AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईव्हीएममधील गडबड सुप्रीम कोर्टात पोहोचताचं भाजपनं मशिन्स जाळल्या…नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “ना रहेगा बास, ना बजेगी बासुरी” याच म्हणीचा वापर करत भाजप आणि मोदी सरकार देशात कारभार करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

ईव्हीएममधील गडबड सुप्रीम कोर्टात पोहोचताचं भाजपनं मशिन्स जाळल्या...नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप
NANA PATOLEImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 14, 2026 | 9:44 PM
Share

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  “ना रहेगा बास, ना बजेगी बासुरी” याच म्हणीचा वापर करत भाजप आणि मोदी सरकार देशात कारभार करत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रियेवर आणि ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. नाना पटोले म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगापासून ते संपूर्ण निवडणूक मॅनेजमेंट आणि ‘मॅच फिक्सिंग’ ही भाजपच्या बाजूनं करण्याचा प्रयत्न झाला. हे चित्र संपूर्ण देश आणि पश्चिम बंगालची जनता उघड्या डोळ्यांनी पाहत होती. हे संपूर्ण प्रकरण आता सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचले आहे. ईव्हीएम मशीनमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार आणि गडबड करण्यात आली ही बाब आता लोकांसमोर उघड होत आहे, हे समजताच पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकारनं ईव्हीएम मशिन्सच जाळून टाकल्याचा थेट आरोप पटले यांनी केला आहे.

दरम्यान पंढरपूरमध्ये शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर आमदार रोहित पवार यांचं आंदोलन सुरू आहे, या आंदोलनाला देखील नाना पटोले यांनी पाठिंबा दिला आहे. रोहित पवार यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. भाजपच्या २०१४ ते २०१९ या काळातील फडणवीस सरकारनं २०१६ मध्ये जाहीर केलेली कर्जमाफी ही निव्वळ फसवणूक होती, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. सरकार बदलले तरी अजूनही शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण झालेली नाही, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन रोहित पवार यांचं पंढरपूरमध्ये आंदोलन सुरू आहे, या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा आहे, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

शेतकऱ्यांकडून जबरदस्तीनं आधी एवढे पैसे भरा, मगच तुमची कर्जमाफी होईल अशा अटी घातल्या जात आहेत. यामुळे प्रत्यक्ष कर्जमाफ होण्याऐवजी शेतकऱ्यांच्या खिशातूनच पैसे काढून घेतले जात आहेत. ही अत्यंत क्लेशदायक बाब असून प्रत्यक्षात बँकांचे कर्ज माफ होताना कुठेही दिसत नसल्याचा आरोपही यावेळी नाना पटोले यांनी केला.

Follow Us
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण... जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलं?
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा; काय घडलं?
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
Video | 'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर फडणवीसांचा राऊतांना मिश्कील टोला
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू अनावर, व्हिडीओ आला समोर
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद अन् तो व्हिडीओ.. पहा नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?