AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur College | महाविद्यालयीन युवकांसाठी विविध सरकारी योजना; जाणून घ्या रोजगार, शिष्यवृतीची माहिती

प्रत्यक्ष महाविद्यालय चालू नसले तरी प्रत्येक महाविद्यालयाने सदर समान संधी केंद्राची स्थापना करून महाविद्यालय निहाय समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करावी. त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप तयार करावा. इतर समाज प्रसार माध्यमांचा वापर करून संबंधित महाविद्यालयातील प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांशी समन्वय करणे बाबत सुचित करण्यात आले आहेत.

Nagpur College | महाविद्यालयीन युवकांसाठी विविध सरकारी योजना; जाणून घ्या रोजगार, शिष्यवृतीची माहिती
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Feb 02, 2022 | 4:00 AM
Share

नागपूर : विविध महाविद्यालयातील मागासवर्गीय मुला-मुलींसाठी शिष्यवृत्ती, फ्रीशिप व इतर शासनाच्या योजना आहेत. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासोबत उद्योजकता व्यवसाय व रोजगार (Entrepreneurship, business and employment) निर्मितीसाठी आर्थिक न्यायासाठी मार्गदर्शन करण्यात येते. यासंदर्भात माहिती देण्यासाठी संवाद अभियान – युवा संवाद सारखे (Dialogue Campaign – Youth Dialogue) कार्यक्रम सुरू करण्यात आलेत. महाविद्यालयामध्येच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी समान संधी केंद्रे स्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येक महाविद्यालयात त्या महाविद्यालयातील किमान एक प्राध्यापक व सहायक म्हणून काही विद्यार्थी यांची मदत घेतील. महाविद्यालयातच समान संधी केंद्रे सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्र शासन पुरस्कृत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या (Post Matric Scholarship Scheme) सुधारित विकासासह त्याचे सर्व मार्गदर्शक सूचना देण्यात येतात. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकास व व्यवसाय रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने या केंद्राच्या माध्यमातून उपाययोजना करण्याचे ठरवले आहे.

समाज कल्याण आयुक्तांनी दिले निर्देश

सदर समान संधी केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यात येते. रोजगार प्राप्तीसाठी किंवा उद्योजकता व व्यावसायिक होण्यासाठी कौशल्य शिक्षण या सर्व बाबींचा सर्वसमावेशक मार्गदर्शन याद्वारे करण्यात येणार आहेत. समाज कल्याण आयुक्त, डॉ. प्रशांत नारनवरे यांनी यासंदर्भात राज्यातील समाज कल्याण विभागाच्या अधिकार्‍यांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार त्या-त्या जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालयात माहिती देण्यात येणार आहे. इतर सर्व शैक्षणिक संस्था व त्यांच्या अधिपत्याखाली येणार्‍या सर्व महाविद्यालयांमध्ये या स्वरूपाची केंद्रे तात्काळ चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

समान संधी केंद्र स्थापन करा

प्रत्यक्ष महाविद्यालय चालू नसले तरी प्रत्येक महाविद्यालयाने सदर समान संधी केंद्राची स्थापना करून महाविद्यालय निहाय समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करून त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप तयार करावा. इतर समाज प्रसार माध्यमांचा वापर करून संबंधित महाविद्यालयातील प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांशी समन्वय करणे बाबत सुचित करण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने नागपूर विभागातील सर्व सहायक आयुक्त, समाज कल्याण यांना डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर यांनी निर्देश दिलेले आहेत.

तब्बल सहा महिन्यांनंतर मिळणार विद्यार्थ्यांना पोषण आहार; नागपूर जिल्ह्यातील किती विद्यार्थ्यांना होणार लाभ?

कुत्रं पाळायचंय! या आणि देशी कुत्र्याचं पिल्लू घेऊन जा; प्राणीमित्र संघटनेचा दत्तक देण्याचा उपक्रम

सतीश उके, प्रदीप उके यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा, प्रकरण काय? एकेकाळी मांडली फडणवीसांविरोधात बाजू

Follow Us
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा.
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.