AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhandara ZP Election | भंडाऱ्यात 21 जागांसह काँग्रेस मोठा पक्ष, सत्तेच्या समीकरणासाठी काय करावं लागणार?

भंडारा जिल्हा परिषदेच्या 52 पैकी काँग्रेसने 21 जागांवर विजय मिळवला असला तर सत्तेसाठी त्यांना कुणाचीतरी साथ हवी आहे. बहुमताचा आकडा पूर्ण करण्यासाठी आणखी पाच सदस्यांचा पाठिंबा लागणार आहे. त्यासाठी ते कुणाला जवळ करतात, हे पाहावे लागेल.

Bhandara ZP Election | भंडाऱ्यात 21 जागांसह काँग्रेस मोठा पक्ष, सत्तेच्या समीकरणासाठी काय करावं लागणार?
भंडाऱ्यातील विजयी उमेदवार जल्लोष करताना
| Edited By: | Updated on: Jan 20, 2022 | 6:04 AM
Share

भंडारा : जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि तीन नगरपंचायतींचे निकाल बुधवारी, 19 जानेवारी रोजी दोन टप्प्यांत जाहीर झाले. 52 जिल्हा परिषदेच्या जागांवर काँग्रेस 21, भाजप 12, राष्ट्रवादी काँग्रेस 13, शिवसेना एक, वंचित बहुजन आघाडी एक, बहुजन समाज पक्ष एक आणि अपक्ष दोन विजयी झाले आहेत. राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेला जिल्ह्यात मोठ्या मुश्किलीने खाते उघडण्यात यश आले आहे. 2015 मध्ये जिल्हा परिषदेत काँग्रेस पक्षाच्या 19 जागा होत्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला 15 तर भाजपला 13 जागा मिळाल्या होत्या. त्याचवेळी अपक्षांच्या पाच आणि शिवसेनेची एक अशा पाच जागा होत्या. मात्र यावेळी काँग्रेसला जिल्हा परिषदेच्या दोन जादा जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीच्या दोन जागा कमी झाल्या आहेत.

भाजपने झेडपीत ना गमावले ना कमावले

2015 मध्ये भाजपमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेले नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत भाजपने 13 जागा जिंकल्या होत्या. सध्या, यावेळी आमदार परिणय फुके आणि खासदार सुनील मेंढे यांच्या नेतृत्वाखालील भाजपने 2015 सारख्याच म्हणजे 13 जागा जिंकल्या आहेत. अपक्षांनी तीन जागा गमावल्या आहेत. 2015 मध्ये पाच अपक्ष जागा होत्या. यावेळी ते दोनवर आले आहेत. मतमोजणीच्या दिवशी सायंकाळपर्यंत शिवसेनेचे खातेही उघडले नव्हते. सायंकाळी सहा वाजता पवनी तहसीलच्या सावर्ला राजश्री तिघरे यांनी विजयी झालेल्या शिवसेनेला दिलासा दिला.

या दिग्गजांचा भंडाऱ्यात पराभव

नाना पटोले यांचे समर्थक माजी अध्यक्ष रमेश डोंगरे (काँग्रेस), नाना पटोले यांच्या जवळचा माजी जि. प. सदस्य आकाश कोरे, माजी समाजकल्याण सभापती रेखा वासनिक यांना पराभव स्वीकारावा लागला. भाजपचे अरविंद भालाधरे विधानसभेनंतर दुसऱ्यांदा पराभूत झाले. भाजपच्या नेपाल रंगारी यांचाही पराभव झाला. गणेशपूर मतदारसंघातून भाजपचे सूर्यकांत इलमे यांना हार स्वीकारावी लागली. भाजपचे नितीन कडव यांच्या पत्नी लता कडव याही निवडणूक जिंकू शकल्या नाही. राष्ट्रवादीचे रुपेश खवास तसेच शिवसेनेचे अनिल गायधने गणेशपूरमधून पराभूत झालेत.

Chandrapur Election | चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसची सरशी; तीन नगरपंचायतीमध्ये बहुमत; पण, व्हाईट हाऊस भाजपचेच

Nagar Panchayat Election result 2022 : ज्या मतदारसंघात पटोलेंनी मोदींना मारण्याची भाषा केली, तिथं काँग्रेस हरली की जिंकली?

Yavatmal Election | पारधी समाजाच्या 22 वर्षीय तरुणाने मारली बाजी; भाजप आमदारांना राखता आल्या नाही नगरपंचायती

अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.