकाणी राष्ट्रवादी लढली नाही, तिथे राष्ट्रवादीलाही संधी नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन सेटलमेंट करा असं आम्ही म्हटलंय, अशी माहिती त्यांनी दिली.

Follow Us
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं.
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय.
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी.
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?.
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत...
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत....
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?.
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव.
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज.
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच....
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच.....
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस.