AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाहुणा म्हणून गावात आला, मावस भावासोबत वैरण काढायला नदीत उतरला, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही…

वैरणीचे चार मोदळे काढून झाल्यावर नदीपात्रात उतरले. दोघांनाही पोहायला येत नव्हते. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला.

पाहुणा म्हणून गावात आला, मावस भावासोबत वैरण काढायला नदीत उतरला, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही...
| Updated on: May 27, 2023 | 7:48 PM
Share

शंकर देवकुळे, प्रतिनिधी,  सांगली : रविराज हा सातव्या वर्गात शिकतो. तर अमोल हा दहाव्या वर्गात शिकत होता. आता दहावीच्या परीक्षेचा निकाल लागेल म्हणून तो वाट पाहत होता. उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने दोघेही नदी परिसरात गेले. पण, दोघांनाही पोहता येत नव्हते. पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे दोघांचाही बुडून मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील वारणा नदीत बुडून दोन सख्या मावस भावांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने गावातील परिसरात आणि कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

काल दुपारी २ च्या सुमारास अमोल प्रकाश सुतार (वय १६ वर्षे, रा.तांदुळवाडी) आणि सुट्टीनिमित्त आलेला आपला मावस भाऊ रविराज उत्तम सुतार (वय वर्षे १२, रा. कराड तालुक्यातील राजमाची) याला घेऊन वैरण काढायला नदीत गेले. ते वारणा नदीकाठावर गेले.

दोघांचाही बुडून मृत्यू

वैरणीचे चार मोदळे काढून झाल्यावर नदीपात्रात उतरले. दोघांनाही पोहायला येत नव्हते. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती कुरळप पोलीस ठाण्यात कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. लाईफ फाऊंडेशन रेस्क्यू फोर्स यांच्या टीमला पाचारण करण्यात आले. या टीमने दोघांचेही प्रेत पाण्यातून बाहेर काढलेत.

रविराज आला होता मावशीकडे

रविराज सुतार हा सुट्टीनिमित्त आपल्या मावशीकडे आला होता. तो सातव्या वर्गात शिकत होता. त्याचे आई वडील हे रोजंदारी करतात. आज रविराजचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे राजमाची आणि रविराज याच्या घरी शोककळा पसरली आहे.

अमोलने दिली होती दहावीची परीक्षा

अमोल प्रकाश सुतार हा आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याने नुकतीच १० वीची परीक्षा दिली होती. प्रकाश सुतार यांचीही परिस्थिती बेताचीच आहे. तरुण मुलगा मृत्यू झाल्याने घरावर दुखाचा डोंगर कोसळले आहे. सख्या मावस भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने या दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.