AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यपालांच्या दौऱ्यावरुन राष्ट्रवादी आक्रमक, बैठक रद्द न केल्यास काळे झेंडे दाखवण्याचा इशारा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि ठाकरे सरकार यांच्यात नव्या वादाची ठिणगी पडलीय. राज्यपालांच्या परभणी, हिंगोली आणि नांदेडच्या दौऱ्यावरुन ठाकरे सरकारनं तीव्र नाराजी व्यक्त केलीय.

राज्यपालांच्या दौऱ्यावरुन राष्ट्रवादी आक्रमक, बैठक रद्द न केल्यास काळे झेंडे दाखवण्याचा इशारा
परभणी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
| Edited By: | Updated on: Aug 04, 2021 | 5:02 PM
Share

प्रशांत चलींद्रवार, टीव्ही 9 मराठी परभणी: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि ठाकरे सरकार यांच्यात नव्या वादाची ठिणगी पडलीय. राज्यपालांच्या परभणी, हिंगोली आणि नांदेडच्या दौऱ्यावरुन ठाकरे सरकारनं तीव्र नाराजी व्यक्त केलीय. राज्यपालांनी सरकारच्या नाराजीनंतरही दौरा करण्याचं निश्चित केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्यपालांवर मंगळवारी पत्रकार परिषद घेत टीका केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राज्यपालांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक रद्द न केल्यास काळ्या टोप्या काळे झेंडे दाखवून राष्ट्रवादी निषेध करणार असल्याचं जिल्हाध्यक्ष किरण सोनटक्के यांनी सांगितलंय.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी 6 आणि 7 ऑगस्ट रोजी परभणी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे भेट देऊन ते जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत. ही बैठक आता वादात सापडली असून राष्ट्रवादी काँग्रेसने या बैठकीला विरोध केलाय. राज्यपालांना अशा पद्धतीने बैठक घेण्याचा अधिकार नाही त्यामुळे त्यांनी ही बैठक रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादीने काँग्रेसने केली. याबाबतचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी महेश वादडकर यांना देण्यात आले. या निवेदनात राज्यपालांनी बैठक रद्द न केल्यास राष्ट्रवादी कडून राज्यपाल यांच्या वर्तनाचा काळ्या टोप्या काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करण्यात येणार आहे, असं किरण सोनटक्के म्हणाले.

राज्यपाल नांदेड दौऱ्यावर

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी येत्या 5 ऑगस्टला नांदेड दौऱ्यावर येणार आहेत. नांदेड विद्यापीठातील दोन नव्या वसतिगृहाचे उदघाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यासाठी नांदेड विद्यापीठाने जय्यत तयारी केलीय. या दोन्ही नव्या वसतिगृहाचे काम अंतिम टप्प्यात आलेयत. मात्र, राज्यपालांच्या या दौऱ्यावर अल्पसंख्याक कल्याण मंत्री नवाब मलिक यांनी सवाल उपस्थित केलाय. त्यामुळे आता राज्यपालांचा नांदेड दौरा वादात सापडलाय.

नवाब मलिक यांचा राज्यपालांना टोला

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हिंगोली, परभणी आणि नांदेडच्या दौऱ्यावर महाविकास आघाडीने आक्षेप घेतला आहे. राज्यपाल हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री नाहीत तर ते राज्यपाल आहेत, हे त्यांनी समजून घ्यावं, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला आहे.

इतर बातम्या:

राज्यात दोन वेगळी सत्ताकेंद्र निर्माण करण्याचं काम राज्यपालांकडून सुरु, नवाब मलिकांचा गंभीर आरोप

HSC Result 2021 Maharashtra Pass Percentage: 12 विद्यार्थ्यांना 35 टक्के तर 46 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण; वाचा, 12वीचा सविस्तर निकाल

Parbhani NCP oppose Governor Bhagatsingh Koshyari review meeting in Collector Office

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.