AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Pak : भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट मॅचबाबत नाना पाटेकरांची रोखठोक भूमिका, म्हणाले..

Ind vs Pak : दुबईत आज भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना रंगणार आहे. या सामन्याविरोधात विविध मतमतांतरे मांडली जात आहेत. अशातच ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.

Ind vs Pak : भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट मॅचबाबत नाना पाटेकरांची रोखठोक भूमिका, म्हणाले..
Nana Patekar on IND vs PakImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 14, 2025 | 3:00 PM
Share

Ind vs Pak : अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम फाउंडेशन’चा दशकपूर्ती सोहळा पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच इथं पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडरी यांच्यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंतही उपस्थित होते. 2015 मध्ये नाम फाउंडेशनची स्थापना झाली आणि आज या फाऊंडेशनची दशकपूर्ती होत आहे. यावेळी नाना पाटेकरांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. नाम फाऊंडेशनचं कार्य आणि श्रेयवादावर बोलताना नानांनी भारत विरुद्ध पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यावरही आपली मत मांडलं.

काय म्हणाले नाना पाटेकर?

“मकरंद माझ्यापेक्षा गावगाड्यात खूप फेमस आहे. गावाशी त्याची नाळ जोडलेली आहे. नाम फाऊंडेशनला दहा वर्षे पूर्ण झाली, याचा मला आनंद आहे. समाजाला आपण काहीतरी देणं लागतो म्हणून ही चळवळ सुरू झाली. हे फाऊंडेशन म्हणजे माणसांनी माणसांसाठी सुरू केलेली एक चळवळ आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून 60 लाख शेतकरी बांधवांना फायदा झाला. अनेक शेतकऱ्यांच्या फायद्याची कामं ‘नाम’तर्फे झाली आहेत,” असं ते म्हणाले.

पुढे राजकारण आणि शेतकऱ्यांबद्दल मतं मांडताना ते म्हणाले, “आम्हाला श्रेय वाद नको आहे. राजकीय व्यक्ती काय म्हणतात, त्यापेक्षा आपण कामाला महत्त्वं देणं महत्वाचं आहे. आम्ही कोणत्याही राजकीय व्यक्तीचा प्रचार करत नाही. शेतकरी बांधवांना पक्का हमीभाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना दीड पट हमीभाव मिळावा, असं माझं मत आहे.”

यावेळी नानांनी आज होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरही रोखठोक भूमिका मांडली आहे. भारताने पाकिस्तानसोबत सामना खेळू नये, असं माझं व्यक्तिगत मत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

नाम फाऊंडेशनच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरीसुद्धा उपस्थित होते. “जो सामाजिक काम करतो, त्याला राजकीय प्रचार करण्याची गरज पडत नाही. मी एखादा प्रोजेक्ट करताना सरकारला दूर ठेवतो. सरकारचा हात लागला की प्रॉब्लेम सुरू होतात. त्यामुळे मी त्यांना हात लावू देत नाही. प्रत्येक राजकारणी हा पुढच्या निवडणुकीबद्दल विचार करतो, तर प्रत्येक समाजसेवक हा पुढच्या समाजाच्या घटकाबद्दल विचार करतो. त्यामुळे आपला जॉब हा थँकलेस आहे,” असं ते म्हणाले.

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

बंदुका, ग्रेनेड्स की उघड युद्ध? मुलांविरोधात काय येणार? पवन खेडा यांचा सवाल; तर पोलिसांचा दावा काय?.

बंदुका, ग्रेनेड्स की उघड युद्ध? मुलांविरोधात काय येणार? पवन खेडा यांचा सवाल; तर पोलिसांचा दावा काय?

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !.

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट