AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Pak : भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट मॅचबाबत नाना पाटेकरांची रोखठोक भूमिका, म्हणाले..

Ind vs Pak : दुबईत आज भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना रंगणार आहे. या सामन्याविरोधात विविध मतमतांतरे मांडली जात आहेत. अशातच ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.

Ind vs Pak : भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट मॅचबाबत नाना पाटेकरांची रोखठोक भूमिका, म्हणाले..
Nana Patekar on IND vs PakImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 14, 2025 | 3:00 PM
Share

Ind vs Pak : अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम फाउंडेशन’चा दशकपूर्ती सोहळा पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच इथं पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडरी यांच्यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंतही उपस्थित होते. 2015 मध्ये नाम फाउंडेशनची स्थापना झाली आणि आज या फाऊंडेशनची दशकपूर्ती होत आहे. यावेळी नाना पाटेकरांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. नाम फाऊंडेशनचं कार्य आणि श्रेयवादावर बोलताना नानांनी भारत विरुद्ध पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यावरही आपली मत मांडलं.

काय म्हणाले नाना पाटेकर?

“मकरंद माझ्यापेक्षा गावगाड्यात खूप फेमस आहे. गावाशी त्याची नाळ जोडलेली आहे. नाम फाऊंडेशनला दहा वर्षे पूर्ण झाली, याचा मला आनंद आहे. समाजाला आपण काहीतरी देणं लागतो म्हणून ही चळवळ सुरू झाली. हे फाऊंडेशन म्हणजे माणसांनी माणसांसाठी सुरू केलेली एक चळवळ आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून 60 लाख शेतकरी बांधवांना फायदा झाला. अनेक शेतकऱ्यांच्या फायद्याची कामं ‘नाम’तर्फे झाली आहेत,” असं ते म्हणाले.

पुढे राजकारण आणि शेतकऱ्यांबद्दल मतं मांडताना ते म्हणाले, “आम्हाला श्रेय वाद नको आहे. राजकीय व्यक्ती काय म्हणतात, त्यापेक्षा आपण कामाला महत्त्वं देणं महत्वाचं आहे. आम्ही कोणत्याही राजकीय व्यक्तीचा प्रचार करत नाही. शेतकरी बांधवांना पक्का हमीभाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना दीड पट हमीभाव मिळावा, असं माझं मत आहे.”

यावेळी नानांनी आज होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरही रोखठोक भूमिका मांडली आहे. भारताने पाकिस्तानसोबत सामना खेळू नये, असं माझं व्यक्तिगत मत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

नाम फाऊंडेशनच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरीसुद्धा उपस्थित होते. “जो सामाजिक काम करतो, त्याला राजकीय प्रचार करण्याची गरज पडत नाही. मी एखादा प्रोजेक्ट करताना सरकारला दूर ठेवतो. सरकारचा हात लागला की प्रॉब्लेम सुरू होतात. त्यामुळे मी त्यांना हात लावू देत नाही. प्रत्येक राजकारणी हा पुढच्या निवडणुकीबद्दल विचार करतो, तर प्रत्येक समाजसेवक हा पुढच्या समाजाच्या घटकाबद्दल विचार करतो. त्यामुळे आपला जॉब हा थँकलेस आहे,” असं ते म्हणाले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...