AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रवी राणा यांच्यामुळेच नवनीत राणा यांचा पराभव होईल; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

अमरावती लोकसभा मतदारसंघात आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहेत. भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा थेट मुकाबला महाविका आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्याविरोधात आहे. त्यांच्या विरोधात बच्चू कडू यांनी दिनेश बुब यांना उमेदवारी दिली आहे. तर आनंदराज आंबेडकर हे सुद्धा मैदानात उतरले आहेत. त्यांना वंचित आघाडीने पाठिंबा दिलेला आहे.

रवी राणा यांच्यामुळेच नवनीत राणा यांचा पराभव होईल; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
नवनीत राणा आणि रवी राणा
| Updated on: Apr 21, 2024 | 2:13 PM
Share

अमरावती लोकसभा मतदारसंघातील वातावरण चांगलंच तापलं आहे. अमरावतीतमध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या उमेदवारीला प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी जोरदार विरोध केला आहे. बच्चू कडू यांनी महायुतीत असूनही नवनीत राणा यांच्याविरोधात उमेदवार दिला आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर बच्चू कडू यांनी उमेदवार दिल्याने नवनीत राणा आणि बच्चू कडू यांच्यात आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. आता बच्चू कडू यांनी एक विधान केलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. बच्चू कडू यांच्या दाव्यानुसार रवी राणा यांच्यामुळेच नवनीत राणा यांचा पराभव होणार आहे.

बच्चू कडू यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा दावा केला. दिनेश बूब हा माणूस रवी राणांपेक्षा लाख पटीने चांगला आहे. चित्रपटाचे जर दृश्य काढले तर त्यात तुम्ही दारू पिताना दिसतात. रवी राणांनी इतक्या व्यक्तिगत पातळीवर खाली जाऊन आमच्या उमेदवारावर आरोप करू नये. ज्याचं घर मातीचं आहे, त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये. नवनीत राणांचा पराभव करण्यासाठी सर्वात मोठा हातभार कोणाचा असेल तर रवी राणांचा असेल. नवनीत राणाच्या पराभवाचे सर्वात मोठे श्रेयही रवी राणांना जाईल. रवी राणा व्यवस्थित वागले असते तर ही वेळ आली नसती, असं बच्चू कडू म्हणाले.

मोदींनी स्पष्ट सांगितलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इथे प्रचाराला यावं लागतं. तुम्ही उमेदवाराकडे पाहू नका. मला पाहून मतदान करा, असं आवाहन मोदींनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट सांगितले की, आमचा उमेदवार कार्यक्षम नसेल तर मला पाहून मतदान करा, याचा अर्थ स्पष्ट आहे. त्यांचे उमेदवार कार्यक्षम नसल्याचं स्पष्ट झालं आहे, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला.

याचा अर्थ फडणवीस आमच्यासोबत

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीच्या रॅलीत सर्वच मित्र पक्षांची नावे घेतली. तुमचं नाव नाही घेतलं. तुम्ही महायुतीत आहात की नाही? असा सवाल बच्चू कडू यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर दिंल. बरं झालं देवेंद्र फडणवीस यांनी मित्र पक्षाच्या यादीत आमचं नाव घेतलं नाही. त्यांनी नाव घेतलं असतं तर संभ्रम निर्माण झाला असता. त्यांनी आमचं नाव नाही घेतलं याचा अर्थ देवेंद्र फडणवीस आमच्या बाजूने आहेत, असा दावाही त्यांनी केला.

नंतर ग्लासवर ग्लास…

दरम्यान, आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्या उमेदवार दिनेश बुब आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्यावर जोरदार टीका केली होती. नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत त्यांनी बच्चू कडू यांचे उमेदवार दिनेश बुब यांच्यावर गंभीर आरोप केले होते. बळवंत वानखेडे यांच्या मतदारसंघात अंधार आहे. तिथे त्यांनी दिवे लावले नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात जनता आहे. तर दिनेश बुब हे दुपारी 12 वाजता झोपेतून उठतात. नंतर ग्लासवर ग्लास सुरू होतात. रात्री जुगार खेळतात अशा उमेदवाराला मतदान करू नका. हे लोक निवडून आले तर अमरावतीकडे लक्ष देणार नाही, अशी टीका रवी राणा यांनी केली होती.

Follow Us
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
Nanded | दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...