AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात रोज सायबर क्राईमचे एक हजार गुन्हे, नियंत्रणासाठी उपाययोजना काय?

कोरोना काळापासून सायबर क्राईमचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश नागरिकांनी ऑनलाईन खरेदीला प्राधान्य दिले. त्यामुळे इंटरनेट सायबर गुन्हेगार सक्रिय झाले.

राज्यात रोज सायबर क्राईमचे एक हजार गुन्हे, नियंत्रणासाठी उपाययोजना काय?
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Aug 11, 2023 | 7:27 PM
Share

पनवेल : फेसबूकवरून फसवणूक झाली. ऑनलाईन गेम खेळत असताना पैसे गेले. पीन कोड मागितले आणि बँक अकाउंटमधून रक्कम गहाळ झाली. अशा तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे सायबर क्राईम नियंत्रणासाठी जाळे प्रत्येक जिल्ह्यात विणण्यात आले. पण, तक्रारींचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. या तक्रारींचे निवारण करणे सायबर क्राईमपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या आव्हानासाठी सामना करण्यासाठी सायबर क्राईम विविध उपक्रम राबवत आहे. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या गृह आणि शिक्षण विभागाच्या वतीने कवच 2023 या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात अनेक कॉलेजमधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. वेगवेगळ्या सायबर गुन्ह्यांची उकल आणि शेवट योग्य प्रकारे व्हावा, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सायबर गुन्हे सोडवण्याची स्पर्धा

पिल्लई कॉलेजने यासाठी पुढाकार घेतला. केंद्र सरकारच्या गृह विभागाच्या मार्गदर्शनाखाली यासाठीचे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रतीकात्मक विषयांवर सायबर गुन्हे सोडविण्याची स्पर्धा आयोजित केली. यात विजेत्या टीमला एक लाख रुपयांचा धनादेश वाटप करण्यात आला.

तामिळनाडू, केरळ, गुजरातसह महाराष्ट्रातील कॉलेज विद्यार्थांनी आपल्या कौश्यल्य दाखवून अनेक गुन्ह्याची उकल केली. यावेळी विजेत्या टीमला मान्यवरांच्या हस्ते धनादेश प्रमाणपत्र आणि चषक प्रदान करण्यात आले. तर याच विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे सोडवण्यासाठी सहभाग घेतला जाईल. असे गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

१९३० या हेल्पलाईन क्रमांकावर करा तक्रारी

यावेळी महाराष्ट्र सायबर विभागाचे प्रमुख संजय शिंत्रयांनी राज्यभरात दिवसाला एक हजार गुन्हे नोंदविले जात असल्याची धक्कादायक माहिती दिली. हे गुन्हे नियंत्राणात ठेवण्यासाठी सायबर क्राईमने हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. सायबर क्राईमच्या तक्रारी १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर करता येतील. या तक्रारी थेट संबंधित पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येतात. अशी माहितीही संजय शिंत्रे यांनी दिली.

फेक अॅपचा वापर

कोरोना काळापासून सायबर क्राईमचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश नागरिकांनी ऑनलाईन खरेदीला प्राधान्य दिले. त्यामुळे इंटरनेट सायबर गुन्हेगार सक्रिय झाले. फेक अॅपचा वापर करून गुन्हे केले जातात.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...