AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्ही काही धर्मार्थ दवाखाना सुरू केला नाही, राजकारण असंच असतं; नाथाभाऊंचा महाजनांना टोला

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप नेते गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र या निवडणुकीत भाजपला सपाटून मार खावा लागला आहे.

आम्ही काही धर्मार्थ दवाखाना सुरू केला नाही, राजकारण असंच असतं; नाथाभाऊंचा महाजनांना टोला
eknath khadse
| Edited By: | Updated on: Nov 27, 2021 | 8:19 PM
Share

जळगाव: जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप नेते गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र या निवडणुकीत भाजपला सपाटून मार खावा लागला आहे. या पराभवानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीने यू-टर्न घेतल्यानेच आमची कोंडी झाली, असं महाजन म्हणाले होते. त्यावर, आम्ही काही धर्मार्थ दवाखाना सुरू केलेला नाही. राजकारण असंच असतं, असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी लगावला आहे.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यलयात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हा टोला लगावला आहे. जिल्हा बँक निवडणुकीत माजी मंत्री गिरीश महाजन पैसे लावतील अशी उमेदवारांना आशा होती. पण त्यांचा नाऊमेद झाला आहे. उमेदवार मात्र त्यांनी दहा कोटी लावले तर मी वीस कोटी लावेल, नाथाभाऊ बसला आहे, तुम्ही फक्त लढा असे म्हणत मी नाउमेद असणाऱ्यांना जिल्हा बँक निवडणूक लढायला लावली, असं खडसे म्हणाले.

शब्द खरा करून दाखवला

ऐन निवडणुकीच्या काळात मी दवाखान्यात होतो. त्यावेळी भाजपचा एकही उमेदवार निवडून येणार नाही असा शब्द मी दिला होता. आम्ही योग्य वेळी आणि शेवटच्या दिवशी फॉर्म भरायला सुरुवात केली. त्यानंतर विजयही मिळवला आणि शब्द खरा करून दाखवला, असंही त्यांनी सांगितलं.

म्हणून महापौर बदलला

माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा बँक निवडणुकीत आमचा विश्वासघात झाल्याचा आरोप केला होता. जिल्हा निवडणूक बँकेसाठी सर्वपक्षीय पॅनलच्या माध्यमातून दोन बैठका झाल्या. या बैठका यशस्वीही झाल्या. त्यानंतर राष्ट्रवादी व काँग्रेसच्या यू-टर्नमुळे भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोपही महाजन यांनी केला होता. त्यालाही खडसे यांनी उत्तर दिलं. राजकारण हे असच असतं. आम्ही काही धर्मार्थ दवाखाने नाही चालवत, असा टोल लगावतानाच जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांनी 21 उमेदवार उभे करण्याची तयारी ठेवली असती का? असा सवालही त्यांनी केला. जळगाव महानगर पालिकेत नाथाभाऊने धक्का दिला म्हणून तिथे महापौर बदलला, असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

संबंधित बातम्या:

जोपर्यंत विलीनीकरण नाही, तोपर्यंत संप मागे नाही, एसटी कर्मचाऱ्यांचा लढा सुरूच राहणार: गुणरत्न सदावर्ते

युरोप, आफ्रिकेत नव्या कोरोना विषाणूचा उद्रेक, शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचे काय होणार? टोपे म्हणतात…

संजय राऊतांच्या घरी लगीनघाई ! लेकीचं हास्य टिपण्यासाठी ‘किंगमेकर’ बनला फोटोग्राफर

Follow Us
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.