AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Pak : भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट मॅचबाबत नाना पाटेकरांची रोखठोक भूमिका, म्हणाले..

Ind vs Pak : दुबईत आज भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना रंगणार आहे. या सामन्याविरोधात विविध मतमतांतरे मांडली जात आहेत. अशातच ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.

Ind vs Pak : भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट मॅचबाबत नाना पाटेकरांची रोखठोक भूमिका, म्हणाले..
Nana Patekar on IND vs PakImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 14, 2025 | 3:00 PM
Share

Ind vs Pak : अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम फाउंडेशन’चा दशकपूर्ती सोहळा पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच इथं पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडरी यांच्यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंतही उपस्थित होते. 2015 मध्ये नाम फाउंडेशनची स्थापना झाली आणि आज या फाऊंडेशनची दशकपूर्ती होत आहे. यावेळी नाना पाटेकरांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. नाम फाऊंडेशनचं कार्य आणि श्रेयवादावर बोलताना नानांनी भारत विरुद्ध पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यावरही आपली मत मांडलं.

काय म्हणाले नाना पाटेकर?

“मकरंद माझ्यापेक्षा गावगाड्यात खूप फेमस आहे. गावाशी त्याची नाळ जोडलेली आहे. नाम फाऊंडेशनला दहा वर्षे पूर्ण झाली, याचा मला आनंद आहे. समाजाला आपण काहीतरी देणं लागतो म्हणून ही चळवळ सुरू झाली. हे फाऊंडेशन म्हणजे माणसांनी माणसांसाठी सुरू केलेली एक चळवळ आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून 60 लाख शेतकरी बांधवांना फायदा झाला. अनेक शेतकऱ्यांच्या फायद्याची कामं ‘नाम’तर्फे झाली आहेत,” असं ते म्हणाले.

पुढे राजकारण आणि शेतकऱ्यांबद्दल मतं मांडताना ते म्हणाले, “आम्हाला श्रेय वाद नको आहे. राजकीय व्यक्ती काय म्हणतात, त्यापेक्षा आपण कामाला महत्त्वं देणं महत्वाचं आहे. आम्ही कोणत्याही राजकीय व्यक्तीचा प्रचार करत नाही. शेतकरी बांधवांना पक्का हमीभाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना दीड पट हमीभाव मिळावा, असं माझं मत आहे.”

यावेळी नानांनी आज होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरही रोखठोक भूमिका मांडली आहे. भारताने पाकिस्तानसोबत सामना खेळू नये, असं माझं व्यक्तिगत मत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

नाम फाऊंडेशनच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरीसुद्धा उपस्थित होते. “जो सामाजिक काम करतो, त्याला राजकीय प्रचार करण्याची गरज पडत नाही. मी एखादा प्रोजेक्ट करताना सरकारला दूर ठेवतो. सरकारचा हात लागला की प्रॉब्लेम सुरू होतात. त्यामुळे मी त्यांना हात लावू देत नाही. प्रत्येक राजकारणी हा पुढच्या निवडणुकीबद्दल विचार करतो, तर प्रत्येक समाजसेवक हा पुढच्या समाजाच्या घटकाबद्दल विचार करतो. त्यामुळे आपला जॉब हा थँकलेस आहे,” असं ते म्हणाले.

Follow Us
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.
भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी; संतप्त महिलेचा मंत्री महाजनांना थेट जाब
भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी; संतप्त महिलेचा मंत्री महाजनांना थेट जाब.
मोठी बातमी! नाशिकनंतर पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद? ऑफिसच्या रेस्टरूमध्ये
मोठी बातमी! नाशिकनंतर पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद? ऑफिसच्या रेस्टरूमध्ये.