AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अजित पवार भावी मुख्यमंत्री’, माणिकराव कोकाटे म्हणतात, ‘मला ऊर्जा मंत्रिपद’

"आता मविआच्या सभा होणार आहेत. येत्या 2 एप्रिलला संभाजीनगरमध्ये सभा आहे. मविआचे सर्व नेते तिथे येणार आहेत आणि दाखवून देणार मविआ एकत्र आहे. गावपातळीवरही वाद टाळा", असा सल्ला अजित पवारांनी दिला.

'अजित पवार भावी मुख्यमंत्री', माणिकराव कोकाटे म्हणतात, 'मला ऊर्जा मंत्रिपद'
| Edited By: | Updated on: Mar 30, 2023 | 9:51 PM
Share

नाशिक : नाशिकच्या सिन्नर तालुक्यात शहा गावी शेतकरी मेळाव्याच्या ठिकाणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून होर्डींग लावण्यात आले. या शेतकरी मेळाव्याला स्वतः अजित पवार उपस्थितीत होते. अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्र्याचे होर्डींग पाहून सिन्नरचे आमदार माणिकराव कोकटे यांनी एक वर्षासाठी ऊर्जा किंवा वित्त मंत्री करा, अशी मागणीच या शेतकरी मेळाव्या प्रसंगी अजित पवार यांच्याकडे केली. मग या पाठोपाठ मलाही जलसंपदा मंत्री करून टाका, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी केली

यावेळी अजित पवार भाषण करण्यासाठी उभे राहिले. ते बोलतांना म्हणाले, अरे आपले सरकार नाही. मग तुम्हाला मंत्री कसे करू? मी तर तुम्हाला खासदार करण्याच्या विचारात होतो. या मेळ्यात त्यांनी एकप्रकारे नाशिक लोकसभा मतदारसंघात माणिकराव कोकाटे यांना उभे करण्याचे संकेत माजी खासदार समीर भुजबळ व्यासपीठावर असताना दिले. तर नगर लोकसभा मतदारसंघांसाठी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांना संकेत दिले.

“बारामतीत नाही अशा सुंदर इमारती सिन्नरमध्ये आहेत. दुधाचे दर वाढले, मका, विविध पिके घेतली जातात. आमदार आषुतोष काळे आणि माणिकराव कोकाटे म्हणतात मंत्री करा. सरकार तर येऊ ‌द्या. मी तर माणिकरावांना खासदार करणार होतो. मविआच्या जागावाटपाचा विषय आहे, गंमतीचा भाग सोडा”, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवारांची भाजपवर टीका

“या सरकारला नपुंसक , शक्तीहीन सरकार का म्हटलं जातय. जाती-धर्मात तेढ निर्माण करून कोणाचंही भलं झालं नाही. जिथे दंगली उसळतात तिथे उद्योगधंदे जात नाहीत. उद्योजक विचार करतात. आम्ही मविआ सरकार काळात कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी खबरदारी घेत होतो”, असं अजित पवार म्हणाले.

“पदवीधरमध्ये नाकारलं, कसब्यात भाजपचा पराभव झाला. चिंचवडची जागा थोडक्यात गेली. तिथे दोघेही तिकीट मागत होते. आता मविआच्या सभा होणार आहेत. येत्या 2 एप्रिलला संभाजीनगरमध्ये सभा आहे. मविआचे सर्व नेते तिथे येणार आहेत आणि दाखवून देणार मविआ एकत्र आहे. गावपातळीवरही वाद टाळा. जूनपर्यंत सहा ते सात ठिकाणी सभा घेणार आहोत. जी लोकं फुटलीत तिथे जनता खुश नाही”, असा दावा अजित पवारांनी केला.

“तरूण का घोषणा देतायत? कारण त्यांना वाईट वाटत आहे. आताच्या मंत्र्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न समजतात की नाही हेच समजत नाही. गेल्या 10 महिन्यांत एकही घटक समाधानी नाही. आज 82 व्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतायत”, असं अजित पवार म्हणाले.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.