Sanjay Raut: देशभरात सगळीकडं कोश्यारी…कोणी धोतरात तर कोणी…थलपती विजयच्या अडवणुकीवर राऊतांचा कुणावर संताप?
Sanjay Raut on Vijay Thalapathy: तामिळनाडूमध्ये सर्वाधिक जागा जिंकून सुपरस्टार विजय थलपती याने चमत्कार घडवला. पण अद्याप राज्यपालांनी त्याला सत्ता स्थापनेसाठीचे निमंत्रण दिले नाही. त्यावरून आज नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत यांनी थेट हल्ला केला.

Sanjay Raut on Vijay Thalapathy: तामिळनाडूमध्ये सुपरस्टार विजय थलपती याच्या TVK या नव्या दमाच्या पक्षाने सर्वांनाच लोळवत सर्वाधिक जागा मिळवल्या. विजयच्या पक्षाने इतिहास घडवला. त्याने 234 पैकी 108 जागा मिळवल्या. सत्ता स्थापनेसाठी त्याला अवघ्या 10 आमदारांची गरज आहे. त्यात काँग्रेसने त्याला पाठिंबा दिला आहे. काँग्रेसचे पाच आमदार निवडून आले आहेत. तर अजून पाच आमदारांची त्याला गरज आहे. असे असले तरी राज्यपालांनी त्याला सत्ता स्थापनेसाठी पाचरण केले नाही. त्यावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट हल्लाबोल केला. त्यांनी तिरकस बाण सोडला. त्यांनी भाजपवर तोंडसुख घेतले.
राज्यपालांकडून अडवणूक, राऊतांचा आरोप
तामिळनाडूमध्ये राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे राज्यपाल आहेत. ते भाजपचे राज्यपाल आहेत. विजय थलपती याने विजय मिळवला आहे. त्याच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. तरीही भाजपचे राज्यपाल आडमुठी भूमिका घेत आहेत. सत्ता स्थापनेसाठी विजय थलपतीला बोलवत नसल्याचा आरोप राऊतांनी यावेळी केला. त्यांनी भाजपवर तामिळनाडूतील घडामोडींवरुन टीका केली.
सगळीकडे कोश्यारी
विजय थलपती याला सत्ता स्थापनेसाठी काही जागा कमी पडत आहे. तिकडचे राज्यपाल भाजपाचे आहेत त्यामुळे त्यांनी अजून टीव्हीके ला सत्ता स्थापण करण्यासाठी आमंत्रण दिले नाही. सगळीकडे कोशयारी आहेत काही जण धोत्रात आहेत तर काहीजण सुटबुटात असल्याची टीका संजय राऊत यांनी नाशिक येथील पत्रकार परिषदेतून केला.
ममता दीदी लढाऊ नेत्या
पश्चिम बंगालमधील परिस्थितीवर राऊतांनी भाष्य केले. बंगालमध्ये घटनात्मक पेच होईल का नाही मी सांगू शकत नाही. देशाचे गृहमंत्री आणि राज्यपाल कुठल्याही थराला जाऊ शकतात, असा आरोप राऊतांनी केला. मी हरले नाही असं ममता दीदी म्हणतात. 100 जागा हिसकावून घेतल्या आहेत. ममता दीदी या फार मोठे आंदोलन करणाऱ्या नेत्या आहेत. मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणवर नाही ही त्यांची भूमिका आंदोलनाची आहे. पंजाब मध्ये देखील बॉम्ब स्फोट झाला याच माध्यमातून भाजप आता तिकडे निवडणूक तयारी करत आहे, असा गंभीर आरोप राऊतांनी केला.
