AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात रोज सायबर क्राईमचे एक हजार गुन्हे, नियंत्रणासाठी उपाययोजना काय?

कोरोना काळापासून सायबर क्राईमचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश नागरिकांनी ऑनलाईन खरेदीला प्राधान्य दिले. त्यामुळे इंटरनेट सायबर गुन्हेगार सक्रिय झाले.

राज्यात रोज सायबर क्राईमचे एक हजार गुन्हे, नियंत्रणासाठी उपाययोजना काय?
| Edited By: | Updated on: Aug 11, 2023 | 7:27 PM
Share

पनवेल : फेसबूकवरून फसवणूक झाली. ऑनलाईन गेम खेळत असताना पैसे गेले. पीन कोड मागितले आणि बँक अकाउंटमधून रक्कम गहाळ झाली. अशा तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे सायबर क्राईम नियंत्रणासाठी जाळे प्रत्येक जिल्ह्यात विणण्यात आले. पण, तक्रारींचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. या तक्रारींचे निवारण करणे सायबर क्राईमपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या आव्हानासाठी सामना करण्यासाठी सायबर क्राईम विविध उपक्रम राबवत आहे. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या गृह आणि शिक्षण विभागाच्या वतीने कवच 2023 या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात अनेक कॉलेजमधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. वेगवेगळ्या सायबर गुन्ह्यांची उकल आणि शेवट योग्य प्रकारे व्हावा, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सायबर गुन्हे सोडवण्याची स्पर्धा

पिल्लई कॉलेजने यासाठी पुढाकार घेतला. केंद्र सरकारच्या गृह विभागाच्या मार्गदर्शनाखाली यासाठीचे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रतीकात्मक विषयांवर सायबर गुन्हे सोडविण्याची स्पर्धा आयोजित केली. यात विजेत्या टीमला एक लाख रुपयांचा धनादेश वाटप करण्यात आला.

तामिळनाडू, केरळ, गुजरातसह महाराष्ट्रातील कॉलेज विद्यार्थांनी आपल्या कौश्यल्य दाखवून अनेक गुन्ह्याची उकल केली. यावेळी विजेत्या टीमला मान्यवरांच्या हस्ते धनादेश प्रमाणपत्र आणि चषक प्रदान करण्यात आले. तर याच विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे सोडवण्यासाठी सहभाग घेतला जाईल. असे गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

१९३० या हेल्पलाईन क्रमांकावर करा तक्रारी

यावेळी महाराष्ट्र सायबर विभागाचे प्रमुख संजय शिंत्रयांनी राज्यभरात दिवसाला एक हजार गुन्हे नोंदविले जात असल्याची धक्कादायक माहिती दिली. हे गुन्हे नियंत्राणात ठेवण्यासाठी सायबर क्राईमने हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. सायबर क्राईमच्या तक्रारी १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर करता येतील. या तक्रारी थेट संबंधित पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येतात. अशी माहितीही संजय शिंत्रे यांनी दिली.

फेक अॅपचा वापर

कोरोना काळापासून सायबर क्राईमचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश नागरिकांनी ऑनलाईन खरेदीला प्राधान्य दिले. त्यामुळे इंटरनेट सायबर गुन्हेगार सक्रिय झाले. फेक अॅपचा वापर करून गुन्हे केले जातात.

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.