AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापूर शहरातील निर्बंध पाच दिवसांसाठी हटवले, राज्य शासनाचा निर्णय; पण पालकमंत्र्यांचं कळकळीचं आवाहन

शहरातील निर्बंध पाच दिवसांसाठी हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 5 ते 9 जुलै या कालावधीत अत्यावश्यक सेवेसह सर्वच दुकान खुली होणार आहेत. | Restrictions in Kolhapur city lifted for five days

कोल्हापूर शहरातील निर्बंध पाच दिवसांसाठी हटवले, राज्य शासनाचा निर्णय; पण पालकमंत्र्यांचं कळकळीचं आवाहन
कोल्हापूर शहरातील निर्बंध पाच दिवसांसाठी हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Jul 05, 2021 | 8:19 AM
Share

कोल्हापूर : शहरातील निर्बंध पाच दिवसांसाठी हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. (Restrictions in Kolhapur city lifted for five days State Government Decision Satej patil Appeal To kolhapurkar)

हटवलेल्या निर्बंधानंतर 5 ते 9 जुलै या कालावधीत अत्यावश्यक सेवेसह सर्वच दुकान खुली होणार आहेत. सकाळी 7 ते सायंकाळी 4 पर्यंत दुकान खुली करायला राज्य सरकारकडून परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु विनाकारण गर्दी करु नये, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन करावं, अशी अट राज्य शासनाने घालून दिली आहे.

पाच दिवसानंतर पुन्हा आढावा घेतला जाणार

पाच दिवसानंतर पुन्हा परिस्थितीचा आढावा घेऊन पुढचा निर्णय घेतला जाणार आहे, असं राज्य शासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे नियमांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. तसंच गर्दीचे प्रकार घडल्यास पुन्हा निर्बंध कडक करण्याचा देखील इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय.

राज्य शासनाच्या निर्णयाने व्यापाऱ्यांना दिलासा

कोल्हापूर शहरातील निर्बंध पाच दिवसांसाठी हटवण्याच्या निर्णयाने व्यापाऱ्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. कारण गेल्या कित्येक दिवसांपासून कोल्हापूर शहरातील व्यापारी निर्बंधांमुळे अडचणीत सापडले होते. राज्य सरकारच्या निर्बंधांमुळे त्यांना दुकानं बंद ठेवावी लागायची. मात्र आता शासनाच्या निर्णयानंतर व्यापाऱ्यांना दिलासा म्हणावा लागेल.

ग्रामीण भागात निर्बंध कायम

कोल्हापूर शहरातील जरी निर्बंध हटवले गेले असले तरी ग्रामीण भागात मात्र निर्बंध कायम आहेत. ग्रामीण भागातील निर्बंध हटण्यासाठी जनतेला आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

पालकमंत्री सतेज पाटील काय म्हणाले?

कोल्हापुरातील पॉझिटिव्हिटी रेट आणि रुग्णसंख्या याबाबत प्रभारी जिल्हाधिकारी यांनी शासनाला एक पत्र पाठवलं होतं. जनभावनेचा विचार करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांनी कोल्हापूर शहरातील निर्बंध पाच दिवसासाठी हटवले आहेत. शासनाने जनतेच्या हिताचा निर्णय घेतला आहे. मात्र जनतेने देखील सरकारने घालून दिलेले निर्बंध पाळायला हवेत, असं कोल्हापूर शहराचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.

आपण केलेल्या एखाद्या अनावश्यक कृतीमुळे हातावर पोट असणाऱ्या गरजू लोकांना विनाकारण त्रास सहन करावा लागू नये, याची काळजी लोकांनी घ्यावी. योग्य ती दक्षता घेऊन कोल्हापूर शहरातील व्यवहार सुरू ठेवावेत, असं आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केलं.

(Restrictions in Kolhapur city lifted for five days State Government Decision Satej patil Appeal To kolhapurkar)

हे ही वाचा :

कोरोनाच्या नावाखाली लोकशाहीला कुलुप ठोकली जातेय; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका

‘आक्रोश’ दाबण्याचा प्रयत्न केला तरी मराठा समाज झुकणार नाही; चंद्रकांत पाटलांनी सरकारला ठणकावले

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा