Ashok Kharat: खरातला मोठा दणका! कोट्यवधींच्या संपत्तीची राखरांगोळी, थेट साम्राज्यालाच मोठा सुरूंग, त्या व्यक्ती सुद्धा यंत्रणांच्या रडारवर
Ashok Kharat Case Update: तंत्र-मंत्राचा दावा करणारा भोंदू अशोक खरातचे सर्वच ग्रह फिरले आहे. अनेक महिलांचे लैंगिक शोषण, अनेकांची फसवणूक, धमकी प्रकरणात त्याचा पाय खोलात गेला आहे. कोट्यवधींची जमवलेली माया आता त्याच्या हातातून जाणार आहे.

Ashok Kharat ED : भोंदू अशोक खरातचा पाया आणखी खोलात गेला आहे. तंत्र-मंत्राचा, अघोरी पूजेचा धाक दाखवून त्याने अनेक महिलांची अब्रु लुटली. अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले. हा लिंगपिसाट आता चांगलाच अडकला आहे. राजकीय प्रभावाचा आणि प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचा वापर करून त्याने मोठे साम्राज्य उभारले. त्या साम्राज्यालाच आता सुरूंग लागला आहे. एसआयटी नंतर याप्रकरणात इतर यंत्रणी उतरल्या. त्यात सक्तवसुली संचालनालयाने (ED) त्याला चांगलाच दणका दिला आहे. कोट्यवधींची जमावलेली माया आता हातातून जाणार आहे. त्याच्या संपत्तीची राखरांगोळी होणार आहे.
ईडी आणणार संपत्तीवर टाच
भोंदू खरातच्या कोट्यवधींच्या प्रॉपर्टीवर ईडी कडून तात्पुरती टाच येणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ED कडून कारवाईला वेग आला आहे. ईडीकडून संबंधित मालमत्तांची तपशीलवार छाननी सुरू झाली आहे. संशयित व्यवहारांमुळे कोट्यवधींची संपत्ती अडचणीत आली आहे. बोगस गुंतवणूक, फसवणूक आणि मनी लॉड्रिंगबाबत अद्याप तपास सुरूच आहे. विविध ठिकाणी छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. संबंधित बँक व्यवहार आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी काही बँक खाती देखील सील करण्यात आली आहेत.
सहकारी रडारवर
भोंदू अशोक खरातशी काही प्रशासकीय अधिकाऱ्यांचे व्यवहार आणि भागीदारी समोर आली आहे. त्यात जिल्हाधिकाऱ्यांपासून तर प्रशासकीय सेवेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांच्या पत्नी आणि खरात यांची काही व्यावसायिक भागीदारी समोर आली आहे. तर काही राजकारण्यांचे पंटर आणि पीए सुद्धा यंत्रणांच्या रडारवर असल्याचे समजते. त्यांच्या मदतीने खरातने मोठे साम्राज्य तर उभारलेच. पण अनेक ठिकाण त्याने यंत्रणांवर दबावही आणला. त्याचे प्रस्थ असल्याने त्याच्याविरोधात तक्रार देऊनही कारवाई झाली नसल्याचे समोर आले आहे. आता त्याच्या अशा व्यावसायिक भागीदार आणि इतर सहकारी तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. पुढील काही दिवसांत मोठ्या कारवाईची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
राजकीय नेत्यांवर कारवाई का नाही?
दरम्यान याप्रकरणात अनेक राजकीय नेत्यांचे अशोक खरातसोबतचे थेट संबंध उघड झाले आहेत. त्यांची व्यावसायिक भागीदारीही समोर आली आहे. इतकेच नाही तर त्यांनी खरातला वाचवण्यासाठी वेळोवेळी दबाव आणल्याचेही समोर आले आहे. तरी सुद्धा या राजकीय नेत्यांना अभय का देण्यात येत आहे असा सवाल सर्वसामान्यांना पडला आहे. सरकार वेळकाढूपणा करत असल्याचे आणि याप्रकरणातील दुवे नष्ट करण्याचे काम करत असल्याचा आरोप विरोधक सातत्याने करत आहेत.
