AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Rains : राधानगरीचे दरवाजे उघडणार, कोल्हापूरला पुन्हा पुराचा फटका बसणार?; नेव्ही, आर्मी सज्ज

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कोल्हापुरातही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. (Kolhapur Rain)

Maharashtra Rains : राधानगरीचे दरवाजे उघडणार, कोल्हापूरला पुन्हा पुराचा फटका बसणार?; नेव्ही, आर्मी सज्ज
Kolhapur Rain
| Edited By: | Updated on: Jul 23, 2021 | 11:59 AM
Share

कोल्हापूर: गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कोल्हापुरातही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज संध्याकाळी राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले जाणार असल्याने कोल्हापूरला पुराचा आणखी फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पूरपरिस्थितून नागरिकांची सुटका करण्यासाठी नेव्ही आणि आर्मीलाही सज्ज करण्यात आलं आहे. (flood in kolhapur: keep the emergency system ready, instructions given by Satej Patil)

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात सरासरी 150 मिलीमीटर पाऊस झाला आहे. आज रात्रीपर्यंत पंचगंगा नदीची पाणीपातळी 53 फुटावर जाण्याचा अंदाज आहे. दुर्देवाने जिल्ह्यात 2019 सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करण्यात आलं आहे. तसेच गरज भासल्यास एनडीआरएफच्या आणखी दोन टीम जिल्ह्यात मागवण्यात येणार आहे, असं सतेज पाटील यांनी सांगितलं.

प्रवाशांना 24 तास थांबावं लागणार

आज संध्याकाळपर्यंत राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडतील. याचा फटका काही प्रमाणात बसणार आहे. भयावह पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून कर्नाटक सरकारशी बोलणं सुरू आहे. अलमट्टी धरणातून नियोजनबद्ध पाणी सोडलं जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पुणे-बंगलोर महामार्गावरील कर्नाटककडे जाणारी वाहतूक बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. या महामार्गावरील एकच लाईन सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पावसामुळे अडकून पडणाऱ्या प्रवाशांसाठी त्या-त्या जिल्ह्यातील प्रशासन मदत करेल. किमान 24 तास प्रवाशांना थांबावं लागेल, असं त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

हॉस्पिटलमध्ये अडकून पडलेल्या सर्व रुग्णांना बाहेर काढण्यात आलं आहे. त्यांना शहरातील इतर हॉस्पिटलमध्ये उपचार दिले जात आहेत. सध्या नेव्ही आणि आर्मी यांना होल्डवर ठेवला आहे. गरज वाटल्यास त्यांना ही बोलावू. मात्र सध्या तशी परिस्थिती नाही. मुख्यमंत्र्यांना पूरपरिस्थिती संदर्भात माहिती दिली आहे. आवश्यक ती मदत करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (flood in kolhapur: keep the emergency system ready, instructions given by Satej Patil)

संबंधित बातम्या:

Maharashtra Rains : कोल्हापुरात दसरा चौकापर्यंत पाणी, सांगलीत कृष्णेचं विक्राळ रुप, साताऱ्यात 7-8 घरं ढिगाऱ्याखाली

Mumbai Rains: गोवंडीत घर कोसळून 3 ठार, 7 जखमी; ढिगारा उपसण्याचे काम सुरू

Konkan Rains: कोकणवासियांना तातडीने मदत देण्यासाठी केंद्र स्तरावर चर्चा सुरू; रावसाहेब दानवे घेणार आढावा

(flood in kolhapur: keep the emergency system ready, instructions given by Satej Patil)

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.