AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाहुणा म्हणून गावात आला, मावस भावासोबत वैरण काढायला नदीत उतरला, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही…

वैरणीचे चार मोदळे काढून झाल्यावर नदीपात्रात उतरले. दोघांनाही पोहायला येत नव्हते. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला.

पाहुणा म्हणून गावात आला, मावस भावासोबत वैरण काढायला नदीत उतरला, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही...
| Updated on: May 27, 2023 | 7:48 PM
Share

शंकर देवकुळे, प्रतिनिधी,  सांगली : रविराज हा सातव्या वर्गात शिकतो. तर अमोल हा दहाव्या वर्गात शिकत होता. आता दहावीच्या परीक्षेचा निकाल लागेल म्हणून तो वाट पाहत होता. उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने दोघेही नदी परिसरात गेले. पण, दोघांनाही पोहता येत नव्हते. पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे दोघांचाही बुडून मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील वारणा नदीत बुडून दोन सख्या मावस भावांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने गावातील परिसरात आणि कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

काल दुपारी २ च्या सुमारास अमोल प्रकाश सुतार (वय १६ वर्षे, रा.तांदुळवाडी) आणि सुट्टीनिमित्त आलेला आपला मावस भाऊ रविराज उत्तम सुतार (वय वर्षे १२, रा. कराड तालुक्यातील राजमाची) याला घेऊन वैरण काढायला नदीत गेले. ते वारणा नदीकाठावर गेले.

दोघांचाही बुडून मृत्यू

वैरणीचे चार मोदळे काढून झाल्यावर नदीपात्रात उतरले. दोघांनाही पोहायला येत नव्हते. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती कुरळप पोलीस ठाण्यात कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. लाईफ फाऊंडेशन रेस्क्यू फोर्स यांच्या टीमला पाचारण करण्यात आले. या टीमने दोघांचेही प्रेत पाण्यातून बाहेर काढलेत.

रविराज आला होता मावशीकडे

रविराज सुतार हा सुट्टीनिमित्त आपल्या मावशीकडे आला होता. तो सातव्या वर्गात शिकत होता. त्याचे आई वडील हे रोजंदारी करतात. आज रविराजचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे राजमाची आणि रविराज याच्या घरी शोककळा पसरली आहे.

अमोलने दिली होती दहावीची परीक्षा

अमोल प्रकाश सुतार हा आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याने नुकतीच १० वीची परीक्षा दिली होती. प्रकाश सुतार यांचीही परिस्थिती बेताचीच आहे. तरुण मुलगा मृत्यू झाल्याने घरावर दुखाचा डोंगर कोसळले आहे. सख्या मावस भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने या दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.