AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : किनवटमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, बंधारे फुटले, 50 एकराहून अधिक जमीन खरडून गेली!

किनवट तालुक्यातील गोंडजेवली इथे शनिवारी ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. या अतिवृष्टीमुळे शिवारातील माती बंधारे फुटून त्याचे पाणी शेतात शिरल्याने पन्नास एकराहून अधिक जमीन खरडून गेलीय. (Cloud burst Rain kinwat nanded big loss to farmers)

Video : किनवटमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, बंधारे फुटले, 50 एकराहून अधिक जमीन खरडून गेली!
किनवट तालुक्यातील शिवणी या महसूल मंडळात जोरदार पाऊस झाला. तर गोंडजेवली गावावर आभाळ फाटल्यागत पाऊस बरसलाय...
Reporter Rajiv Giri
Reporter Rajiv Giri | Edited By: Akshay Adhav | Updated on: Jul 11, 2021 | 8:43 AM
Share

नांदेड : किनवट तालुक्यातील गोंडजेवली इथे शनिवारी ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. या अतिवृष्टीमुळे शिवारातील माती बंधारे फुटून त्याचे पाणी शेतात शिरल्याने पन्नास एकराहून अधिक जमीन खरडून गेलीय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झालंय. (Cloud burst Rain kinwat nanded big loss to farmers)

या गावाला जोडणारा रस्ता देखील या पावसात वाहून गेलाय. या अतिवृष्टीची नोंद घेऊन महसूल विभागाने प्राथमिक पंचनामा केला असून सोमवारी कृषि विभाग नुकसानीची माहिती घेऊन भरपाईची कारवाई करेल असे सांगण्यात आलंय.

पन्नास एकर क्षेत्रावरील पिके वाहून गेली

किनवट तालुक्यातील शिवणी या महसूल मंडळात जोरदार पाऊस झाला. तर गोंडजेवली गावावर आभाळ फाटल्यागत पाऊस बरसलाय. त्यामुळे या गावाजवळ असलेला जुना मातीचा बंधारा फुटून त्याचे पाणी शेतात शिरले. त्यामुळे परिसरातील जवळपास पन्नास एकर क्षेत्रावरील पिके वाहून गेलीत तर जमीन खरडून गेल्याने आता दुबार पेरणी देखील शक्य नाही. त्यामुळे या गावातील पन्नास हुन अधिक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलंय.

आधीच लॉकडाऊन, त्यात पावसाचा झटका, पिकांचं मोठं नुकसान

आधीच लॉकडाऊन आणि कोरोनामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसाचा जोरदार फटका बसलाय. शेतीच्या या नुकसानीची महसूल विभागाने नोंद घेतलीय. तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य सूर्यकांत आरंडकर यांनी पाहणी करत आढावा घेतलाय.

कृषी विभागाने आढावा घेतला

आरंडकर यांनी झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाला दिलीय. जिल्हा प्रशासनाच्या वतीने कृषी विभागाचे अधिकारी सोमवारी गोंडजेवली गावाला भेट देऊन नुकसानीचे पंचनामे करणार आहेत. दरम्यान, ढगफुटी सदृश्य पावसाने गोंडजेवलीच्या ग्रामस्थांच्या तोंडचे पाणी पळालय.

(Cloud burst Rain kinwat nanded big loss to farmers)

हे ही वाचा :

मुंडे भगिनी समर्थकांमधील नाराजीचे लोण आता अहमदनगरपर्यंत, पाथर्डी पंचायत समितीच्या सभापतींचा राजीनामा

भास्कर जाधवांच्या सुस्साट गाडीला बाळासाहेब थोरातांचा ब्रेक, म्हणाले, ‘काँग्रेसमध्येही असे अनेक भास्कर जाधव!’

‘देश उलथवून टाकण्याच्या कटात हा म्हातारा म्हणे सामील होता, कोणता देश? कोणाचा देश?’, राऊतांचा संताप

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली