AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाग्यासाक्या धरण ओव्हरफ्लो, 42 खेडी योजनेतील गावांचा पाणीप्रश्न मिटला

मालेगाव आणि नांदगावमध्ये (Nashik, Malegoan) सतत दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने (Havy Rain) नाग्यासाक्या धरण (Nagyasakya dam)ओव्हरफ्लो झाले आहे. सध्या या धरणातून 665 पाण्याचा पांझण नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे या भागातील पिण्याचा पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.

नाग्यासाक्या धरण ओव्हरफ्लो, 42 खेडी योजनेतील गावांचा पाणीप्रश्न मिटला
पावसाने धरणे भरली.
| Edited By: | Updated on: Sep 10, 2021 | 3:54 PM
Share

नाशिकः मालेगाव आणि नांदगावमध्ये (Nashik, Malegoan) सतत दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने (Heavy Rain) नाग्यासाक्या धरण (Nagyasakya dam)ओव्हरफ्लो झाले आहे. सध्या या धरणातून 665 पाण्याचा पांझण नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे या भागातील 42 खेडी योजनेतील गावांचा पिण्याचा पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. (Nagyasakya dam overflow, water problem of villages under 42 village scheme solved)

पावसाळा सुरू होऊनही नांदगाव तालुक्यात म्हणावा तसा पाऊस नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता होती. मात्र, गेल्या दोन दिवसांत नांदगाव आणि मनमाडला मुसळधार पावसाने झोडपून काढले. येथे तब्बल 123 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. लेंडी आणि शाकंभरी नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी शहरातील सखल भागातील घरे आणि दुकानांमध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझडही झाली आहे. दरम्यान, तालुक्यातील सोकोरा येथील पाझर तलाव फुटल्याने अनेक हेक्टरवरील शेतात पाणी साचले आहे. जोरदार पावसामुळे नांदगाव तालुक्याचा पाणीप्रश्न मिटला आहे. नाग्यासाक्या धरण तुडूंब भरले आहे. 395 दलघफू क्षमतेच्या या धरणात खूप कमी पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे पंचक्रोशीतल्या गावकऱ्यांमध्ये चिंता होती. आता या धरणातून 665 क्यूसेकचा विसर्ग सुरू आहे. गेल्या वर्षीही हे धरण भरले होते.

जिल्ह्यातील पाणीसाठ्यात वाढ

सध्या जिल्ह्यातील 24 प्रकल्पांत 68 टक्के, गंगापूर समूहात 85 टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये नाशिक जिल्ह्यात 628 मिमी पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टी झालेल्या नांदगाव व मनमाड तालुक्याने पावसाची सरासरी ओलांडली आहे. सर्वाधिक 123 मिमी पाऊस एकट्या नांदगाव तालुक्यात नोंदवला असून, जिल्ह्यात आतापर्यंत 76.67 टक्के पाऊस झाला आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे चणकापूर धरण 95 टक्के भरले आहे. तर पुनद धरण 92 टक्के भरले. सध्या चणकापूरमधून 800 क्यूसेकने, तर पुनदमधून नदीसाठी 1300 क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे गिरणा व पुनद नदीला यंदा पहिल्यांदाच पूर आला आहे.

कडवा ओव्हरफ्लो

इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा येथील कडवा धरण मंगळवारी दुपारी ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे सिन्नरकरांची पाणी चिंता मिटली आहे. सिन्नरसाठीची पाणीपुरवठा योजन या धरणातून आहे. मंगळवारी दुपारी कडवा नदीत 150 क्यूसेक विसर्ग सुरू होता. 1924 दलघफू क्षमतेच्या कडवा धरणावर 88 किमी लांबीचा कालवा असून त्यामुळे इगतपुरी, नाशिक, सिन्नर, निफाड तालुक्यातील एकूण 19404 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. (Nagyasakya dam overflow, water problem of villages under 42 village scheme solved)

इतर बातम्याः 

नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीने 54 हजार 877 हेक्टरवरील पीक मातीमोल, 7 हजार कोंबड्यांचा मृत्यू

बाजेच्या पायाला ट्यूब बांधून पुरातून काढला मार्ग, पण उपचाराविना मुलीने सोडले प्राण!

नाशिकमध्ये विभागीय आयुक्तांच्या बनावट सहीचा वापर करत घातला २१ लाखांचा गंडा

Follow Us
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.