AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nawab malik : लाॅकडाऊनच्या दिशेनं जायचं नसेल तर लसीकरण आवश्यक, नवाब मलिकांचा इशारा

सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं, सर्वांनी लसीकरण करुन घ्यावे. लाॅकडाऊनच्या दिशेनं जायचं नसेल तर लसीकरण आवश्यक आहे. असं मलिक म्हणालेत

Nawab malik : लाॅकडाऊनच्या दिशेनं जायचं नसेल तर लसीकरण आवश्यक, नवाब मलिकांचा इशारा
नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Dec 05, 2021 | 8:44 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यानी केंद्र सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे. केंद्राकडून वेळीच आफ्रिकी देशांवरील विमानांवर नियंत्रण करण्यात आलं नाही. असं मलिक म्हणालेत तसेच सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं, सर्वांनी लसीकरण करुन घ्यावे. लाॅकडाऊनच्या दिशेनं जायचं नसेल तर लसीकरण आवश्यक आहे. असंही मलिक म्हणालेत. बाबासाहेबाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संवाद कार्यक्रमाला नवाब मलिक यांनी हजेरी लावली होती.

गिरीश कुबेरांवरील शाईफेकीचा निषेध

नाशिकात गिरीश कुबेरांवर हल्ला झाला त्याचा निषेध आहे. विचार पटला नाही तर विरोध करण्याचा अधिकार आणि इतर मार्ग आहेत. पुस्तक लिहिल्यावर तुम्हाला कोर्टात जाता येऊ शकते, पण हल्ला करणे, हिंसा करणे हे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली आहे.

जय भीम चित्रपटाचं कौतुक

जय भीम चित्रपटात एकदाही बाबासाहेबांचं नाव नाही, घोषणा नाही मात्र त्या चित्रपटातील विचारातून एक संदेश देण्यात आलेला आहे. जिथे अन्याय अत्याचार होत असेल तिथे तिथे एकत्र येणं गरजेचं आहे. या देशातपूर्वी एका समाजावर अन्याय झाला आहे हे नाकारू शकत नाही. यातून बाबासाहेबांनी बाहेर काढलं, बाबासाहेब हे एका जातीचे नाहीत, ते सर्वांचे आहेत, अशी प्रतिक्रिया मलिक यांनी दिलीय. 1 जानेवारी रोजी भीमाकोरेगावमध्ये झालेली दंगल भडकवण्यात आली होती. माजी न्यायाधिशांनी आयोजित केलेल्या एल्गार परिषदेला मोठ्याप्रमाणास नागरिक आले होते. ही घटना झाल्यानंतर अनेकांना अटक झाली सुधा भारद्वाज यांनाही आरोपी करण्यात आलं. एल्गार परिषदेत जमा झालेल्यांवर पंतप्रधान यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला त्यावर मी पहिल्यांदा आक्षेप घेतला, असंही मलिक यावेळी म्हणालेत. यात भांडाफोड होईल हे लक्षात येताच, ही केस केंद्राकडे वर्ग केली, केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने कारवाई करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

Girish Kuber| समाजाचे अवैचारिकरण, प्रगल्भतेची आस आहे का, कुबेरांचा सवाल; पत्रकारिता सत्य विसरली, डोळेंचे खडे बोल!

Omicron News Updates : ओमिक्रॉनचे रुग्ण आढळताच पुणे जिल्ह्याचा आरोग्य विभाग सतर्क

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक किती करणार आहोत?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

Follow Us
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी