AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election Result : मुंबईचा महापौर कोण, राजधानीत खलबतं, मोदींचेही सर्वात मोठे विधान; थेट म्हणाले, मुंबईत आता…

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीचा विजय झाला आहे. याच निवडणुकीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे विधान केले आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

BMC Election Result : मुंबईचा महापौर कोण, राजधानीत खलबतं, मोदींचेही सर्वात मोठे विधान; थेट म्हणाले, मुंबईत आता...
eknath shinde and narendra modiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 18, 2026 | 2:31 PM
Share

Narendra Modi On BMC Election Result 2026 : मुंबईच्या महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. येथे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपाने एकत्र येत पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली होती. काहीही झालं तरी ही निवडणूक जिंकायची, असा निश्चयच महायुतीच्या या दोन्ही घटकपक्षांनी केला होता. दुसरीकडे मनसे आणि उद्धव ठाकरे यांनीही ऐतिहासिक युती करून मराठी अस्मितेच्या माध्यमातून वातावरण तापवले होते. परंतु आता मुंबईत महायुतीची सरशी झालेली असून महापौर निवडीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले सर्व नगरसेवक ताज लँड्स या पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवले आहेत. त्यामुळेच मुंबईचा नवा महापौर कोण होणार, याबाबतच सस्पेन्स वाढला आहे. असे असतानाच आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईच्या निकालावर मोठे भाष्य केले आहे.

नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

नरेंद्र मोदी आसाम राज्यातील काझीरंगा येथे एका सभेला संबोधित करत होते. या सभेत बोलताना त्यांनी मुंबईच्या महानगरपालिका निवडणुकीवर थेट भाष्य केले. त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. “संपूर्ण देशात भाजपा हा सर्वांचा आवडता पक्ष म्हणून समोर येत आहे. गेल्या एक ते दीड वर्षांपासून लोकांचा भाजपावरील विश्वास वाढत आहे. नुकेच बिहारमध्ये निवडणुका झाल्या. तिथे लोकांनी भाजपाला विक्रमी मतं दिली,” असे नरेंद्र मोदी म्हणाले.

मुंबईच्या निकालावर बोलताना मोदी म्हणाले की….

तसेच पुढे त्यांनी मुंबई तसेच महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या निवडणुकीवरही मोठे भाष्य केले. “दोन दिवसांअगोदर महाराष्ट्रातील मोठ्या शहरांत महापौर आणि नगरसेवक पदाच्या निवडणुका झाल्या. मुंबई हे जगातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या शहरांपैकी एक शहर आहे. त्या शहरातही जनतेने भाजपाला पहिल्यांदाच ऐतिहासिक आणि विक्रमी मतं दिली. भाजपाचा मुंबईत विजय होतोय. पण तो विजय काझिरंगामध्ये साजरा केला जातोय. महाराष्ट्रात बहुसंख्य शहरात लोकांनी भाजपालाच सेवेची संधी दिली आहे,” असे नरेंद्र मोदी म्हणाले.

पुढे नेमकं काय होणार?

दरम्यान, मुंबईतील महानगरपालिकेच्या निवडणुकीवर थेट मोदींनी आसाम राज्यात विधानांची चर्चा होत आहे. सद्या भाजपा आणि शिवसेना यांच्यात महापौरपदाच्या निवडीवरून चर्चा सुरू आहे. असे असतानाच मोदी यांनी थेट आसाममध्ये मुंबईचा उल्लेख केल्याने भाजपाच्या शीर्षस्थ नेत्यांचेही महापौरनिवडीकडे लक्ष आहे, असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का.
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक.
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,.
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि.
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्.
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?.
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार.
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ.
नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणानंतर मोठा बदल, कंपनीतील उच्चपदस्थांनी घेतला
नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणानंतर मोठा बदल, कंपनीतील उच्चपदस्थांनी घेतला.