AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीकेसी बरोबरच ठाणे, मीरा- भाईंदरमध्येही पॉड टॅक्सीचा प्रयोग

रोप वे आणि पॉड टॅक्सीसाठी महापालिका किंवा राज्य शासनाचा एकही रुपया खर्च होणार नसल्याचेही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.

बीकेसी बरोबरच ठाणे, मीरा- भाईंदरमध्येही पॉड टॅक्सीचा प्रयोग
| Updated on: Feb 28, 2025 | 7:57 PM
Share

मुख्य मेट्रो आणि रिंग रुट मेट्रो यांना परस्पर कनेक्टिव्हीटी निर्माण करण्यासाठी तसेच टॅक्सी आणि ऑटो रिक्षांच्या अवाच्या सवा भाड्या आकारणीतून सुटका देण्यासाठी बीकेसी ते कुर्ला आणि वांद्रे स्थानक परिसरात एमएमआरडीए लंडनच्या हिथ्रो विमानतळाच्या धर्तीवर पॉड ट्रॅक्सीचा प्रयोग राबविणार आहे. या मीरा-भाईंदर येथेही पॉड ट्रॅक्सीची संकल्पना राबविण्याचा संकल्प परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. आज महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थित मंत्र्यांसमोर या पॉड टॅक्सी प्रकल्पाचे सादरी करण करण्यात आले.

मुख्य मेट्रो आणि अंतर्गत मेट्रो यांना योग्य कनेक्टिव्हीटी तयाक व्हावी आणि रस्त्यावरील रहदारी कमी करण्यासाठी वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी आता बीकेसी बरोबरच ठाणे आणि मीरा-भाईंदरमध्येही पॉड टॅक्सी संकल्पना राबविणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. पॉड टॅक्सी संदर्भात आज मंत्री सरनाईक यांच्या समोर सादरीकरण करण्यात आले असून लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात सुरु असलेल्या कामांचा आढावा आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला. यावेळी पॉड टॅक्सीचे सादरीकरण करण्यात आले. मुख्य मेट्रो आणि अंतर्गत मेट्रोचे शेवटचे स्टेशन हे घोडबंदर भागात येणार आहे. तिथपर्यंत पोहचण्यासाठी पॉड टॅक्सीचा पर्याय पुढे आणण्यात आला आहे. रोप वे प्रमाणे ही टॅक्सी चालवली जाणार असून पावसाळ्यात या भागात रस्त्यावर पाणी साचून होणाऱ्या वाहतुक कोंडीतून यामुळे सुटका होणार आहे.

१६ प्रवाशांची क्षमता

पॉड टॅक्सीचा वेग ताशी ६० ते ७० किमी एवढा असणार आहे. यातून एकावेळेस उभे आणि बसून १६ प्रवासी जाऊ शकतात. ज्या प्रवाशांना ज्या स्थानकापर्यंत जायचे असेल त्याठिकाणीच ही टॅक्सी थांबणार आहे. संपूर्णपणे इलेक्ट्रीकवर ही टॅक्सी धावणार आहे. यासाठी सिमेंटचे गर्डर असणार असून याचे व्हिल आणि ट्रॅक हे स्टीलचे असणार असल्याची माहिती यावेळी संबधींत कंपनीच्या प्रतिनिधींनी दिली. घोडबंदर भागातील भाईंदर पाडा ते विहंग हील या एक किमीच्या ४० मीटर रस्त्याच्या वरच्या भागातून ही टॅक्सी धावणार आहे. प्रायोगीक तत्वावर ही हवाई वाहतुक सुरु होणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.

मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय

पॉड टॅक्सीचा फायदा हा  मुख्य मेट्रो आणि अंतर्गत मेट्रोपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. याशिवाय मीरा- भाईंदर महापालिका हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते जीपी येथील ६० मीटर रस्त्यावर पॉड ट्रॅक्सी चालविली जाणार आहे. तसेच एमएमआर क्षेत्रातही आता सर्व्हे केला जाणार असून ज्याठिकाणी रोप वे शक्य असेल त्याठिकाणी रोपवे आणि ज्या ठिकाणी पॉड टॅक्सी शक्य असेल त्याठिकाणी ही सेवा देण्याला प्राधान्य दिले. या संदर्भातील निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत देखील झाला असून त्यानुसार आता सर्व्हे करुन पुढील निर्णय घेतला जात असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.

Follow Us
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा.
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती....
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती.....
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी.
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती.
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती.
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.