AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“उद्धव ठाकरेला लाज वाटली पाहिजे, तुम्ही मुख्यमंत्री असतानाच…”; शिवसेनेच्या नेत्याने ‘या’ गोष्टीवरून उद्धव ठाकरे यांची लाज काढली

मोर्चे काढायचे आंदोलन करायचे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किती नालायक हे हे लोकांना सांगायचे आणि एक प्रकारचा आभास निर्माण करायचा हा कार्यक्रम उद्धव ठाकरे यांचा चालू असल्याचा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

उद्धव ठाकरेला लाज वाटली पाहिजे, तुम्ही मुख्यमंत्री असतानाच...; शिवसेनेच्या नेत्याने 'या' गोष्टीवरून उद्धव ठाकरे यांची लाज काढली
| Updated on: May 07, 2023 | 1:00 AM
Share

मुंबई : उद्धव ठाकरे यांची महाडमध्ये सभा झाल्यानंतर आता शिवसेनेच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. रामदास कदम, संजय शिरसाठ यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली आहे. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी थेट त्यांची लाज काढली आहे. उद्धव ठाकरेला लाज वाटली पाहिजे तुम्ही मुख्यमंत्री असताना हा प्रोजेक्ट तुम्हीच आणलात आणि बारसू हेदेखील तुम्हीच सुचवले असा आणि आता कुठलं काळ तोंड करून कातळशिल्प वागायला जात आहात. तुम्हाला थोडी शरम असती तर तिकडे गेला नसता असा टोला त्यांना उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

हा माणूस किती विश्वास घातकी आहे हे फक्त एकनाथ शिंदे हेच सांगू शकतील. त्यांचे मुख्यमंत्री पद कसे घालवता येईल एवढाच सुडाच्या भावनेने हा माणूस पेटला आहे अशी जहरी टीकाही त्यांनी केली आहे.

रामदास कदम यांन त्यांच्यावर टीका करताना एकेरी भाषेत टीका करताना ते म्हणाले की, तू सर्व आमदार खासदाराना भेटला असता, फंड आणून दिला असता तर तुझ्यावर ही वेळ आली नसती अशी शब्दात त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

यावेळी त्यांनी तू अडीच वर्षे मातोश्रीमध्ये कोंबड्यासारखा बसून राहिला होता अशी जहरी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

जर सरकार कोसळेल तर त्यावरती तू शिका मारतोस का तू काय केलं होतं तेव्हा आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर तू एकाच हेतूसाठी रान पेटवत आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

यावेळी त्यांनी बारसुमध्ये जर आता लाठीचार्ज किंवा गोळीबार झाला आणि त्यात कोणी शहीद झाले तर उद्धव ठाकरे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा ताबडतोब दाखल करा, या प्रकरणी आग लावायचे काम हेच करत आहेत असा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

कोकणातील माणसांवर अन्याय आम्ही होऊच देणार नाही, कारण उद्धव ठाकरे यांनी कोकणातील नेत्यांना संपवण्याची सुपारी घेतली आहे.

उद्धव ठाकरे यांना कोकणातील लोकांचे काही घेणेदेणे नाही हा फक्त लोकांना बेगडी रूप दाखवत आहे, महाराष्ट्रातला कोणीही माणूस याच्यावर विश्वास ठेवणार नाही आता हे त्याचे मगरीचे प्रेम असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

ठाण्यातील आंदोलनात दुर्गा भोसले हिचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला होता आणखी किती लोकांचे प्राण उध्दव ठाकरेंना घ्यायचे आहेत असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

मोर्चे काढायचे आंदोलन करायचे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किती नालायक हे हे लोकांना सांगायचे आणि एक प्रकारचा आभास निर्माण करायचा हा कार्यक्रम उद्धव ठाकरे यांचा चालू असल्याचा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.