नाशिक कोरोनाः 846 रुग्णांवर उपचार सुरू; सिन्नर, निफाड पुन्हा हॉटस्पॉट

नाशिक (Nashik) जिल्ह्यात सध्या 846 कोरोना ( Corona) रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.68 टक्के आहे. मात्र, सिन्नर आणि निफाड पुन्हा हॉटस्पॉट ठरत आहेत. सिन्नर येथे सध्या 160, तर निफाड येते 137 रुग्ण आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.

नाशिक कोरोनाः 846 रुग्णांवर उपचार सुरू; सिन्नर, निफाड पुन्हा हॉटस्पॉट
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 5:33 PM

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यात सध्या 846 कोरोना ( Corona) रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.68 टक्के आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या आणि गर्दीच्या दिवसाच्या काळातही शहरवासीयांना दिलासा (Nashik Helth) मिळाला आहे. मात्र, सिन्नर आणि निफाड पुन्हा हॉटस्पॉट ठरत आहेत. सिन्नर येथे सध्या 160, तर निफाड येते 137 रुग्ण आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. (Nashik Corona: 846 patients are undergoing treatment, recovery rate is 97.68 percent, Sinnar, Niphad hotspot)

जिल्ह्यात आतापर्यंत 8 हजार 605 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशिक ग्रामीणमधून 4 हजार 146, नाशिक महापालिका क्षेत्रातून 3 हजार 976, तर मालेगाव महापालिका क्षेत्रातून 357 आणि जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 605 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 96.96 टक्के, नाशिक शहरात 98.14 टक्के, मालेगावमध्ये 97.10 टक्के, तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.60 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.68 टक्के इतके आहे.

येथे आहेत पॉझिटिव्ह रुग्ण

नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 41, बागलाण 13, चांदवड 35, देवळा 19, दिंडोरी 17, इगतपुरी 7, कळवण 8, मालेगाव 12, नांदगाव 12, निफाड 137, पेठ 1, सिन्नर 160, सुरगाणा 2, त्र्यंबकेश्वर 5, येवला 44 अशा एकूण 513 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. नाशिक महापालिका क्षेत्रात 303, मालेगाव महापालिका क्षेत्रात 15 तर जिल्ह्याबाहेरील 15 रुग्ण असून, एकूण 846 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 6 हजार 775 रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 3, बागलाण 1, चांदवड 2, दिंडोरी 1, मालेगाव 1, निफाड १७,सिन्नर २५, येवला 2 असे एकूण 52 पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.

शाळा उघडण्याची प्रतीक्षा

नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडतच आहेत. त्यामुळे शाळा सुरू होण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. ज्या गावांमध्ये एक महिन्यापर्यंत एकही कोरोना रुग्ण नाही, त्या ठिकाणी शाळा सुरू करण्याचे सरकारचे आदेश आहेत. मात्र, जिल्ह्यात तूर्तास तरी अशी स्थिती असल्याचे दिसत नाही.

लसीकरण वेगात

नागरिकांची जागरुकता आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध होणारा लससाठा यामुळे नाशिक (Nashik) जिल्ह्यातील कोरोना (corona) लसीकरणाचा (vaccine) वारू चौखुर उधळून डोसचा आकडा हा तब्बल 25 लाखांच्या घरात गेला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 24 लाख 74 हजार 722 जणांनी लस घेतली आहे. यातील लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या 18 लाख 31 हजार 204 आहे. दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या ही 6 लाख 43 हजार 518 आहे.

जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.68 टक्के आहे. आत्तापर्यंत 8 हजार 605 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. – डॉ. अनंतर पवार, जिल्हा नोडल अधिकारी (Nashik Corona: 846 patients are undergoing treatment, recovery rate is 97.68 percent, Sinnar, Niphad hotspot)

इतर बातम्याः

मातीमोलः नाशिकमध्ये हिरव्या मिरचीला किलोमागे फक्त 1 रुपयाचा भाव

लई भारीः नाशिकमध्ये चक्क सोन्याचे मोदक; दर 12000 रुपये किलो

नाशिक जिल्ह्यातील 12 धरणांतून विसर्ग; औरंगाबादला मोठा दिलासा, 8.14 टीएमसी पाणी जायकवाडीकडे

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.