AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिक जिल्ह्यातील 12 धरणांतून विसर्ग; औरंगाबादला मोठा दिलासा, 8.14 टीएमसी पाणी जायकवाडीकडे

गेल्या आठवडाभरापासून नाशिक (Nashik) जिल्ह्यावर पावसाने कृपाछत्र धरल्याने 12 धरणांतून पाण्याचा विसर्ग (Water released) सुरू आहे. तब्बल 8.14 टीएमसी पाणी जायकवाडी धरणाच्या (Jayakwadi) दिशेने झेपावले आहे. त्यामुळे औरंगाबादला (Aurangabad) मोठा दिलासा मिळाला आहे.

नाशिक जिल्ह्यातील 12 धरणांतून विसर्ग; औरंगाबादला मोठा दिलासा, 8.14 टीएमसी पाणी जायकवाडीकडे
नांदूर-मधमेश्वरमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
| Edited By: | Updated on: Sep 14, 2021 | 11:27 AM
Share

मनोज कुलकर्णी, नाशिकः गेल्या आठवडाभरापासून नाशिक (Nashik) जिल्ह्यावर पावसाने कृपाछत्र धरल्याने 12 धरणांतून पाण्याचा विसर्ग (Water released) सुरू आहे. तब्बल 8.14 टीएमसी पाणी जायकवाडी धरणाच्या (Jayakwadi) दिशेने झेपावले आहे. त्यामुळे औरंगाबादला (Aurangabad) मोठा दिलासा मिळाला आहे. (Water released from 12 dams in Nashik district; Relief to Aurangabad, 8.14 TMC water to Jayakwadi)

नाशिक जिल्ह्यावर सुरुवातीला रुसलेल्या पावसाने गेल्या आठ दिवसांपासून झोडपून काढले आहे. त्यामुळे नांदगाव, मनमाडला न भूतो, न भविष्यती असा पाऊस झाला. वालदेवी नदीला पूर आला. नाशिकमध्ये गोदावरीला वर्षातला पहिला पूर आला आहे. अजूनही गेल्या दोन दिवसांपासून पावसाची हजेरी सुरू आहे. सोमवारी दिवसभर शहरात पावसाची रिपरिप सुरू होती. मंगळवारी सकाळीही पावसाने भुरभुर हजेरी लावली. अजूनही ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे पाऊस वाढण्याची शक्यता आहे. या दमदार पावसाने जिल्ह्यातील 24 पैकी 12 धरणांतून विसर्ग सुरू झाला आहे. गंगापूर धरण 98.56 भरले असून त्यातून सोमवारी यंदाच्या हंगामातील उच्चांकी 4009 क्युसेकने पाणी सोडण्यात आले. दारणा धरणातून 7200 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातूनही 23 हजार 905 क्युसकेने गोदावरी पात्रात पाणी येत आहे. या विसर्गामुळे तसेच नांदूरमधमेश्वरमधून 94 हजार 254 क्यूसेक म्हणजे तब्बल 8.146 टीएमसी पाणी गोदावरीतून जायकवाडीच्या दिशेने झेपावले आहे. सध्या जायकवाडी 59.79 टक्के भरले आहे.

नाशिक, औरंगाबादची चिंता मिटली

नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण भरत आल्याने शहरवासीयांवरचे यावर्षीचे पाणी कपातीचे संकट मिटले आहे. अजूनही पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू राहणार असून, हे पाणी जायकवाडीला लाभदायक ठरणार आहे. जायकवाडीच्या धरणावर औरंगाबादचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांचा पाणीप्रश्न या पावसाने सुटणार आहे. विशेषतः जायकवाडीचे पाणी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यापर्यंत पोहचते. त्यामुळे गोदामाय असे प्रवाहित होणे आनंददायी ठरणार आहे.

तूट भरून निघणार

नाशिक जिल्ह्यात गेल्यावर्षी 13 सप्टेंबरपर्यंत जवळपास 95.71 टक्के पाऊस झाला होता. यंदा 84.54 टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत जवळपास 15004.69 मिमी पावसाची अपेक्षा असतो. मात्र, यंदा सुरुवातीपासून पावसाने ओढ दिल्याने 13 सप्टेंबरपर्यंत 12684.8 मिमी पाऊस पडला. त्यामुळे अजूनही 11 टक्के पावसाची तूट आहे. मात्र, सप्टेंबर महिना पूर्ण होण्यास अजूनही पंधरा दिवस आहेत. अजूनही जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. त्यामुळे ही तूट भरून निघण्याची शक्यता आहे. (Water released from 12 dams in Nashik district; Relief to Aurangabad, 8.14 TMC water to Jayakwadi)

इतर बातम्याः 

नाशिकमध्ये गोदावरीला वर्षातला पहिला पूर, दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी

Nashikweather: नाशिक जिल्हा, खान्देशात पाऊस आजही जोरदार बॅटींग करण्याची शक्यता

Nashik is the best: लसीकरणाचा वारू चौखुर, अबब…25 लाख व्यक्तींनी घेतले डोस!

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.