Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाच्या 20 किमीच्या परिसरात इमारतींना 55 मीटरची मर्यादा

एक वर्षापूर्वीपर्यंत विमानतळ पसिरातील इमारतींना उंचीसाठीची प्रमाणपत्रे सिडकोकडून दिली जात होती. या विमानतळाची उभारणी अदानी समूहाकडे गेल्यानंतर ही प्रमाणपत्रे जारी करण्याचे अधिकार विमानतळ प्राधिकरणाने सिडकोकडून स्वत:कडे घेतले आणि काही महिने ही प्रमाणपत्रे जारी करण्याचे कामच थांबवले.

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाच्या 20 किमीच्या परिसरात इमारतींना 55 मीटरची मर्यादा
नवी मुंबई विमानतळाच्या 20 किमीच्या परिसरात इमारतींना 55 मीटरची मर्यादाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 1:18 AM

नवी मुंबई / रवी खरात (प्रतिनिधी) : नवी मुंबई विमानतळावरून विमान उडण्यापूर्वीच 20 किलोमीटरच्या परिसरत इमारतींच्या उंचीवर 55 मीटरची मर्यादा विमानतळ प्राधिकरणा (Airport Authority)ने घातली आहे. याचा अर्थ नवी मुंबई विमानतळ (Navi Mumbai Airport) परिसरात कोणतीही इमारत 12 ते 15 मजल्यांपेक्षा अधिक उंच (Hight) बांधता येणार नाही. जानेवारी 2021 पासून या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या 20 किलोमीटर परिघात 1500 हून अधिक प्रकल्पांना ना-हरकत प्रमाणपत्रे देण्यात आली. या प्रकल्पांची उंची आता 55 मीटरच्या आत ठेवण्यास सांगितले आहे. यापैकी 10 टक्के प्रकल्पांची उंची ही यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे, असे गृहित धरले तर या उंचीच्या मर्यादेचा थेट फटका किमान 150 प्रकल्पांना बसणार आहे.

इमारतीची उंचीची मर्यादा कमाल 55.1 मीटर ठेवण्याची सक्ती

एक वर्षापूर्वीपर्यंत विमानतळ पसिरातील इमारतींना उंचीसाठीची प्रमाणपत्रे सिडकोकडून दिली जात होती. या विमानतळाची उभारणी अदानी समूहाकडे गेल्यानंतर ही प्रमाणपत्रे जारी करण्याचे अधिकार विमानतळ प्राधिकरणाने सिडकोकडून स्वत:कडे घेतले आणि काही महिने ही प्रमाणपत्रे जारी करण्याचे कामच थांबवले. आता जी प्रमाणपत्रे जारी केली जात आहेत त्यात कोणत्याही इमारतीची उंचीची मर्यादा जास्तीत जास्त 55.1 मीटर ठेवण्याची सक्ती करण्यात आली आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडकोने 2019 मध्ये 120 ते 130 मीटर उंचीचे अनेक गृहप्रकल्प मंजूर केले. याचा अर्थ या इमारतींची उंची सुमारे 40 मजली असेल. तळोजा, सानपाडा, वाशी आदी सेक्टरमध्ये हे प्रकल्प मंजूर झाले. पण आता नवी मुंबई विमानतळापासून 20 किलोमीटर परिसरात कोणत्याही इमारतीची उंची ही फार फार तर 14 ते 16 मजली असू शकेल.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.