AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडकी बहीण योजनेवरून शरद पवार यांचा थेट मोदींना टोला; ‘त्या’ विधानाचीही करून दिली आठवण

पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी गुंतवणूक येईल हे योग्य आहे. पण मोदींची भाषा पाहिली तर ते सतत म्हणायचे की ही रेवडी आहे. हे रेवडीचं वाटप आहे. रेवडीचं वाटपानं देशाची अर्थव्यवस्था मजबूत होणार नाही. ही लोकांची तात्पुरती फसवणूक आहे. हे मोदी अनेकदा बोलले होते

लाडकी बहीण योजनेवरून शरद पवार यांचा थेट मोदींना टोला; 'त्या' विधानाचीही करून दिली आठवण
शरद पवारImage Credit source: Facebook
| Updated on: Jul 27, 2024 | 1:26 PM
Share

राज्याच्या अर्थसंकल्पात सरकारने अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्यी, त्यापैकीच एक होती ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’. या योजनेअंतर्गत २१ ते ६० वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येणार आहेत. त्यानंतर सरकारने ‘लाडका भाऊ’ योजनाही जाहीर केली. मात्र आगामी विधानसाभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन सरकारने हा घोषणांचा पाऊस पाडल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते शरद पवार यांनी सरकारच्या या योजनेवरून टीका करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. ‘ तिजोरीत काही नाहीये. या सर्व घोषणा आहेत. हे रेवडीचं वाटप आहे. रेवडीचं वाटपानं देशाची अर्थव्यवस्था मजबूत होणार नाही. ही लोकांची तात्पुरती फसवणूक आहे’ असे शरद पवार म्हणाले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेदरम्य़ान संवाद साधताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून टीका करत टोला लगावला, ‘ निवडणुकीच्यावेळी एखाद दुसरा हप्ता दिला जाईल. तो देऊन जनमानस आपल्या बाजूला करण्याचा प्रयत्न दिसतो. पण लोकांमध्ये ही चर्चा आहे की, हे निवडणुकीच्या पूर्वीच देतील. या पूर्वी यांच्या हातात सत्ता असताना असे निर्णय का घेतले नाही? अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्याचा काही ना काही तरी परिणाम होईल.’ असा इशारा शरद पवार यांनी दिला.

ही लोकांची फसवणूक आहे

‘ शेवटी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी गुंतवणूक येईल हे योग्य आहे. पण मोदींची भाषा पाहिली तर ते सतत म्हणायचे की ही रेवडी आहे. हे रेवडीचं वाटप आहे. रेवडीचं वाटपानं देशाची अर्थव्यवस्था मजबूत होणार नाही. ही लोकांची तात्पुरती फसवणूक आहे. हे मोदी अनेकदा बोलले होते. त्या विधानाशी ते अजूनही प्रामाणिक असतील तर हे जे चाललंय त्यावर ते स्वच्छ भूमिका घेतील.’ असे शरद पवार म्हणाले.

पक्षातून गेलेल्यांना परत घेणार का ?

पक्षातून जे बाहेर पडले त्यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता शरद पवार यांनी स्पष्ट उत्तर दिलं. ‘ काही लोकांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्याचा सरसकट निर्णय घेण्याची मनस्थिती आमची नाही. जे लोक विचाराने आमच्यासोबत होते. एकत्र काम करण्याची मानसिकता ज्यांची आहे. त्यांच्याबद्दल विरोध करण्याची गरज नाही. ज्यांनी टोकाची भूमिका घेतली होती, त्याचा विचार आमच्या पक्षात होईल. त्यानंतर अंतिम निर्णय होईल.’ असे त्यांनी नमूद केलं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.