AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांदा प्रश्न पेटला, सरकार म्हणतं 15 ऑगस्टपर्यंत ‘देणार’, विरोधकांचा प्रश्न ‘कसे देणार?’

अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी तारांकित प्रश्नाद्वारे कांदा अनुदानाचा मुद्दा उपस्थित केला. या प्रश्नावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, कॉंग्रेस गटनेते सतेज पाटील, भाई जगताप, शशिकांत शिंदे यांनी अनेक मुद्दे उपस्थित करत सरकारची कोंडी केली.

कांदा प्रश्न पेटला, सरकार म्हणतं 15 ऑगस्टपर्यंत 'देणार', विरोधकांचा प्रश्न 'कसे देणार?'
KANDA ANUDANImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jul 19, 2023 | 8:51 PM
Share

मुंबई । 19 जुलै 2023 : राज्यातील 3 लाख 2 हजार 444 शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेली 500 कोटी रुपयांच्या मदतीची तरतूद अपुरी आहे. मोठ्या प्रमाणात कांदा, बी बियाणे सडल्याने त्यांचा तुटवडा निर्माण होणार आहे. मार्केट कमिटीत कांदा घेतला पाहिजे मात्र तेथे खरेदी होत नाही. शेतकऱ्यांनी कांदा कुठे द्यायचा याबाबत सरकारने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. कांदा उत्पादक शेतकरी अनुदानाची वाट पहात आहे म्हणून सरकार शेतकऱ्यांना पैसे कधी आणि किती देणार हे स्पष्ट करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. त्याला सरकारतर्फे उत्तर देताना मंत्री अब्दुल सत्तार यांनी पैसे देणार असेच उत्तर देत राहिल्याने विरोधकांनी सरकारची चांगलीच कोंडी केली.

कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्याला 350 रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्याचे जाहीर केले. मार्च महिन्यातील अधिवेशनात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यासंदर्भात चर्चा झाली. मंत्री म्हणाले, नाफेडमार्फत कांदा खरेदी करणार तर उपमुख्यमंत्री म्हणाले खरेदी चालू झाली. सरकारमध्येच विसंगती असल्याचे स्पष्ट दिसले अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी केली.

सरकारने घोषणा करून तीन महिने झाले. शेतकऱ्यांना अनुदान देऊन देणार किती तर किलोमागे २ रुपये, तीन रुपये, पण ते देण्यासही टाळाटाळ करत आहेत असा आरोप सतेज पाटील यांनी केला. विरोधी पक्षनेत्यांच्या मते 700 ते 800 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. सरकार सांगते पुरवणी मागण्या मागितल्या आहेत. पण, त्यात किती रक्कम मागितली आहे ते सरकार सांगत नाही. मार्चमध्ये जाहीर केलेले पैसे डिसेंबरला देणार का? असा संतप्त सवालही त्यांनी केला.

सरकार म्हणते ३ लाख लोकांची यादी आहे पण काल संध्याकाळपर्यंत तर पणन खाते याद्यांची तपासणी करत होते. सरकारकडे अद्याप अनुदानास पात्र शेतकऱ्यांच्या याद्याच तयार नाहीत असे ते म्हणाले. तर, शशिकांत शिंदे यांनी शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार त्याची तारीख मंत्र्यांनी सांगावी, अशी मागणी केली.

याला उत्तर देताना मंत्री अब्दुल सत्तार यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यासंदर्भात शासन सकारात्मक आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येत्या 15 ऑगस्टपर्यंत प्रलंबित अनुदानाची रक्कम जमा केली जाईल अशी घोषणा केली. तसेच, ई पीक पाहणी नोंद न केलेल्या शेतकऱ्यांनाही अनुदान देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.