AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाचं अक्राळविक्राळ रुप, सुन्न करणारं सारं काही, चंद्रपूरमध्ये हाहा:कार

चंद्रपूर शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरुय. गुरुवारी रात्री झालेल्या पावसानं इरई नदीला पूर आला आणि चंद्रपुरात होत्याचं नव्हतं झालंय. चंद्रपूर शहरातील महापुराचं विदारक चित्र सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट!

पावसाचं अक्राळविक्राळ रुप, सुन्न करणारं सारं काही, चंद्रपूरमध्ये हाहा:कार
| Updated on: Jul 28, 2023 | 10:41 PM
Share

चंद्रपूर | 28 जुलै 2023 : गेल्या 24 तासात चंद्रपूर तालुक्यासह जिल्ह्यातील 5 तालुक्यात अतिवृष्टी झालीय. जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या 54 टक्के इतका पाऊस झालाय. मुसळधार पावसानं केवळ इरईच नाही तर झरपट नदीच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झालीय. चंद्रपूर शहराच्या उत्तरेला इरई धरण आहे. धरण परिसरात गेला आठवडाभर तुफान पाऊस झाल्यानं इरई धरण तब्बल 87 टक्के भरलंय. धरणाचे 7 पैकी 2 दरवाजे 0.25 मीटरनं उघडण्यात आलेत. त्यामुळं इरई नदीत सकाळी 10 वाजता पाण्याचा विसर्ग सुरु झाला. इरई नदी चंद्रपूर शहराच्या पश्चिमेकडून वाहते आणि पुढे जाऊन दक्षिणेकडील वर्धा नदीला मिळते.

मात्र, वर्धा नदीलाच पूर आल्यानं इरईचं पाणी वर्धा नदीत मिसळण्यात अडचण निर्माण झाली. अशावेळी इरई नदीचं पाणी पात्र सोडून चंद्रपूर शहरात घुसलंय. इरई धरणाचे अजूनही काही दरवाजे उघडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं पाऊस थांबला नाही तर शहराला असलेला धोका अजूनच वाढण्याची शक्यता आहे.

चंद्रपूर शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेलाय. आतापर्यंत जवळपास हजार लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलंय. मात्र, हे रेस्क्यू ऑपरेशनही काही सोपं नव्हतं. रेस्क्यू ऑपरेशनवेळी एक अपघात घडला. मात्र यात कुठलीही अप्रिय घटना घडली नाही. चंद्रपुरात पावसानं थैमान घातल्यानं वाहतुकीवरही मोठा परिणाम झालाय.

चंद्रपूर जिल्ह्यातील कोणते रस्ते बंद?

राजुरा-बल्लारपूर राजूरा-सास्ती धानोरा-भोयगाव गौवरी कॉलनी-पोवणी कोरपना-कोडशी रूपापेठ-मांडवा जांभूळधरा-उमरहिरा पिपरी-शेरज, पारडी-रुपापेठ कोडशी-पिपरी कोरपना-हातलोणी कुसळ-कातलाबोडी-कोरपना शेरज-हेटी

रस्त्यांवर अनेक तासांपासून वाहतूक बंद

अनेक मार्गांवरील वाहतूक बंद असल्यानं वाहतूक कोंडी निर्माण झालीय. त्यामुळे रस्त्यांवर अनेक तासांपासून वाहनं उभी आहेत. तर काही जण पुराच्या पाण्यातूनच वाट काढताना दिसतायंत. पुराचं पाणी शहरात तर घुसलंच. दुसरीकडे शेतीचंही मोठं नुकसान झालंय.

कालपर्यंत वाऱ्यानं डोलणारी पिकं अक्षरश: झोपली आहेत. काही ठिकाणी शेतातली मातीही खरडून गेलीय. त्यामुळे आता करायचं काय? असा प्रश्न इथला बळीराजा विचारतोय.

विरोधकांकडून सरकारवर निशाणा

चंद्रपूरसह राज्यभरात निर्माण झालेल्या पूरस्थितीवर आता विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधण्यात आलाय. तर सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी असल्याचं सत्ताधारी नेते सांगत आहेत.

मागील वर्षातही इरई नदीला पूर आला होता. त्यावेळी रहिमतनगर परिसर पाण्याखाली गेला होता. आता सरकार पूरग्रस्तांना मदत करेलही, मात्र ती तातडीनं मिळावी. आज ज्यांचे संसार उघड्यावर पडलेत, ज्यांना घरदार सोडून निवारा केंद्रावर राहावं लागतंय. त्यांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सरकारनं पावलं उचलावी अशी अपेक्षा या पूरग्रस्तांना आहे.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.