AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेस स्वबळावर लढणार?, विजय वडेट्टीवार म्हणतात, हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज नाही

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचं जाहीर केलं आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांना हा निर्णय पटलेला दिसत नाही. (vijay wadettiwar)

काँग्रेस स्वबळावर लढणार?, विजय वडेट्टीवार म्हणतात, हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज नाही
विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री
| Edited By: | Updated on: Jul 16, 2021 | 4:41 PM
Share

अलिबाग: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचं जाहीर केलं आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांना हा निर्णय पटलेला दिसत नाही. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी निवडणुकांना अजून तीनस साडेतीन वर्षे बाकी आहेत. त्यामुळे हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असं सांगितलं. त्यामुळे स्वबळाच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्येच एकवाक्यता नसल्याचं दिसून आलं आहे. (congress high command will take decision for alliance in maharashtra poll, says vijay wadettiwar)

विजय वडेट्टीवार आज अलिबागमध्ये होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नाना पटोले यांनी कुणावरही टीका केलेली नाही. ते पक्षवाढीचं काम करताहेत त्‍यासाठी हायकमांडने त्‍यांना पाठवलं आहे. शब्‍दाच्‍या अर्थाचा अनर्थ करून महाविकास आघाडीत अस्थिरता आहे हे दाखवायचं हा नवा धंदाच विरोधी पक्षांनी सुरू केलेला आहे. तिन्ही पक्षांमध्‍ये उत्‍तम समन्‍वय आहे. पाच वर्षे हे सरकार टिकणार आहे. कितीही आरोप केले, सरकारला बदनाम केलं तरी सरकारला काहीच धोका नाही. आज जाईल, उद्या जाईल म्‍हणता म्‍हणता या सरकारने दीड वर्ष पूर्ण केली आहेत. पुढची साडेतीन वर्षेही पूर्ण होतील, असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.

हायकमांडच निर्णय घेतील

तिन्ही पक्षांचा अजेंडा महाराष्ट्र विकासाचा आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांची देशातील नंबर वनचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. हे महाविकास आघाडी सरकारचे यश आहे. त्‍यामुळे आघाडीत भांडण लावण्‍याची संधी विरोधी पक्ष शोधत आहे, असं सांगतानाच महाविकास आघाडी दुखावली जाईल असं कोणतंही विधान नाना पटोले यांनी केलेलं नाही. आघाडीतील कोणाचाही अपमान होईल, असंही वक्तव्य त्यांनी केलं नाही. पक्षाची बाजू मांडत असताना ते स्‍वतंत्र लढण्‍याची भूमिका ठेवत असतात. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीला अजून तीन साडेतीन वर्षे वेळ आहे. त्‍यावेळी जी परिस्थिती असेल त्यानुषंगाने हायकमांड निर्णय घेतील. आता तरी हा‍ विषय फारसा गांभीर्याने घेण्‍याची गरज नाही, असं ते म्हणाले. (congress high command will take decision for alliance in maharashtra poll, says vijay wadettiwar)

संबंधित बातम्या:

संजय राठोड आमचे दुश्मन नाहीत, शिवसेना तर बिलकुल नाही : चंद्रकांत पाटील

ज्या अनिल देशमुखांची ईडीनं 4 कोटींची संपत्ती जप्त केली, ते नेमक्या किती प्रॉपर्टीचे धनी?

काँग्रेस, राष्ट्रवादीला ओबीसी नेतृत्व तयार होऊ द्यायचेच नाही; हंसराज अहिर यांचा आरोप

(congress high command will take decision for alliance in maharashtra poll, says vijay wadettiwar)

Follow Us
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.