AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मालेगावमध्ये आता पोलिओ लसीकरणाकडेही पाठ; 3500 डोस पडून, प्रकरण काय?

कोरोना लसीकरणानंतर मालेगाव पूर्वमधील नागरिकांनी पोलिओ लसीकरण मोहिमेकडे पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. या भागात बहुतांश लोकवस्ती मुस्लिम धर्मियांची आहे. त्यांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्यामुळे प्रशासन चिंतेत आहे. या भागात पुन्हा एकदा पोलिओ रुग्ण आढळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मालेगावमध्ये आता पोलिओ लसीकरणाकडेही पाठ; 3500 डोस पडून, प्रकरण काय?
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Mar 26, 2022 | 10:24 AM
Share

मालेगावः धर्म, पंथ, जात आणि पातीच्या भिंती अनेकदा इतक्या बुलंद होतात की त्याच्यापुढे काही केले तरी विज्ञानही थिटे पडते. डोळ्यावर पिवळ्या रंगाचा चष्मा लागलेला असतो. त्यामुळे सारे जग अशा व्यक्तीला पिवळ्या रंगात न्हाऊन निघाल्याचे वाटते. नेमके तसेच नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या मालेगावमध्ये (Malegaon Polio) होताना दिसते आहे. येथे कोरोनाच्या प्रतिबंधक लसीकरणाकडे शहरातील पूर्व भागातील नागरिकांनी पाठ फिरवल्याचे समोर आले होते. आता पुन्हा एकदा त्याच मालेगाव पूर्वमधील नागरिकांनी पोलिओ (Polio) लसीकरणाकडेही पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एक-दोन नव्हे, तर चक्क 3500 डोस पडून आहेत. या आठमुठ्या भूमिकेमुळे प्रशासन हैराण झाले आहे. आजवर राजकारणामुळे चर्चेत राहणारे हे शहर आता या नव्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. पोलिओ लसीकरण मोहीम अपयशी ठरल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. यासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृतीचे काम हाती घेणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.

असा बसला फटका

मालेगाव शहरात कोरोनाच्या साथीने थैमान घातले होते. पूर्व भागात नागरिकांनी नियम न पाळल्यामुळे अनेकांचा कोरोना काळात मृत्यू देखील झाला. कोरोना संसर्ग आजारावर कोविड लसीकरण हा आतापर्यंत रामबाण उपाय ठरला आहे. मात्र, या लसीकरण मोहिमेला देखील मालेगावच्या पूर्व भागात नागरिकांनी असमर्थता दर्शविली आहे. मालेगाव शहरात लसीकरणाची टक्केवारी अत्यल्प असल्यामुळे नाशिक जिल्हा खूप उशिरा निर्बंधमुक्त करण्यात आला.

धर्मगुरूंची घेणार मदत

कोरोना लसीकरणानंतर मालेगाव पूर्वमधील नागरिकांनी पोलिओ लसीकरण मोहिमेकडे पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. या भागात बहुतांश लोकवस्ती मुस्लिम धर्मियांची आहे. त्यांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्यामुळे प्रशासन चिंतेत आहे. या भागात पुन्हा एकदा पोलिओ रुग्ण आढळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिकेने जनजागृतीसाठी धर्मगुरूंची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या आवाहनाला तर नागरिक प्रतिसाद देतील का, हे पाहावे लागेल.

इतर बातम्याः

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

tv9 Explainer : आप कौन है, भर विधानसभेत नितीशकुमारांनी सभापतींना झापलं, भाजपला झटका देण्याच्या तयारीत?

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.