AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“उद्धव ठाकरेला लाज वाटली पाहिजे, तुम्ही मुख्यमंत्री असतानाच…”; शिवसेनेच्या नेत्याने ‘या’ गोष्टीवरून उद्धव ठाकरे यांची लाज काढली

मोर्चे काढायचे आंदोलन करायचे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किती नालायक हे हे लोकांना सांगायचे आणि एक प्रकारचा आभास निर्माण करायचा हा कार्यक्रम उद्धव ठाकरे यांचा चालू असल्याचा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

उद्धव ठाकरेला लाज वाटली पाहिजे, तुम्ही मुख्यमंत्री असतानाच...; शिवसेनेच्या नेत्याने 'या' गोष्टीवरून उद्धव ठाकरे यांची लाज काढली
| Updated on: May 07, 2023 | 1:00 AM
Share

मुंबई : उद्धव ठाकरे यांची महाडमध्ये सभा झाल्यानंतर आता शिवसेनेच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. रामदास कदम, संजय शिरसाठ यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली आहे. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी थेट त्यांची लाज काढली आहे. उद्धव ठाकरेला लाज वाटली पाहिजे तुम्ही मुख्यमंत्री असताना हा प्रोजेक्ट तुम्हीच आणलात आणि बारसू हेदेखील तुम्हीच सुचवले असा आणि आता कुठलं काळ तोंड करून कातळशिल्प वागायला जात आहात. तुम्हाला थोडी शरम असती तर तिकडे गेला नसता असा टोला त्यांना उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

हा माणूस किती विश्वास घातकी आहे हे फक्त एकनाथ शिंदे हेच सांगू शकतील. त्यांचे मुख्यमंत्री पद कसे घालवता येईल एवढाच सुडाच्या भावनेने हा माणूस पेटला आहे अशी जहरी टीकाही त्यांनी केली आहे.

रामदास कदम यांन त्यांच्यावर टीका करताना एकेरी भाषेत टीका करताना ते म्हणाले की, तू सर्व आमदार खासदाराना भेटला असता, फंड आणून दिला असता तर तुझ्यावर ही वेळ आली नसती अशी शब्दात त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

यावेळी त्यांनी तू अडीच वर्षे मातोश्रीमध्ये कोंबड्यासारखा बसून राहिला होता अशी जहरी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

जर सरकार कोसळेल तर त्यावरती तू शिका मारतोस का तू काय केलं होतं तेव्हा आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर तू एकाच हेतूसाठी रान पेटवत आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

यावेळी त्यांनी बारसुमध्ये जर आता लाठीचार्ज किंवा गोळीबार झाला आणि त्यात कोणी शहीद झाले तर उद्धव ठाकरे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा ताबडतोब दाखल करा, या प्रकरणी आग लावायचे काम हेच करत आहेत असा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

कोकणातील माणसांवर अन्याय आम्ही होऊच देणार नाही, कारण उद्धव ठाकरे यांनी कोकणातील नेत्यांना संपवण्याची सुपारी घेतली आहे.

उद्धव ठाकरे यांना कोकणातील लोकांचे काही घेणेदेणे नाही हा फक्त लोकांना बेगडी रूप दाखवत आहे, महाराष्ट्रातला कोणीही माणूस याच्यावर विश्वास ठेवणार नाही आता हे त्याचे मगरीचे प्रेम असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

ठाण्यातील आंदोलनात दुर्गा भोसले हिचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला होता आणखी किती लोकांचे प्राण उध्दव ठाकरेंना घ्यायचे आहेत असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

मोर्चे काढायचे आंदोलन करायचे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किती नालायक हे हे लोकांना सांगायचे आणि एक प्रकारचा आभास निर्माण करायचा हा कार्यक्रम उद्धव ठाकरे यांचा चालू असल्याचा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.