AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाहुणा म्हणून गावात आला, मावस भावासोबत वैरण काढायला नदीत उतरला, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही…

वैरणीचे चार मोदळे काढून झाल्यावर नदीपात्रात उतरले. दोघांनाही पोहायला येत नव्हते. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला.

पाहुणा म्हणून गावात आला, मावस भावासोबत वैरण काढायला नदीत उतरला, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही...
| Updated on: May 27, 2023 | 7:48 PM
Share

शंकर देवकुळे, प्रतिनिधी,  सांगली : रविराज हा सातव्या वर्गात शिकतो. तर अमोल हा दहाव्या वर्गात शिकत होता. आता दहावीच्या परीक्षेचा निकाल लागेल म्हणून तो वाट पाहत होता. उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने दोघेही नदी परिसरात गेले. पण, दोघांनाही पोहता येत नव्हते. पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे दोघांचाही बुडून मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील वारणा नदीत बुडून दोन सख्या मावस भावांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने गावातील परिसरात आणि कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

काल दुपारी २ च्या सुमारास अमोल प्रकाश सुतार (वय १६ वर्षे, रा.तांदुळवाडी) आणि सुट्टीनिमित्त आलेला आपला मावस भाऊ रविराज उत्तम सुतार (वय वर्षे १२, रा. कराड तालुक्यातील राजमाची) याला घेऊन वैरण काढायला नदीत गेले. ते वारणा नदीकाठावर गेले.

दोघांचाही बुडून मृत्यू

वैरणीचे चार मोदळे काढून झाल्यावर नदीपात्रात उतरले. दोघांनाही पोहायला येत नव्हते. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती कुरळप पोलीस ठाण्यात कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. लाईफ फाऊंडेशन रेस्क्यू फोर्स यांच्या टीमला पाचारण करण्यात आले. या टीमने दोघांचेही प्रेत पाण्यातून बाहेर काढलेत.

रविराज आला होता मावशीकडे

रविराज सुतार हा सुट्टीनिमित्त आपल्या मावशीकडे आला होता. तो सातव्या वर्गात शिकत होता. त्याचे आई वडील हे रोजंदारी करतात. आज रविराजचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे राजमाची आणि रविराज याच्या घरी शोककळा पसरली आहे.

अमोलने दिली होती दहावीची परीक्षा

अमोल प्रकाश सुतार हा आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याने नुकतीच १० वीची परीक्षा दिली होती. प्रकाश सुतार यांचीही परिस्थिती बेताचीच आहे. तरुण मुलगा मृत्यू झाल्याने घरावर दुखाचा डोंगर कोसळले आहे. सख्या मावस भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने या दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.