AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai APMC | वारंवार मागणी करुनही कांदा बटाटा मार्केटमध्ये 50 किलोपेक्षा अधिक क्षमतेच्या गोण्या, संतापलेल्या माथाडी कामगारांचं काम बंद आंदोलन

कांदा-बटाटा मार्केटमधील माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन केले आहे. एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमधील माथाडी कामगारांनी आज पुन्हा काम बंद आंदोलन पुकारले आहे. वारंवार पत्र व्यवहार करुनही व्यापारी 50 किलो पेक्षा जास्त माल मागवतात. कित्येक वेळा सर्व पदाधिकारी, नेते आणि कामगार यांच्या बैठक होऊन सुद्धा व्यपारी जास्त माल मागवतात.

Mumbai APMC | वारंवार मागणी करुनही कांदा बटाटा मार्केटमध्ये 50 किलोपेक्षा अधिक क्षमतेच्या गोण्या, संतापलेल्या माथाडी कामगारांचं काम बंद आंदोलन
Mathadi Kamgar Protest
| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 10:01 AM
Share

नवी मुंबई : कांदा-बटाटा मार्केटमधील माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन केले आहे. एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमधील माथाडी कामगारांनी आज पुन्हा काम बंद आंदोलन पुकारले आहे. वारंवार पत्र व्यवहार करुनही व्यापारी 50 किलो पेक्षा जास्त माल मागवतात. कित्येक वेळा सर्व पदाधिकारी, नेते आणि कामगार यांच्या बैठक होऊन सुद्धा व्यपारी जास्त माल मागवतात. जोपर्यंत 50 किलोपेक्षा कमी माल बाजार आवारात येणार नाही तोपर्यंत माथाडी कामगार माल खाली करणार नाही, असा पवित्राच माथाडी कामगारांनी घेतला आहे. सकाळपासून कांदा बटाटा मार्केट बंद करुन माथाडी कामगार आंदोलन सुरू केला आहे.

वारंवार मागणी करुनही दुर्लक्ष केल्याने आंदोलन

वाहतूक करण्यात येणाऱ्या मालाचे वजन 50 किलोपेक्षा अधिक नसावे ही मागणी वारंवार करुन देखील अधिक वजनाच्या गोणी येत असल्याने माथाडी कामगार आज अधिकच संतापले आहेत. त्यामुळे आज सकाळपासूनच माथाडी कामगारांनी काम बंद केले आहे. 50 किलोपेक्षा अधिक क्षमतेच्या गोणी मालाची वाहतूक करु नये असा शासनाचा जीआर असताना एपीएमसी प्रशासन आणि व्यापारी मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत. फळ, भाजीपाला, मसाला आणि धान्य मार्केटमध्ये या नियमाची पूर्णपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. परंतू कांदा बटाटा मार्केटमध्ये हा नियम लागू न करण्यात आल्याने माथाडी कामगारांनी संताप व्यक्त केला.

काम बंद केल्याने हजारो टन माल गाड्यांमध्ये असाच पडून

जवळपास 150 ट्रक मालाची आवक कांदा बटाटा मार्केटमध्ये झालीये. सकाळपासूनच काम बंद केल्याने हजारो टन माल गाड्यांमध्ये असाच पडून राहिला. काही व्यपाऱ्यांचा माल उचलण्यास नकार देऊन माथाडी कामगारांनी काम बंद केले आहे. एपीएमसी प्रशासनाने त्वरित या निर्णयाची अंमलबजावणी करावी अन्यथा हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा माथाडी कामगारांनी दिला आहे.

शासनाच्या जीआरनुसार 50 किलो वजनाचा गोणी अपेक्षित असताना काही व्यपाऱ्यांकडे 60 ते 65 किलो वजनाचा माल येत आहे. गेली दोन वर्षपासून संबंधित घटकांशी वारंवार बैठक घेऊन देखील शासन निर्णयाची अंमलबजावणी केली जात नसल्याचे माथाडी कामगारांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

मुंबई एपीएमसीत 4 वर्षातील विक्रमी भाजीपाल्याची आवक, दरामध्ये मोठी घसरण

नवी मुंबईत कोरोना रुग्णसंख्येबाबत दिलासा; मात्र एपीएमसी मार्केटमुळे प्रशासनाची धाकधूक वाढली

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.