5

Police भरतीसंदर्भात ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, NCC झालेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळणार : सुनील केदार

सुनील केदार (Sunil Kedar) यांनी नागपूरमध्ये बोलताना एनसीसी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना पोलीस भरती प्रक्रियेत कशा प्रकारे गुण देण्यात येतील यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे.

Police भरतीसंदर्भात ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, NCC झालेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळणार : सुनील केदार
सुनील केदार Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 7:23 PM

नागपूर : महाराष्ट्राचे (Maharashtra) गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आगामी काळात 7231 पदांवर पोलीस शिपाई भरती करणार असल्याचं जाहीर केलं होतं. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत बोलताना एनसीसी प्रमाणपत्र असलेल्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये गुण देण्यात येणार असल्याचं म्हटलं होतं. आता महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांनी नागपूरमध्ये बोलताना एनसीसी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना पोलीस भरती प्रक्रियेत कशा प्रकारे गुण देण्यात येतील यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे. एनसीसी (NCC) म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेना प्रमाणपत्र प्राप्त असलेल्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये अतिरिक्त गुण देण्यासंदर्भातील शासन निर्णय आणि राजपत्रव देखील प्रसिद्ध झालं आहे.

सुनील केदार नेमकं काय म्हणाले?

राज्यात आगामी पोलीस भरतीमध्ये एनसीसीचं प्रमाणपत्र असलेल्या तरुणांना वाढीव गुण दिले जातील, अशी माहिती क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे. ज्या तरुणांकडे एनसीसी A सर्टिफिकेट असेल, त्याला एकूण गुणांच्या 2 टक्के अतिरिक्त गुण पोलीस भरतीसाठी मिळतील. B सर्टिफिकेट असलेल्या तरुणांना एकूण गुणांच्या 3 टक्के मार्क मिळतील.C सर्टिफिकेट असलेल्या तरुणांना एकूण गुणांच्या 5 टक्के मार्क मिळतील.या संदर्भातील जीआर काढण्यात आला असल्याची माहिती मंत्री सुनील केदार यांनी दिली.

पाहा व्हिडीओ :

नागपूरमध्ये एअरो मॉडेलिंग शोचं आयोजन

सुनील केदार यांनी नागपुरात 27 तारखेला एअरो मॉडेलिंग शोचं आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली. नागपुरात आयोजित करण्यात येत असलेला हा शो विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा ठरणार आहे, असं सुनील केदार म्हणाले. या माध्यमातून विधर्थ्यांमध्ये नव चैतन्य निर्माण होणार आहे, उत्साह निर्माण होणार आहे. एनसीसीच्या माध्यमातून या शोचं आयोजन होणार आहे, असं सुनील केदार म्हणाले. नागपुरात माझ्या माहिती नुसार हा पहिला शो असणार आहे. कोरोनाच्या काळात जे विद्यार्थी घरी होते त्या विद्यार्थ्यांमध्ये या माध्यमातून उत्साह संचारेल, असं केदार यांनी म्हटलं. तर, हवाई क्षेत्रासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण होण्यासाठी हा शो फायदेशीर ठरेल, असं देखील केदार म्हणाले.

इतर बातम्या:

VIDEO : गिरीश महाजनांच्या मुलीच्या लग्नात पाकिटमार घुसला, माजी नगरसेवकाचे पैसे चोरण्याचा प्रयत्न

Sharad Pawar : MIM चा प्रस्ताव राष्ट्रवादीनं धुडकावला, आमच्यासाठी विषय संपला : शरद पवार

Non Stop LIVE Update
'नाना पटोले भाजपाचे प्रवक्ते...', केंद्रीय मंत्र्यांनी संस्कृतीची आठवण
'नाना पटोले भाजपाचे प्रवक्ते...', केंद्रीय मंत्र्यांनी संस्कृतीची आठवण
'चप्पल घालत याचं मार्केटिंग झालंय', पवार अन् सुप्रिया सुळेंवर निशाणा
'चप्पल घालत याचं मार्केटिंग झालंय', पवार अन् सुप्रिया सुळेंवर निशाणा
कल्याणमध्ये परप्रांतीय फेरीवाल्याला मनसेकडून चोप, अविनाश जाधव म्हणाले,
कल्याणमध्ये परप्रांतीय फेरीवाल्याला मनसेकडून चोप, अविनाश जाधव म्हणाले,
असं डोहाळे जेवण पाहिलंय का? ‘सुंदरी’च्या कार्यक्रमाची राज्यभरात चर्चा
असं डोहाळे जेवण पाहिलंय का? ‘सुंदरी’च्या कार्यक्रमाची राज्यभरात चर्चा
सहा महिन्यात मंत्री म्हणून फिरणार, ठाकरे गटाच्या नेत्याचे खळबळ माजवली
सहा महिन्यात मंत्री म्हणून फिरणार, ठाकरे गटाच्या नेत्याचे खळबळ माजवली
प्रकाश आंबेडकर यांची या नेत्यावर टीका, म्हणाले 'सावध व्हा, चप्पल...
प्रकाश आंबेडकर यांची या नेत्यावर टीका, म्हणाले 'सावध व्हा, चप्पल...
72 वर्षांनंतर साने गुरुजी यांची कर्मभूमी साहित्य प्रेमींनी गजबजणार
72 वर्षांनंतर साने गुरुजी यांची कर्मभूमी साहित्य प्रेमींनी गजबजणार
AC Local वर दगडफेक, कांदिवली ते बोरिवली स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं?
AC Local वर दगडफेक, कांदिवली ते बोरिवली स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं?
भावी मुख्यमंत्री राज ठाकरे? फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले...
भावी मुख्यमंत्री राज ठाकरे? फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले...
इंडिया आघाडीची रॅली म्हणजे टोपी लावण्याचे काम? दीपक केसरकर म्हणाले...
इंडिया आघाडीची रॅली म्हणजे टोपी लावण्याचे काम? दीपक केसरकर म्हणाले...